शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बौद्ध कायद्यासाठीच्या आंदोलनात सहभागी व्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:10 IST

बौद्धांचा स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान येत्या २४ जुलै रोजी आॅल इंडिया अ‍ॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बौद्ध अनुयायांनी सर्व मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांनी केले.

ठळक मुद्देभदंत ज्ञानज्योती यांचे आवाहन : धम्म संसद यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बौद्धांचा स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान येत्या २४ जुलै रोजी आॅल इंडिया अ‍ॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बौद्ध अनुयायांनी सर्व मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भदंत ज्ञानज्योती महास्थवीर यांनी केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बौद्ध धम्म संसदेत ते बोलत होते.तथागत बुद्ध विहार, वैशालीनगर येथे आयोजित धम्म संसदेत दिल्ली शासनाचे सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम, लखनौचे दयाशंकर बौद्ध, अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकुंद खैरे, दिल्लीचे के.पी. चौधरी, डॉ. पी.एस. बौद्ध, प्रा. अशोक वानखेडे, प्रा. प्रमोद मेश्राम, चंद्रमणी शहारे, भदंत महामोग्गलायन, भदंत कमाल धम्मो, भदंत विपश्यी व भिक्खू संघ उपस्थित होते. भदंत ज्ञानज्योती पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली व २२ प्रतिज्ञांचे पालन करण्याचे आवाहन केले. बौद्धांचा स्वतंत्र कायदा नसल्याने सर्व संस्कार १९५५ च्या हिंदू कायद्यानुसार करावे लागतात. अ‍ॅक्शन कमिटीने बौद्ध कायद्याचा मसुदा तयार केला असून, केंद्र शासनाने स्वीकृत करून लागू करायचा आहे. मात्र केंद्र शासन बौद्धांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे परत एकदा दिल्लीत संसदेवर आंदोलन करावे लागत आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आपण स्वत: करणार असल्याचे प्रतिपादन भदंत ज्ञानज्योती यांनी यावेळी केले. हा कायदा बाबासाहेबांच्या विचाराशी पूरक असून त्यांच्या चळवळीला पुढे नेणारा आहे. त्यामुळे बौद्ध अनुयायांनी २४ जुलैला होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी राजेंद्र पाल गौतम म्हणाले, बौद्ध कायद्याची मागणी याआधीच व्हायला हवी होती. मात्र तसे झाले नाही याची खंत आहे. पण उशिरा का होईना हा लढा सुरू झाला आहे व यात एकजुटीने सहभागी व्हावे लागेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या आंदोलनात सहभागी होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. अ‍ॅड. मुकुंद खैरे यांनी बौद्ध कायद्याची रूपरेषा समजावून सांगत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. धम्म संसदेचे संचालन भदंत कुणाल कीर्ती यांनी व प्रास्ताविक प्रदीप फुलझेले यांनी केले. माधवी फुलझेले यांनी आभार मानले.

टॅग्स :nagpurनागपूरReligious programmeधार्मिक कार्यक्रम