शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

परिवर्तन महाशक्ती १२१ जागांवर रिंगणात, छत्रपती संभाजी महाराज, राजू शेट्टी, बच्चू कडू, वामनराव चटप एकत्र

By कमलेश वानखेडे | Updated: November 4, 2024 19:38 IST

या महाशक्तीचे १२१ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

नागपूर : राज्यातील ९ घटक पक्षांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्ती उभारली आहे. या महाशक्तीचे १२१ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यापैकी जास्तीत जास्त उमेदवार विजयी होतील व महाशक्तीचाच मुख्यमंत्री होईल, असा दावा महाशक्तीच्या नेत्यांतर्फे करण्यात आला आहे.

परिवर्तन महाशक्तीचे घटक असलेले स्वराज्य पार्टीचे छत्रपती संभाजी महाराज, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी, प्रहार जनशक्तीचे आ. बच्चू कडू, शेतकरी संघटनेचे वामनराव चटप, खोरिपाचे उपेंद्र शेंडे आदींनी एकत्र येत सोमवारी पत्रकार परिषदेत उमेदवारी लढविण्यासंबंधीची घोषणा केली. छत्रपती संभाजी महाराज म्हणाले, राज्यात एक सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील यांनी समाज हितासाठी निर्णय घेतला आहे. दोन दिवसात आम्ही त्यांची भेट घेऊन चर्चा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचा जाहीरनामा मंगळवारी प्रसिद्ध केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

परिवर्तन महाशक्ती राज्यात एक सशक्त पर्याय देईल व प्रस्थापितांना शह देऊ, असा दावा राजू शेट्टी यांनी केला. बच्चू कडू यांनीही चौफेर चौकार मारणार असल्याचे सांगत ही वंचिताची लढाई असल्याचे सांगितले. वामनराव चटप यांनी यावेळी जनतेने परिवर्तन महाशक्तीला साथ देण्याचे आवाहन केले.

दिल को देखो, चेहरा न देखो

- परिवर्तन महाशक्तीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, अशी विचारणा केली असता बच्चू कडू यांनी चेहरा वेळेवर दिला जाईल, असे सांगितले. राजू शेट्टी यांनी हा प्रश्न शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांनाही करा, अशी पत्रकारांनाच सूचना केली, तर वामनराव चटप यांनी ‘दिल को देखो, चेहरा न देखो’ म्हणत विषयाला बगल दिली.