शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बौद्ध कायद्यासाठीच्या आंदोलनात सहभागी व्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:10 IST

बौद्धांचा स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान येत्या २४ जुलै रोजी आॅल इंडिया अ‍ॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बौद्ध अनुयायांनी सर्व मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांनी केले.

ठळक मुद्देभदंत ज्ञानज्योती यांचे आवाहन : धम्म संसद यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बौद्धांचा स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान येत्या २४ जुलै रोजी आॅल इंडिया अ‍ॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बौद्ध अनुयायांनी सर्व मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांनी केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बौद्ध धम्म संसदेत ते बोलत होते.तथागत बुद्ध विहार, वैशालीनगर येथे आयोजित धम्म संसदेत दिल्ली शासनाचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम, लखनौचे दयाशंकर बौद्ध, अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकुंद खैरे, दिल्लीचे के.पी. चौधरी, डॉ. पी.एस. बौद्ध, प्रा. अशोक वानखेडे, प्रा. प्रमोद मेश्राम, चंद्रमणी शहारे, भदंत महामोग्गलायन, भदंत कमाल धम्मो, भदंत विपश्यी व भिक्खू संघ उपस्थित होते. भदंत ज्ञानज्योती पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली व २२ प्रतिज्ञांचे पालन करण्याचे आवाहन केले. बौद्धांचा स्वतंत्र कायदा नसल्याने सर्व संस्कार १९५५ च्या हिंदू कायद्यानुसार करावे लागतात. अ‍ॅक्शन कमिटीने बौद्ध कायद्याचा मसुदा तयार केला असून, केंद्र शासनाने स्वीकृत करून लागू करायचा आहे. मात्र केंद्र शासन बौद्धांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे परत एकदा दिल्लीत संसदेवर आंदोलन करावे लागत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आपण स्वत: करणार असल्याचे प्रतिपादन भदंत ज्ञानज्योती यांनी यावेळी केले. हा कायदा बाबासाहेबांच्या विचाराशी पूरक असून त्यांच्या चळवळीला पुढे नेणारा आहे. त्यामुळे बौद्ध अनुयायांनी २४ जुलैला होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी राजेंद्र पाल गौतम म्हणाले, बौद्ध कायद्याची मागणी याआधीच व्हायला हवी होती. मात्र तसे झाले नाही याची खंत आहे. पण उशिरा का होईना हा लढा सुरू झाला आहे व यात एकजुटीने सहभागी व्हावे लागेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या आंदोलनात सहभागी होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. अ‍ॅड. मुकुंद खैरे यांनी बौद्ध कायद्याची रूपरेषा समजावून सांगत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. धम्म संसदेचे संचालन भदंत कुणाल कीर्ती यांनी व प्रास्ताविक प्रदीप फुलझेले यांनी केले. माधवी फुलझेले यांनी आभार मानले.

टॅग्स :nagpurनागपूरReligious programmeधार्मिक कार्यक्रम