शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

आरटीपीसीआर न करता प्रवाशांचा रेल्वेत प्रवास; नागपूर स्टेशनवर हयगय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 08:00 IST

Nagpur News महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार रेल्वेचा प्रवास सुरू करण्यापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. मात्रआरटीपीसीआर टेस्ट न करताच प्रवासी नागपुरात येत असल्याचे निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्दे आतापर्यंत मिळाले ५ संक्रमित प्रवासी

आनंद शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : नागपूरसह महाराष्ट्र व देशभरात काेराेनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे. दरराेज लाखाे रुग्ण मिळत आहेत. याच कारणाने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही संक्रमणाचा धाेका लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार रेल्वेचा प्रवास सुरू करण्यापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. विशेषत: गाेवा, गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड व केरळ राज्यातून येणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र या राज्यांतून आरटीपीसीआर टेस्ट न करताच प्रवासी नागपुरात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे असताना नागपूर स्टेशनवर अशा प्रवाशांबाबत हयगय करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर स्टेशनवर संबंधित सहा राज्यांतून आलेल्या प्रवाशांमधून, ज्यांची आरटीपीसीआर टेस्ट (निगेटिव्ह) आहे, त्यांच्या हातावर गृह विलगीकरणाचा शिक्का मारून घरी पाठविले जात आहे. ज्यांचे तापमान अधिक आहे किंवा ज्यांच्यात काेराेनाची लक्षणे दिसून येत आहेत, त्यांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येत आहे. नागपूर महापालिकेचे सहायक आराेग्य अधिकारी डाॅ. विजय जाेशी यांनी सांगितले, नागपूर स्टेशनवर संशयित प्रवाशांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करताना आतापर्यंत ५ प्रवासी काेराेना संक्रमित आढळून आले आहेत. त्या सर्वांना पाचपावली काेराेना केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. मात्र यावरून एक गाेष्ट लक्षात येते की, पूर्ण प्रवासादरम्यान या पाॅझिटिव्ह लाेकांनी आणखी किती प्रवाशांना संक्रमित केले असेल? रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनाही बाधा हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेल? असतानाही आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्याच्या निर्देशाचे कठाेरतेने पालन हाेत नसल्याने स्थिती नियंत्रणात येण्याऐवजी आणखी बिघडण्याची भीती बळावली आहे.

प्रवासाच्या ७२ तासापूर्वी केलेला रिपाेर्ट मान्य

दरम्यान, मध्य रेल्वे, नागपूर मंडलाचे वरिष्ठ प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी, रेल्वे प्रवासाच्या ७२ तासांपूर्वी केलेली आरटीपीसीआर टेस्ट रिपाेर्ट रेल्वेत प्रवास करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. संबंधित सहा राज्यांतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडून आरटीपीसीआर रिपाेर्ट मागण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. रिपाेर्ट नसलेल्या प्रवाशांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात येते. नागपूर स्टेशनवर येणाऱ्या सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करून हाेम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात येतात. संशयित प्रवाशांची रॅपिड टेस्ट करून पाॅझिटिव्ह येणाऱ्या प्रवाशांना मनपाच्या टीमच्या मदतीने क्वारंटाईन सेंटरवर पाठविण्यात येत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

हातावर हाेम क्वारंटाईनचा शिक्का

रेल्वे स्टेशनवर बाहेरून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करून त्यांच्या हातावर हाेम क्वारंटाईनचा शिक्का लावण्यात येत आहे. पहिल्या लाॅकडाऊनच्या काळात शाईने लावण्यात येणाऱ्या शिक्क्यामुळे त्वचेची समस्या निर्माण हाेत हाेती. स्टॅम्पच्या ठिकाणी जखम हाेत असल्याच्या तक्रारी मिळत हाेत्या. त्यामुळे काही दिवसांनंतर स्टॅम्प लावणे बंद झाले. आता पुन्हा रेल्वे स्टेशनवर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्याप तरी कोणाला जखम झाल्याची तक्रार समाेर आलेली नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस