शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दातृत्त्वाने पुन्हा एकदा खुलली उद्यानाची व्यायामशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:36 IST

park gymnasium, nagpur news शहरातील सर्वात जुनी बाग असलेल्या म्हाळगीनगर परिसरातील शिवाजीनगर पार्कचे सौंदर्य खुलविण्यात प्रशासनाची उदासीनता कारणीभूत आहे, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. येथील ग्रीन जिमचे साहित्य मोडलेल्या अवस्थेत होते. मात्र, शासन - प्रशासन या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याने, स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने या पार्कमधील व्यायामशाळा पुन्हा सुरू झाली आहे.

ठळक मुद्देग्रीन जिमची झाली होती दुरावस्था

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील सर्वात जुनी बाग असलेल्या म्हाळगीनगर परिसरातील शिवाजीनगर पार्कचे सौंदर्य खुलविण्यात प्रशासनाची उदासीनता कारणीभूत आहे, याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. येथील ग्रीन जिमचे साहित्य मोडलेल्या अवस्थेत होते. मात्र, शासन - प्रशासन या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याने, स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने या पार्कमधील व्यायामशाळा पुन्हा सुरू झाली आहे.

पंकज साठवणे हे या बागेत नेहमी येत असतात. मात्र, बागेची जागा समतल नाही, वृक्ष - रोपट्यांची निगा राखली जात नाही आणि मुलांसाठी व आरोग्यवर्धनासाठी उभारण्यात आलेल्या व्यायामाच्या साहित्याची मोडतोड झाल्याचे त्यांच्या नेहमी निदर्शनास येत होते. शासन व प्रशासनाकडे याबाबत बोलूनही दुरावस्था दूर झाली नाही, हे बघून साठवणे आणि त्यांच्या साथीदारांनी व्यायामाचे नवे साहित्य आणून ग्रीन जिम सुरू करण्याचे प्रयत्न केले आहे. त्यांच्या या दातृत्त्वाचे कौतुक केले जात आहे. आता सकाळ - संध्याकाळी लहान मुले, वृद्ध व तरुण या व्यायामाच्या साहित्याचा वापर करून आपले आरोग्य सुदृढ करत आहेत. हे साहित्य नव्याने लावण्यात आले, त्यावेळी विशाल कोरके, राजेश कानपिल्लेवार, राजू गौतम, सुरेंद्र राऊत, राजू धानोरे, सावरकर गुरुजी, राजेश नागोसे, सोनू धनविजय, योगेश सोनारे, चंदू बिहारे, नीलेश गावंडे, दीपक चव्हाण, मनीष पवार, गणेश नरड, शांतनू मानकर, राहुल साठवणे, अमोल बहेकर, भूषण कुंटे, सोनी, आशिष भोयर, श्रीकांत खंडाळे, किरण शेळके उपस्थित होते.

 प्रशासनाने आता तरी जागे व्हावे

नागरिकांसाठी केलेल्या सुविधांची निगा राखणे हे नागरिकांचेही कर्तव्य आहे. मात्र, त्याला प्रशासनाने आधार देणे गरजेचे आहे. शिवाजी पार्कच्या बाबतीत नागरिकांनी आपले कर्तव्य बजावले. आता प्रशासनाने जागे होण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूर