शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यूपी, बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांचा जिवाची बाजी लावून प्रवास

By नरेश डोंगरे | Updated: April 5, 2024 14:27 IST

क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी : प्रचंड गर्दी, शाैचालयाजवळ बसून नाकतोंड दाबून प्रवास.

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवाशांची गर्दी होत असल्याने उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील स्थिती फारच वाईट झाली आहे. पर्याय नसल्याने प्रवासी या गाड्यांमध्ये जिवाची बाजी लावून प्रवास करीत आहेत. या संबंधिचा एक व्हीडीओ शुक्रवारी सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

एकीकडे रेल्वे मंत्रालयाने रेल्वे विकासाचा धडाका लावला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून रेल्वेचा प्रवास अधिक चांगला आणि गतीमान करण्याचे प्रयत्न केले जात आहे. रेल्वे गाड्यांमधील अनेक कोच वातानुकुलित करून प्रवास सुखद करण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, वातानुकुलित डब्यांची संख्या वाढविताना बहुतांश रेल्वेगाड्यांमधील जनरल डब्यांची संख्या कमी झाल्याने गोरगरिब प्रवाशांची प्रचंड कोंडी झाली आहे. जनरल व्यतिरिक्त दुसऱ्या क्लासचा प्रवास परवडत नसल्याने हे बिचारे प्रवासी गावाला जाण्यासाठी रेल्वेच्या जनरल डब्यात स्वत:ला कोंबून घेत आहेत. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी डब्यात शिरत असल्याने बसणे तर सोडा पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. खास करून युपी, बिहारकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील अवस्था फारच वाईट आहे. प्रवासी चक्क शाैचालयाजवळ बसून नाकतोंड दाबून प्रवासी करीत आहेत. यातीलच काही प्रवासी पर्यायच नसल्याने वातानुकुलित डब्यात शिरतात अन् नंतर आरक्षित आसनावर जबरदस्तीने बसून प्रवास करण्याचा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आरक्षण करून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत त्यांचा वाद होतो.

गुरुवारी सायंकाळी सिकंदराबाद - दानापूर एक्सप्रेस नागपूर स्थानकावर आली. ती येथून सुटली तेव्हा खाली उतरून परत जिवाची बाजी लावून अनेक प्रवासी धावत्या गाडीत स्वत:ला कोंबून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत होते. हा व्हिडीओ गुरुवारी रात्रीपासून सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.काय करताहेत टीसी अन् गार्ड

विशेष म्हणजे, गाड्यांमधील प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी टीसी आणि रेल्वे गाड्यांमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांची असते. आरक्षणाशिवाय त्या डब्यात प्रवाशांना शिरूच दिले जाऊ नये, ही त्यांची जबाबदारी असते. मात्र, ही मंडळी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.स्लिपर आणि जनरल डबे वाढविण्याची मागणी

व्हायरल व्हिडीओतून प्रवाशाच्या जिवाला कसा धोका आहे, त्याची कल्पना येऊ शकते. या पार्श्वभूमीवर, भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंतकुमार शुक्ला यांनी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे आज एकपत्र लिहून उपरोक्त प्रकाराची गंभीर दखल घेण्याची विनंती केली आहे. स्लिपर आणि जनरल डबे वाढविण्याची मागणीही त्यांनी या पत्रातून केली आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे