शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

पालकांनो सावधान ! मुलांकडे वाहतूक परवाना आहे ना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 20:53 IST

उपराजधानीत वाहनचालकांकडून वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण वाढले असून अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तर बेदरकारपणे वाहने दामटताना दिसून येतात. मात्र असे प्रकार आता मुलांच्या पालकांची डोकेदुखी वाढविणारे ठरणार आहेत.

ठळक मुद्देमुलांकडून नियमभंगाची पालकांना शिक्षा : वाहतूक नियम मोडणे पडले महागातमागील वर्षी विशेष मोहिमेदरम्यान सहाशेहून अधिक पालकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत वाहनचालकांकडून वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण वाढले असून अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तर बेदरकारपणे वाहने दामटताना दिसून येतात. मात्र असे प्रकार आता मुलांच्या पालकांची डोकेदुखी वाढविणारे ठरणार आहेत. मागील वर्षी वाहतूक विभागाने अशा विद्यार्थ्यांविरोधात तीन दिवस विशेष मोहीम राबविली होती. यात सुमारे तीन हजार विद्यार्थी पोलिसांच्या  सापळ्यात  अडकले, तर मुलांनी केलेल्या नियमभंगासाठी सहाशेहून अधिक पालकांना कारवाईला सामोरे जावे लागले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे विचारणा केली होती. २०१७ मध्ये नियम तोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईसाठी मोहीम राबविण्यात आली होती का, किती विद्यार्थ्यांवर कारवाई झाली व पालकांना काही दंड झाला का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१७ मध्ये २६ जुलै ते २८ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेदरम्यान २,९४२ विद्यार्थ्यांवर नियम न पाळल्याबद्दल कारवाई करण्यात आली. तर मुलांनी नियम तोडल्याबद्दल ६२६ पालक किंवा वाहनमालकांवर कारवाई करण्यात आली. या कालावधीत १,१९२ वाहने ताब्यातदेखील घेण्यात आली. सर्वाधिक कारवाई ही वाहतूक पोलिसांच्या ‘चेंबर-२’द्वारे करण्यात आली. त्यांनी ८३८ विद्यार्थ्यांवर तसेच २३२ पालकांवर कारवाई केली. तर ४९४ वाहने ताब्यात घेतली.तीन दिवसांची कारवाई, कितपत प्रभावी ?दरम्यान, नागपूर शहरात अनेक विद्यार्थी परवान्याशिवायच वाहने चालविताना दिसून येतात. शिवाय ‘ट्रीपल सीट’, सिग्नल तोडणे, गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे, अतिवेग इत्यादी प्रकारे वाहतुकींच्या नियमांचा भंग करण्यात येतो. मागील वर्षी तीन दिवस कारवाई चालली. मात्र जर विद्यार्थी व पालकांमध्ये शिस्त आणायची असेल तर कारवाईचे प्रमाण वाढविण्याची गरज असून अशी विशेष मोहीम नियमितपणे राबविली गेली पाहिजे, असे मत अभय कोलारकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीCrimeगुन्हा