शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

पंकज जुनघरे खूनप्रकरण : सर्व सहा जणांना आठ वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:49 IST

क्षुल्लक वादातून उद्भवलेले भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेलेल्या तरुणास सहा जणांनी बेदम मारहाण केली. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात खापा (ता. सावनेर) पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश रघुवंशी यांच्या न्यायालयाने सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर) : क्षुल्लक वादातून उद्भवलेले भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेलेल्या तरुणास सहा जणांनी बेदम मारहाण केली. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात खापा (ता. सावनेर) पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश रघुवंशी यांच्या न्यायालयाने सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.पंकज गोपाल जुनघरे (२५, रा. खापा, ता. सावनेर) असे मृताचे नाव असून, आरोपींमध्ये शुभम सुरेश बावनकुळे (२२), सतीश नामदेव जथरे (२०) या दोघांसह अन्य चार विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. खुनाची ही घटना १० एप्रिल २०१७ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नवीन वस्ती खापा येथे घडली होती. १० एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने खापा येथे शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यात पंकज त्याच्या मित्रासोबत सहभागी झाला होता. दरम्यान, आरोपीपैकी एकाने पंकजच्या मित्राला धक्का मारला. त्यामुळे मित्राने आरोपीला सहज विचारणा केली.काही वेळाने सहाही जणांनी एकत्र येत पंकजच्या मित्राला मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान, पंकज सर्वांची समजूत काढत भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेला. मात्र, त्या सहाही जणांनी पंकजलाच लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी त्याला लगेच खापा येथीन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.परिणामी, खापा पोलिसांनी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास भादंवि ३०४, १४३, १४७ अन्वये गुन्हा दाखल करून सहाही आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी संपूर्ण घटनेचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायाधीश रघुवंशी याच्या न्यायालयात सादर करीत प्रकरण न्यायप्रविष्ट केले. दरम्यान, सत्र न्यायाधीश रघुवंशी यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचे साक्षपुरावे तपासत तसेच युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना दोषी ठरविले. यात आरोपींना भादंवि ०३४ अन्वये सात वर्षे, भादंवि १४७ अन्वये एक वर्ष व भादंवि १४३ अन्वये चार महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली; शिवाय तिन्ही कलमान्वये एकूण ६,६०० रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेचा भरणा न केल्यास एकूण दोन महिने पाच दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Sessions Courtसत्र न्यायालयMurderखून