शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पालक-विद्यार्थ्यांची संभ्रमाचीच परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST

नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. अजून शालेय शिक्षण विभागाने वेळापत्रकाशिवाय कोणतेही नियोजन केले नाही. यावर्षी विद्यार्थ्यांच्या ...

नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. अजून शालेय शिक्षण विभागाने वेळापत्रकाशिवाय कोणतेही नियोजन केले नाही. यावर्षी विद्यार्थ्यांच्या ड्रॉपआऊटचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या कोविडमुळे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.

पुढच्या महिन्यात इयत्ता १० वी व १२ ची शालांत प्रमाणपत्र परीक्षा होणार असून त्या आधी प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत गुणांच्या परीक्षा घ्यायच्या आहेत. पण कोरोनामुळे सर्वच जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्याने परीक्षेसंदर्भात बऱ्याच विषयावर अजूनही शालेय शिक्षण विभागामार्फत स्पष्टता करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाळा सुरूच झाल्या नाही, तर जिथे शाळा सुरू करण्यात आल्या त्यादेखील लवकरच बंद करण्यात आल्या. अचानक शाळा बंद झाल्याने ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आलेला नाही व अजूनही ग्रामीण भागातील ५० टक्के विद्यार्थी ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता व कुणाचाही जीव धोक्यात न येता कोरोनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करून परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने गठित केलेल्या समितीने महाराष्ट्रातील भौगोलिक, आर्थिक व सामाजिक विषमतेचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित आहे.

- शिक्षक संघटनांनी सुचविले बदल

१) शाळा तिथे केंद्र असावे .

२)परीक्षा ऑफलाइन घ्यावी.

३) अभ्यासक्रम ५० टक्के कमी करावा व अभ्यासक्रम कमी केल्याची तत्काळ घोषणा करावी.

४) उत्तरपत्रिका संकलन करणे, मूल्यमापनासाठी परीक्षकाकडे पाठविणे, समीक्षकाकडे सादर करणे या सर्व प्रक्रिया तालुका व जिल्हा स्तरावरच असाव्यात.

५) शक्य झाल्यास तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावी अन्यथा मागील वर्षीच्या प्रगतीवरून गुणदान करण्यात यावे.

६) पेपर पॅटर्न बदलून वस्तूनिष्ठ व लघुत्तरी प्रश्नांची संख्या जास्तीत जास्त असावी.

७) प्रश्नपत्रिकेचा कालावधी जास्तीत जास्त एक ते दीड तास करावा.

८) प्रश्नपत्रिका निम्म्या गुणांवर असावी व प्राप्त गुणांचे रूपांतर पूर्ण गुणात करावे.

९) परीक्षा केंद्रावर पालकांची गर्दी होणार नाही याची पोलीस व प्रशासनाने जबाबदारी घ्यावी.

१०) परीक्षेचे वेळापत्रक शक्यतो सकाळ पाळीतच असावे.

- विद्यार्थी, पालक, शाळांच्या हिताच्या दृष्टीने उपाययोजना करावी

आम्ही काही महत्त्वपूर्ण बदल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, अवर सचिव यांना पाठविले आहे. विद्यार्थी, पालक व शाळांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यात उपाययोजना करावी, अशी अपेक्षा भाजप शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉ. कल्पना पांडे यांनी केली आहे.