शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
5
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
6
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
7
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
8
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
9
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
10
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
11
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
12
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
13
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
14
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
15
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
16
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
17
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
18
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
19
IPL Auction 2026 LIVE: नवोदित कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, अकिब जावेदवर पैशांचा पाऊस, लागल्या विक्रमी बोली
20
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे ग्रामसभा तपासणार, शेतकऱ्यांना मिळणार त्रिस्तरीय मदत : पालकमंत्री बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 20:29 IST

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाकडून शेतकऱ्यांना त्रिस्तरीय मदत मिळणार आहे. नुकसानीसंदर्भातील पंचनामे स्वत: ग्रामसभा तपासणार असून एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात १०,८६० हेक्टरवर नुकसान, प्राथमिक अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाकडून शेतकऱ्यांना त्रिस्तरीय मदत मिळणार आहे. नुकसानीसंदर्भातील पंचनामे स्वत: ग्रामसभा तपासणार असून एकही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.परतीच्या पावसाने गेल्या दोन महिन्यात सुमारे ३२ हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतातील पिकाचे नुकसान झाले असून नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही. तसेच येत्या ११ नोव्हेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसभा घ्या. पंचनामे करून ग्रामपंचायतींना सर्वेक्षणाचे अहवाल सोपवा. ग्रामसभा ते अहवाल तपासतील, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांनी घेतली. या बैठकीला आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, माजी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, आ. कृष्णा खोपडे, कृषी अधिकारी शेंडे उपस्थित होते. या संदर्भात आयोजित पत्रपरिषदेत पालकमंत्र्यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात १०,८६० हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, धान, संत्रा या पिकांचे नुकसान झाले असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे २१,९५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यापूर्वी जुलैमधील पावसाने ३९९३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची आकडेवारी कृषी विभागाने या बैठकीत सादर केली.येत्या ११, १२ व १३ नोव्हेंबरला जिल्ह्यातील ७७८ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा घेऊन प्रशासनाने केलेले सर्वेक्षणाचे अहवाल ग्रामसभेत द्या. ग्रामसभा ते अहवाल तपासतील. या ग्रामसभांना लोकप्रतिनिधी, तलाठी, कृषी सहायक हजर राहतील. त्यानंतर तहसिलदार, कृषी विकास अधिकारी हे अहवाल अंतिम करतील व त्या अहवालाची प्रत आमदारांना देतील. शेवटी उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे हे अहवाल तपासून १५ नोव्हेंबरपर्यंत शासनाला पाठविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. प्रत्येक सर्वेक्षणावर कृषी सहायक, तलाठी आणि सरपंचाची स्वाक्षरी असली पाहिजे.काटोल, नरखेड भागातील संत्र्याच्या पिकाचे नुकसान किती झाले, याचे सर्वेक्षणच कृषी विभागाने केले नाही. मात्र शेतकऱ्यांनी ९० टक्के संत्रा आणि कापसाचे पीक नष्ट झाल्याचा दावा केला आहे. तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.पंतप्रधान किसान योजनेंतर्गत १ लाख २९ हजार शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे. ३९ हजार शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. एकही शेतकरी नुकसानापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. रब्बीच्या हंगामासाठी १५ हजार क्विंटल हरभरा आणि ६ हजार क्विंटल गव्हाचे लक्ष्य आहे. पण ५ हजार क्विंटल गहू, हरभरा अनुदानातून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून आली आहे, असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.पीक विमा अधिकाऱ्यांच्या नावांची लागणार यादी५१ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून, प्रत्येक ग्रामपंचायतीत पीक विमा कंपनीच्या समन्वयकाचे नाव व मोबाईल नंबर ग्रामपंचायतीत फलकावर लावण्यात येईल. त्यामुळे पीक विमा कंपनीचा समन्वयक कोण आहे, याची माहिती शेतकऱ्यांना मिळेल. येत्या दोन-तीन दिवसात असे फलक लावण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.अशी मिळणार मदतमदतीसंदर्भात शासनाच्या स्थायी सूचना आहेत. या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळेल. त्याचप्रमाणे सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसारही मदत देण्यात येईल. ही रक्कम सरकार जाहीर करेल. तसेच विमा काढणाऱ्यांनाही विमा कंपनीकडून नुकसानापोटी मदत देण्यात येईल. अशी तीनस्तरीय मदत शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेFarmerशेतकरी