शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पंकज जुनघरे खूनप्रकरण : सर्व सहा जणांना आठ वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:49 IST

क्षुल्लक वादातून उद्भवलेले भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेलेल्या तरुणास सहा जणांनी बेदम मारहाण केली. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात खापा (ता. सावनेर) पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश रघुवंशी यांच्या न्यायालयाने सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (सावनेर) : क्षुल्लक वादातून उद्भवलेले भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेलेल्या तरुणास सहा जणांनी बेदम मारहाण केली. त्यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. या खून प्रकरणात खापा (ता. सावनेर) पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश रघुवंशी यांच्या न्यायालयाने सर्व आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.पंकज गोपाल जुनघरे (२५, रा. खापा, ता. सावनेर) असे मृताचे नाव असून, आरोपींमध्ये शुभम सुरेश बावनकुळे (२२), सतीश नामदेव जथरे (२०) या दोघांसह अन्य चार विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. खुनाची ही घटना १० एप्रिल २०१७ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास नवीन वस्ती खापा येथे घडली होती. १० एप्रिल रोजी हनुमान जयंती असल्याने खापा येथे शोभायात्रा काढण्यात आली होती. त्यात पंकज त्याच्या मित्रासोबत सहभागी झाला होता. दरम्यान, आरोपीपैकी एकाने पंकजच्या मित्राला धक्का मारला. त्यामुळे मित्राने आरोपीला सहज विचारणा केली.काही वेळाने सहाही जणांनी एकत्र येत पंकजच्या मित्राला मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान, पंकज सर्वांची समजूत काढत भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेला. मात्र, त्या सहाही जणांनी पंकजलाच लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने नागरिकांनी त्याला लगेच खापा येथीन प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.परिणामी, खापा पोलिसांनी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास भादंवि ३०४, १४३, १४७ अन्वये गुन्हा दाखल करून सहाही आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी संपूर्ण घटनेचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायाधीश रघुवंशी याच्या न्यायालयात सादर करीत प्रकरण न्यायप्रविष्ट केले. दरम्यान, सत्र न्यायाधीश रघुवंशी यांच्या न्यायालयाने दोन्ही बाजूंचे साक्षपुरावे तपासत तसेच युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना दोषी ठरविले. यात आरोपींना भादंवि ०३४ अन्वये सात वर्षे, भादंवि १४७ अन्वये एक वर्ष व भादंवि १४३ अन्वये चार महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली; शिवाय तिन्ही कलमान्वये एकूण ६,६०० रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेचा भरणा न केल्यास एकूण दोन महिने पाच दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Sessions Courtसत्र न्यायालयMurderखून