शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बौद्ध कायद्यासाठीच्या आंदोलनात सहभागी व्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:10 IST

बौद्धांचा स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान येत्या २४ जुलै रोजी आॅल इंडिया अ‍ॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बौद्ध अनुयायांनी सर्व मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांनी केले.

ठळक मुद्देभदंत ज्ञानज्योती यांचे आवाहन : धम्म संसद यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बौद्धांचा स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान येत्या २४ जुलै रोजी आॅल इंडिया अ‍ॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बौद्ध अनुयायांनी सर्व मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांनी केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बौद्ध धम्म संसदेत ते बोलत होते.तथागत बुद्ध विहार, वैशालीनगर येथे आयोजित धम्म संसदेत दिल्ली शासनाचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम, लखनौचे दयाशंकर बौद्ध, अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकुंद खैरे, दिल्लीचे के.पी. चौधरी, डॉ. पी.एस. बौद्ध, प्रा. अशोक वानखेडे, प्रा. प्रमोद मेश्राम, चंद्रमणी शहारे, भदंत महामोग्गलायन, भदंत कमाल धम्मो, भदंत विपश्यी व भिक्खू संघ उपस्थित होते. भदंत ज्ञानज्योती पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली व २२ प्रतिज्ञांचे पालन करण्याचे आवाहन केले. बौद्धांचा स्वतंत्र कायदा नसल्याने सर्व संस्कार १९५५ च्या हिंदू कायद्यानुसार करावे लागतात. अ‍ॅक्शन कमिटीने बौद्ध कायद्याचा मसुदा तयार केला असून, केंद्र शासनाने स्वीकृत करून लागू करायचा आहे. मात्र केंद्र शासन बौद्धांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे परत एकदा दिल्लीत संसदेवर आंदोलन करावे लागत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आपण स्वत: करणार असल्याचे प्रतिपादन भदंत ज्ञानज्योती यांनी यावेळी केले. हा कायदा बाबासाहेबांच्या विचाराशी पूरक असून त्यांच्या चळवळीला पुढे नेणारा आहे. त्यामुळे बौद्ध अनुयायांनी २४ जुलैला होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी राजेंद्र पाल गौतम म्हणाले, बौद्ध कायद्याची मागणी याआधीच व्हायला हवी होती. मात्र तसे झाले नाही याची खंत आहे. पण उशिरा का होईना हा लढा सुरू झाला आहे व यात एकजुटीने सहभागी व्हावे लागेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या आंदोलनात सहभागी होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. अ‍ॅड. मुकुंद खैरे यांनी बौद्ध कायद्याची रूपरेषा समजावून सांगत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. धम्म संसदेचे संचालन भदंत कुणाल कीर्ती यांनी व प्रास्ताविक प्रदीप फुलझेले यांनी केले. माधवी फुलझेले यांनी आभार मानले.

टॅग्स :nagpurनागपूरReligious programmeधार्मिक कार्यक्रम