शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रवासी रेल्वेची फेरी, किन्नर अन् गुन्हेगारी; सुरक्षित प्रवासाची घोषणा वाऱ्यावर

By नरेश डोंगरे | Updated: January 4, 2024 23:01 IST

सुरक्षित प्रवासाची घोषणा वाऱ्यावर : जनरलच्या प्रवाशांची सुरक्षा कागदावर

नागपूर : किन्नर आशीर्वाद देतात, ते मायाळू असतात असा सर्वसाधारण समज नागपुरातील किन्नरांच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे चुकीचा ठरू लागला आहे. बुधवारी मध्यरात्री धावत्या ट्रेनमध्ये किन्नरांनी चक्क लुटमार केली त्यामुळे किन्नरांची गुन्हेगारी पुन्हा चर्चेला आली आहे. दुसरीकडे 'रेल्वेचा प्रवास, भितीमुक्त प्रवास' ही घोषणा देखिल वल्गणा असल्याचे आणि रेल्वेतील जनरल कोचमधून प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा भगवान भरोसे असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा उघड झाले आहे.

आधी विशिष्ट सणावाराला किन्नर मंडळी शहरात फिरून दक्षिणा मागत होती. नंतर त्यांची रेल्वेगाडीत फेरी सुरू झाली. लग्न समारंभ, वाढदिवस, नवजात बाळाचे नामकरण, दुकान शोरूमचे उद्घाटन आणि अशाच शुभ कार्यस्थळी येऊन किन्नर 'भेट' मागायला लागले. नंतर त्यांनी रेल्वेगाड्यांमध्ये 'फेरी' सुरू केली अन् याचवेळी नागपुरातील विविध सिग्नलवर उभे राहूनही टाळ्या वाजवू लागले. त्यांचा लवकर आशीर्वाद मिळतो अशी भावना असल्याने किन्नरांना सदभावनेने लोक पैसे देऊ लागले. येथूनच ते बिघडल्यासारखे झाले. चांगले कलेक्शन होत असल्याने त्यांच्यातील वाद उफाळला. किन्नरांचे दोन गट पडल्याने त्यांनी नागपुरात आपापले क्षेत्र वाटून घेतले. यातून वर्चस्वाची लढाई सुरू झाली अन् किन्नरांनी कधी लकडगंज, एमआयडीसी, कधी तहसील, पाचपावली तर कधी गांधीबागमधील भरबाजारात गुंडगिरी सुरू केली. बाजारातील त्यांच्या हाणामाऱ्या, नंदनवन पोलीस ठाण्यात त्यांनी केलेली विकृती आणि नंतर शहरातील एका गटाच्या किन्नर नेता चमचमची दुसऱ्या गटातील किन्नरांनी केलेली हत्या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून देशभर चर्चेला आली होती. त्यानंतर मात्र पोलिसांनी कारवाईचा चाबूक ओढला. लडकगंज ठाण्यात बोलवून तत्कालीन पोलीस उपायुक्त आणि सध्याचे एसपी, एसीबी राहुल माकणिकर यांनी असे काही सरळ केले की तहसील, गांधीबाजारमधील धुडगुस बंदच झाला. चाैकाचाैकातील, सिग्नलवर दिसणारे किन्नरांचे थवेही दिसेनासे झाले. त्यांची नागपुरातील गुन्हेगारीही कमी झाल्याचे वाटत असतानाच बुधवारी मध्यरात्री पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये किन्नरांनी घातलेल्या धुडगूसामुळे त्यांची गुंडगिरी पुन्हा एकदा चर्चेला आली आहे.

कुठे असतात सशस्त्र गार्ड ?

रेल्वे गाड्यांमध्ये सशस्त्र गार्डचे सुरक्षा कवच असल्यामुळे प्रवासी बिनधास्त प्रवास करू शकतात, हा रेल्वे अधिकाऱ्यांकडून केला जाणारा दावाही 'शब्दच्छल' असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज मिळालेल्या माहितीनुसार, शेकडो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या एका रेल्वेगाडीत फार तर चार किंवा पाच आरपीएफचे गार्ड असतात. ते शक्यतो एसी कोचच्या सुरक्षेकडे लक्ष पुरवितात. बुधवारी मध्यरात्री किन्नरांनी सुमारे अर्धा तास जनरल कोचमध्ये हैदोस घातला. प्रवासी दहशतीत येऊन आरडाओरड करत होते. यावेळी सशस्त्र गार्ड कुठे होते, ते मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

संपर्क क्रांतीमध्ये झाली होती हत्या

रेल्वे गाड्यांमधील किन्नरांची गुंडगिरी नवीन विषय नाही. रेल्वेचा स्टाफ आणि प्रवाशांच्या ती चांगली अंगवळणी पडली आहे. काही वर्षांपूर्वी एका किन्नराने एका रेल्वे कर्मचाऱ्याची चाकूने भोसकून हत्या केली होती. दोन वर्षांपूर्वी कळमना स्टेशनजवळ अशाच प्रकारे जनरल बोगीत शिरून गुन्हेगारांनी प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर भीतीमुक्त प्रवासाच्या नियोजनाची जोरदार चर्चा झाली मात्र ती केवळ चर्चाच होती, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासी