शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

ट्रेनच्या टॉयलेटमध्ये पाणी नसल्याने प्रवाशांनी रोखली ट्रेन; रेल्वे स्थानकावर जोरदार हंगामा

By नरेश डोंगरे | Updated: February 4, 2024 21:02 IST

तासभर विलंब, दुरूस्तीनंतरही प्रवाशांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रेनमधील टॉयलेटमध्ये पाण्याची समस्या दूर होत नसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी पुरी अहमदाबाद एक्सप्रेस तब्बल एक तास रोखली. परिणामी नागपूर स्थानकावर रविवारी सकाळी गरमागरम वातावरण निर्माण झाले होते. दुरूस्तीच्या नावाखाली गाडीला एक तास विलंब झाला. मात्र, सूरत येईस्तोवर समस्या जैसे थेच असल्याने प्रवाशांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला होता.

पुरी - अहमदाबाद एक्सप्रेसच्या ए-२ कोचच्या टॉयलेटमध्ये गाडी सुटल्यापासूनच पाण्याची समस्या होती. त्यामुळे प्रवाशांनी त्याची रेल्वे स्टाफकडे तक्रार केली होती. मधल्या स्थानकावर गाडीत पाणी भरण्यात आले. मात्र, टॉयलेटच्या टंकीला गळती लागल्यामुळे त्यातून पाणी वाहून जात होते. परिणामी प्रवाशांची कुचंबना होत होती. अशात रविवारी सकाळी ८.२० वाजता गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचली. मात्र समस्या तशीच असताना गाडी पुढे निघण्याचे संकेत मिळाल्याने ए-२ कोचच्या संतप्त प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबविली.

प्रवासी संतप्त झाल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाल्याचे बघून आरपीएफचे जवान धावले. प्रवासी आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर तब्बल १ तास परिश्रम घेऊन कर्मचाऱ्यांनी गळणाऱ्या टाकीची दुरूस्ती केली. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता ट्रेन पुढे निघाली. याच गाडीत बसलेल्या नागपुरातील एका प्रवाशाने सांगितले की टंकीची दुरूस्ती झाल्याचे सांगितले गेले असले तरी समस्या जैसे थेच होती. रात्री ७ वाजता गाडी सूरतला पोहचल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने टॉयलेटमध्ये पाणी उपलब्ध करून दिले नाही. परिणामी ए-२च्या कोचमधील प्रवासी ए-१ कोचच्या टॉयलेटमध्ये धाव घेऊ लागले.

प्रवासी भाडे घेऊनही प्रवाशांची कुचंबनारेल्वे प्रशासन प्रवाशांकडून भाडे घेते मात्र प्रवाशांना पाहिजे तशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तत्परता दाखवत नाही. ट्रेनमधील टॉयलेटमध्ये पाणी नसल्याची समस्या नेहमीचीच आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून कायमस्वरूपी योजना होत नाही. त्यामुळे विविध मार्गावरील, वेगवेगळ्या गाड्यातील प्रवाशांची नेहमीच कुचंबना होते. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे