शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अ‍ॅक्वा लाईनवर आता दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 00:12 IST

अ‍ॅक्वा लाईन (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) मार्गिकेवर २८ जानेवारीपासून दर अर्ध्या तासाने प्रवासी सेवा सुरू करण्यात आली होती. आता या फेऱ्यामध्ये आणखी वाढ करीत १४ मार्चपासून दर १५-१५ मिनिटांनी मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे.

ठळक मुद्देमेट्रो फेऱ्यामध्ये आजपासून वाढ : ऑरेंज व अ‍ॅक्वा लाईनवर २०० फेऱ्या

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अ‍ॅक्वा लाईन (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) मार्गिकेवर २८ जानेवारीपासून दर अर्ध्या तासाने प्रवासी सेवा सुरू करण्यात आली होती. आता या फेऱ्यामध्ये आणखी वाढ करीत १४ मार्चपासून दर १५-१५ मिनिटांनी मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.यापूर्वी केवळ ऑरेंज लाईन मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू होती. आता अ‍ॅक्वा लाईनवरदेखील सीताबर्डी स्टेशन येथून सकाळी ८ ते सायंकाळी ८.३० पर्यंत लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन येथून मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहे. नागरिकांना दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सर्व नियोजन महामेट्रोतर्फे करण्यात आले आहे. अ‍ॅक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईन मिळून दररोज २०० मेट्रोच्या प्रवासी फेऱ्या होणार आहे.अ‍ॅक्वा लाईन या ११.५ किमी लांबीच्या मार्गिकेवर सहा मेट्रो स्टेशन लोकमान्यनगर, वासुदेवनगर, सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झांशी राणी आणि सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या मार्गिकेवर प्रवासी दरही कमी आहे. या मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात असलेल्या शैक्षणिक संस्था असून विद्यार्थ्यांसाठी मेट्रो सेवा अतिशय फायद्याची ठरत आहे. शिवाय या भागातील औद्योगिक वसाहती अंतर्गत असलेल्या अनेक छोट्यामोठ्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी मेट्रो सेवा फायद्याची ठरणार आहे. शहराच्या दोन्ही मुख्य रस्त्यावर मेट्रो सेवा सुरू झाल्याने नागरिकांना मोठा फायदा होत आहे. या मार्गावर अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहेत.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर