शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रंग विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरील उडाले रंग; टाळेबंदीमुळे व्यापार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 10:53 IST

Nagpur News कोरोना संसर्गामुळे २१ मार्चपर्यंत टाळेबंदी कठोर आहे. संसर्गाचा प्रकोपही वाढतोच आहे. त्यामुळे, टाळेबंदीबाबत संभ्रमही कायम आहे. त्यामुळे, रंग-गुलालाचा व्यापार करणाऱ्यांमध्ये धास्ती आहे.

ठळक मुद्देगोदामांत पडलीय कोट्यवधींची सामग्री

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : २८ मार्चला होलिका दहन आणि २९ मार्चला धुळवड आहे. कोरोना संसर्गामुळे २१ मार्चपर्यंत टाळेबंदी कठोर आहे. संसर्गाचा प्रकोपही वाढतोच आहे. त्यामुळे, टाळेबंदीबाबत संभ्रमही कायम आहे. त्यामुळे, रंग-गुलालाचा व्यापार करणाऱ्यांमध्ये धास्ती आहे. गोदामांमध्ये कोट्यवधी रुपयांचे रंग-गुलाल, पिचकारी, मुखवटे, पोंगे आदी पडलेले आहेत. दुकाने बंद असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडालेले आहेत. साठवणूकदरांचा किरकोळ व्यापारी, ठोक व्यापाऱ्यांशी संपर्क होत नाही. खरेदी केल्यानंतर गुंतवणूक तरी निघेल का, हा प्रश्न व्यापाऱ्यांच्या मनात आहे. अशा संभ्रमावस्थेमुळे सर्वच बेजार झाले आहेत.

२१ मार्चनंतर टाळेबंदी आणखी वाढली तरी ठोक व्यापाऱ्यांचा तोटा निश्चित आहे. डिसेंबरपर्यंत कोरोना नियंत्रणाची शक्यता वाढल्यामुळे, अन्य जिल्ह्यांतून रंग व गुलालाची सामग्री मागवण्यात आली होती. परंतु, ऐन उत्सवाच्या काळात पुन्हा टाळेबंदी झाली आणि व्यापारी वर्ग संकटात सापडला आहे. २२ मार्चनंतर टाळेबंदी संपेल आणि बाजारपेठा उघडल्यावर किमान गुंतवणूक तरी निघेल, अशी अपेक्षा व्यापारी करत आहेत.

रंगांचे ठोक व्यापारी श्वेतांग खोब्रागडे यांनी सांगितल्यानुसार, कोरोना संक्रमणामुळे व्यापारातील व्यवहारात परिवर्तन आले आहे. सामग्रीसाठी ॲडव्हान्स देणे गरजेचे असते. दिवाळीनंतर होळीची तयारी सुरू होत असते. रंगांचे निर्माण आणि व्यवसाय सुरू होतो. डिसेंबरपासून ठोक व्यापाऱ्यांनी सोलापूर आदी ठिकाणांहून रंग, गुलाल, पिचकारी, मुखवटे आदी मागवण्यास सुरुवात केली होती. त्याचे पेमेंटही दिले गेले आहे. आता व्यापारच बंद पडल्याने लागत काढणेही कठीण झाले आहे.

दुसऱ्या जिल्ह्यांतून व्यापारी येण्यास कचरत आहेत

नागपुरात स्थानिक व्यापाऱ्यांसोबतच नजीकच्या जिल्ह्यांतून किरकोळ व्यापारी रंग आणि अन्य सामग्री घेण्यास येत असतात. महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने कठोर निर्देश दिले असल्याने, अन्य राज्यांतील व्यापारीही नागपुरात पोहोचत नाहीत. स्थानिक किरकोळ व्यापारीही टाळेबंदी संपण्याची वाट बघत आहेत.१० टक्क्यांचीसुद्धा विक्री नाही

होळीपूर्वी दोन महिने आधी रंगांचा व्यापार सुरू होत असतो. किरकोळ व्यापारी, ठोक व्यापाऱ्यांशी संपर्क साधत असतात. दोन आठवड्यापूर्वी खरेदी-विक्रीला गती प्राप्त होते. पंरतु, कोरोनामुळे यंदा दहा टक्केही व्यवहार झालेले नाहीत. ९० टक्के सामग्री ठोक व्यापाऱ्यांकडेच पडून आहे.

.............

टॅग्स :Holiहोळी