शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पतंजलीचा जगातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया प्रकल्प नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 10:56 IST

पतंजली आयुर्वेद लिमिटेड नागपूरच्या मिहान-सेझमध्ये जगातील सर्वात मोठा संत्रा-प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. एकूण ३५०० ते ५००० कोटी गुंतवणूक असलेला हा स्वयंचलित प्रकल्प २०१८ मध्ये उत्पादन सुरू करेल, अशी माहिती पतंजली आयुर्वेदचे प्रबंध संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली.

ठळक मुद्दे३५०० ते ५००० कोटी गुंतवणूक प्रकल्प सुरू होणार २०१८ मध्ये

सोपान पांढरीपांडे।आॅनलाईन लोकमतनागपूर : पतंजली आयुर्वेद लिमिटेड नागपूरच्या मिहान-सेझमध्ये जगातील सर्वात मोठा संत्रा-प्रक्रिया प्रकल्प उभारणार आहे. एकूण ३५०० ते ५००० कोटी गुंतवणूक असलेला हा स्वयंचलित प्रकल्प २०१८ मध्ये उत्पादन सुरू करेल, अशी माहिती पतंजली आयुर्वेदचे प्रबंध संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली. नागपुरात १६ ते १८ डिसेंबरदरम्यान आयोजित ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या पार्श्वभूमीवर आचार्य बालकृष्ण यांनी केलेली ही घोषणा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.लोकमतशी विशेष वार्तालाप करताना आचार्य बालकृष्ण म्हणाले की, या संत्रा-प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता दर दिवशी ८०० टन (४० ट्रक) राहील. या प्रकल्पात संत्र्याचा ज्यूस तर तयार होईलच पण सालीपासून तेल काढल्या जाईल व उरलेल्या चोथ्याचाही सुयोग्य उपयोग केला जाईल. याचबरोबर दररोज ६०० टन क्षमता असलेला खाद्यान्न-प्रक्रिया प्रकल्पही मिहान-सेझमध्ये आणत आहोत. यात आवळा, टोमॅटो, अ‍ॅलोव्हेरा (कोरफड) व इतर फळवर प्रक्रिया करून पॉवर विटा, ग्लुकोज, नूडल्स, ब्रेड, बिस्कीट इत्यादी उत्पादनांचे कारखाने राहतील. या दोन्ही प्रकल्पांमध्ये जागतिक गुणवत्ता मानकाचे उदा. यूएसएफडीए, युरोपियन युनियनची मानके यांचे काटेकोर पालन करून उत्पादने निर्यातही केली जातील, असे आचार्य बाळकृष्ण म्हणाले.

शेतकऱ्यांचे हित हा आमचा संकल्पदोन वर्षापूर्वी जेव्हा माध्यमांमध्ये शेतकरी आत्महत्येच्या बातम्यांमुळे व्यथित होऊन योगगुरू बाबा रामदेव यांनी आमचे लक्ष विदर्भाकडे वेधले. आम्ही इथल्या पिकांचा, जमिनीचा व शेती पद्धतीचा व विशेष नागपूरचा देशातील केंद्रस्थानाचा सखोल अभ्यास केला व नागपुरात प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला, अशी माहितीही आचार्य बालकृष्ण यांनी दिली.आचार्य बालकृष्ण देशातील आठवे धनाढ्य व्यक्तीआचार्य बालकृष्ण यांची पतंजली आयुर्वेदमध्ये ९४ टक्के मालकी आहे तर उरलेले सहा टक्के मालकी हक्क योगगुरू बाबा रामदेव यांचेकडे आहे. आंतरराष्टय संशोधन संस्था हरून इंडियाच्या धनाढ्य व्यक्तींच्या यादीत ७०,००० कोटी संपत्ती मूल्य असलेले आचार्य बालकृष्ण आठव्या क्रमांकावर आहेत. गेल्या वर्षी त्यांच्या संपत्तीमूल्यात १७३ टक्क्यांची वाढ झाली. या यादीप्रमाणे मुकेश अंबानी सर्वात धनाढ्य व्यक्ती असून त्यांचे संपत्तीमूल्य २,५७,९०० कोटी आहे.

पतंजलीचे बिझनेस मॉडेलपतंजलीच्या व्यवसाय पद्धतीबद्दल बोलताना आम्ही ‘बॅकवर्ड इंटिग्रेशन’ करतो असे सांगून आचार्य बालकृष्ण म्हणाले आम्ही शेतकऱ्यांकडून थेट कच्चा माल विकत घेतो. त्यात झारीतील शुक्राचार्य ठरणारे दलाल आम्ही टाळतो म्हणून शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळतो. आमच्या प्रक्रिया प्रकल्पात बलाढ्य क्षमता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही उत्पादन खर्च आटोक्यात ठेवतो त्यामुळे ग्राहकांना उत्पादने स्वस्त किमतीत मिळतात. शेतकऱ्यांना जास्त मोबदला आणि ग्राहकांसाठी स्वस्त किंमत हे आमचे ध्येय आहे, असे आचार्य बालकृष्ण म्हणाले. योग्य तेवढा कच्चा माल मिळावा म्हणून आम्ही शेतकऱ्यांना बी-बियाण्यांसोबत तंत्रज्ञान देतो व उत्पादनांच्या पॅकिंगपर्यंत सर्व प्रक्रिया पतंजलीच्या एकाच छत्राखाली उभ्या करतो त्यामुळे शेतकरी व ग्राहक दोघांचाही फायदा होतो.दरवर्षी पतंजलीची उलाढाल दुप्पट होण्याचे रहस्य काय यावर बोलताना आचार्य बालकृष्ण म्हणाले २०१५-१६ मध्ये पतंजलीची उलाढाल ५००० कोटी होती ती २०१६-१७ मध्ये १०५६१ कोटी झाली पण २०१७-१८ मध्ये ती २०,००० कोटीपेक्षा जरा कमीच राहील असे आचार्य बालकृष्ण म्हणाले. नागपूरसोबतच आसाममध्ये पतंजली आयुर्वेदिक औषधे व सौंदर्य प्रसाधनांचा १५०० कोटींचा प्रकल्प उभा करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :fruitsफळे