शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

अ‍ॅक्वा लाईनवर आता दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 00:12 IST

अ‍ॅक्वा लाईन (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) मार्गिकेवर २८ जानेवारीपासून दर अर्ध्या तासाने प्रवासी सेवा सुरू करण्यात आली होती. आता या फेऱ्यामध्ये आणखी वाढ करीत १४ मार्चपासून दर १५-१५ मिनिटांनी मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे.

ठळक मुद्देमेट्रो फेऱ्यामध्ये आजपासून वाढ : ऑरेंज व अ‍ॅक्वा लाईनवर २०० फेऱ्या

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अ‍ॅक्वा लाईन (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) मार्गिकेवर २८ जानेवारीपासून दर अर्ध्या तासाने प्रवासी सेवा सुरू करण्यात आली होती. आता या फेऱ्यामध्ये आणखी वाढ करीत १४ मार्चपासून दर १५-१५ मिनिटांनी मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.यापूर्वी केवळ ऑरेंज लाईन मार्गिकेवर दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू होती. आता अ‍ॅक्वा लाईनवरदेखील सीताबर्डी स्टेशन येथून सकाळी ८ ते सायंकाळी ८.३० पर्यंत लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन येथून मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहे. नागरिकांना दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सर्व नियोजन महामेट्रोतर्फे करण्यात आले आहे. अ‍ॅक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईन मिळून दररोज २०० मेट्रोच्या प्रवासी फेऱ्या होणार आहे.अ‍ॅक्वा लाईन या ११.५ किमी लांबीच्या मार्गिकेवर सहा मेट्रो स्टेशन लोकमान्यनगर, वासुदेवनगर, सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झांशी राणी आणि सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या मार्गिकेवर प्रवासी दरही कमी आहे. या मार्गिकेवर मोठ्या प्रमाणात असलेल्या शैक्षणिक संस्था असून विद्यार्थ्यांसाठी मेट्रो सेवा अतिशय फायद्याची ठरत आहे. शिवाय या भागातील औद्योगिक वसाहती अंतर्गत असलेल्या अनेक छोट्यामोठ्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी मेट्रो सेवा फायद्याची ठरणार आहे. शहराच्या दोन्ही मुख्य रस्त्यावर मेट्रो सेवा सुरू झाल्याने नागरिकांना मोठा फायदा होत आहे. या मार्गावर अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहेत.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर