शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

ट्रेनच्या टॉयलेटमध्ये पाणी नसल्याने प्रवाशांनी रोखली ट्रेन; रेल्वे स्थानकावर जोरदार हंगामा

By नरेश डोंगरे | Updated: February 4, 2024 21:02 IST

तासभर विलंब, दुरूस्तीनंतरही प्रवाशांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रेनमधील टॉयलेटमध्ये पाण्याची समस्या दूर होत नसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी पुरी अहमदाबाद एक्सप्रेस तब्बल एक तास रोखली. परिणामी नागपूर स्थानकावर रविवारी सकाळी गरमागरम वातावरण निर्माण झाले होते. दुरूस्तीच्या नावाखाली गाडीला एक तास विलंब झाला. मात्र, सूरत येईस्तोवर समस्या जैसे थेच असल्याने प्रवाशांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला होता.

पुरी - अहमदाबाद एक्सप्रेसच्या ए-२ कोचच्या टॉयलेटमध्ये गाडी सुटल्यापासूनच पाण्याची समस्या होती. त्यामुळे प्रवाशांनी त्याची रेल्वे स्टाफकडे तक्रार केली होती. मधल्या स्थानकावर गाडीत पाणी भरण्यात आले. मात्र, टॉयलेटच्या टंकीला गळती लागल्यामुळे त्यातून पाणी वाहून जात होते. परिणामी प्रवाशांची कुचंबना होत होती. अशात रविवारी सकाळी ८.२० वाजता गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचली. मात्र समस्या तशीच असताना गाडी पुढे निघण्याचे संकेत मिळाल्याने ए-२ कोचच्या संतप्त प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबविली.

प्रवासी संतप्त झाल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाल्याचे बघून आरपीएफचे जवान धावले. प्रवासी आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर तब्बल १ तास परिश्रम घेऊन कर्मचाऱ्यांनी गळणाऱ्या टाकीची दुरूस्ती केली. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता ट्रेन पुढे निघाली. याच गाडीत बसलेल्या नागपुरातील एका प्रवाशाने सांगितले की टंकीची दुरूस्ती झाल्याचे सांगितले गेले असले तरी समस्या जैसे थेच होती. रात्री ७ वाजता गाडी सूरतला पोहचल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने टॉयलेटमध्ये पाणी उपलब्ध करून दिले नाही. परिणामी ए-२च्या कोचमधील प्रवासी ए-१ कोचच्या टॉयलेटमध्ये धाव घेऊ लागले.

प्रवासी भाडे घेऊनही प्रवाशांची कुचंबनारेल्वे प्रशासन प्रवाशांकडून भाडे घेते मात्र प्रवाशांना पाहिजे तशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तत्परता दाखवत नाही. ट्रेनमधील टॉयलेटमध्ये पाणी नसल्याची समस्या नेहमीचीच आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून कायमस्वरूपी योजना होत नाही. त्यामुळे विविध मार्गावरील, वेगवेगळ्या गाड्यातील प्रवाशांची नेहमीच कुचंबना होते. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे