शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
3
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
4
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
5
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
6
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
7
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
8
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
9
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
10
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
11
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
12
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
13
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
14
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
15
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
16
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
17
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
18
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
19
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
20
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती

पालक-विद्यार्थ्यांची संभ्रमाचीच परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:13 IST

नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. अजून शालेय शिक्षण विभागाने वेळापत्रकाशिवाय कोणतेही नियोजन केले नाही. यावर्षी विद्यार्थ्यांच्या ...

नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. अजून शालेय शिक्षण विभागाने वेळापत्रकाशिवाय कोणतेही नियोजन केले नाही. यावर्षी विद्यार्थ्यांच्या ड्रॉपआऊटचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या कोविडमुळे विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.

पुढच्या महिन्यात इयत्ता १० वी व १२ ची शालांत प्रमाणपत्र परीक्षा होणार असून त्या आधी प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत गुणांच्या परीक्षा घ्यायच्या आहेत. पण कोरोनामुळे सर्वच जिल्ह्यातील शाळा बंद करण्यात आल्याने परीक्षेसंदर्भात बऱ्याच विषयावर अजूनही शालेय शिक्षण विभागामार्फत स्पष्टता करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाळा सुरूच झाल्या नाही, तर जिथे शाळा सुरू करण्यात आल्या त्यादेखील लवकरच बंद करण्यात आल्या. अचानक शाळा बंद झाल्याने ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आलेला नाही व अजूनही ग्रामीण भागातील ५० टक्के विद्यार्थी ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान न होता व कुणाचाही जीव धोक्यात न येता कोरोनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करून परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने गठित केलेल्या समितीने महाराष्ट्रातील भौगोलिक, आर्थिक व सामाजिक विषमतेचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित आहे.

- शिक्षक संघटनांनी सुचविले बदल

१) शाळा तिथे केंद्र असावे .

२)परीक्षा ऑफलाइन घ्यावी.

३) अभ्यासक्रम ५० टक्के कमी करावा व अभ्यासक्रम कमी केल्याची तत्काळ घोषणा करावी.

४) उत्तरपत्रिका संकलन करणे, मूल्यमापनासाठी परीक्षकाकडे पाठविणे, समीक्षकाकडे सादर करणे या सर्व प्रक्रिया तालुका व जिल्हा स्तरावरच असाव्यात.

५) शक्य झाल्यास तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घ्यावी अन्यथा मागील वर्षीच्या प्रगतीवरून गुणदान करण्यात यावे.

६) पेपर पॅटर्न बदलून वस्तूनिष्ठ व लघुत्तरी प्रश्नांची संख्या जास्तीत जास्त असावी.

७) प्रश्नपत्रिकेचा कालावधी जास्तीत जास्त एक ते दीड तास करावा.

८) प्रश्नपत्रिका निम्म्या गुणांवर असावी व प्राप्त गुणांचे रूपांतर पूर्ण गुणात करावे.

९) परीक्षा केंद्रावर पालकांची गर्दी होणार नाही याची पोलीस व प्रशासनाने जबाबदारी घ्यावी.

१०) परीक्षेचे वेळापत्रक शक्यतो सकाळ पाळीतच असावे.

- विद्यार्थी, पालक, शाळांच्या हिताच्या दृष्टीने उपाययोजना करावी

आम्ही काही महत्त्वपूर्ण बदल राज्याचे शालेय शिक्षण मंत्री, अवर सचिव यांना पाठविले आहे. विद्यार्थी, पालक व शाळांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यात उपाययोजना करावी, अशी अपेक्षा भाजप शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉ. कल्पना पांडे यांनी केली आहे.