शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

पालकांनो सावधान ! मुलांकडे वाहतूक परवाना आहे ना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 20:53 IST

उपराजधानीत वाहनचालकांकडून वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण वाढले असून अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तर बेदरकारपणे वाहने दामटताना दिसून येतात. मात्र असे प्रकार आता मुलांच्या पालकांची डोकेदुखी वाढविणारे ठरणार आहेत.

ठळक मुद्देमुलांकडून नियमभंगाची पालकांना शिक्षा : वाहतूक नियम मोडणे पडले महागातमागील वर्षी विशेष मोहिमेदरम्यान सहाशेहून अधिक पालकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत वाहनचालकांकडून वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण वाढले असून अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तर बेदरकारपणे वाहने दामटताना दिसून येतात. मात्र असे प्रकार आता मुलांच्या पालकांची डोकेदुखी वाढविणारे ठरणार आहेत. मागील वर्षी वाहतूक विभागाने अशा विद्यार्थ्यांविरोधात तीन दिवस विशेष मोहीम राबविली होती. यात सुमारे तीन हजार विद्यार्थी पोलिसांच्या  सापळ्यात  अडकले, तर मुलांनी केलेल्या नियमभंगासाठी सहाशेहून अधिक पालकांना कारवाईला सामोरे जावे लागले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे विचारणा केली होती. २०१७ मध्ये नियम तोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईसाठी मोहीम राबविण्यात आली होती का, किती विद्यार्थ्यांवर कारवाई झाली व पालकांना काही दंड झाला का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१७ मध्ये २६ जुलै ते २८ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेदरम्यान २,९४२ विद्यार्थ्यांवर नियम न पाळल्याबद्दल कारवाई करण्यात आली. तर मुलांनी नियम तोडल्याबद्दल ६२६ पालक किंवा वाहनमालकांवर कारवाई करण्यात आली. या कालावधीत १,१९२ वाहने ताब्यातदेखील घेण्यात आली. सर्वाधिक कारवाई ही वाहतूक पोलिसांच्या ‘चेंबर-२’द्वारे करण्यात आली. त्यांनी ८३८ विद्यार्थ्यांवर तसेच २३२ पालकांवर कारवाई केली. तर ४९४ वाहने ताब्यात घेतली.तीन दिवसांची कारवाई, कितपत प्रभावी ?दरम्यान, नागपूर शहरात अनेक विद्यार्थी परवान्याशिवायच वाहने चालविताना दिसून येतात. शिवाय ‘ट्रीपल सीट’, सिग्नल तोडणे, गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे, अतिवेग इत्यादी प्रकारे वाहतुकींच्या नियमांचा भंग करण्यात येतो. मागील वर्षी तीन दिवस कारवाई चालली. मात्र जर विद्यार्थी व पालकांमध्ये शिस्त आणायची असेल तर कारवाईचे प्रमाण वाढविण्याची गरज असून अशी विशेष मोहीम नियमितपणे राबविली गेली पाहिजे, असे मत अभय कोलारकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीCrimeगुन्हा