शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

पहुर विकास आघाडी  म्हणते, मनं काय जोडता; नदी जोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 21:54 IST

सध्या ‘मन की बात’वर जोरदार चर्चा केली जाते. त्याद्वारे काय साध्य होणार, त्याचे फलित काय, हा प्रश्नच आहे. खरंच ‘मन की बात’ केल्याने मनं जुळतात काय, मनं जोडण्याऐवजी नदी जोडा, शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील, ही आशा आहे जामनेर (जि. जळगाव) येथील पहुर विकास आघाडीला.

ठळक मुद्देउपोषणाचे सहावे वर्ष : न्याय कधी मिळणार?

गणेश खवसे ऑनलाईन लोकमतनागपूर : सध्या ‘मन की बात’वर जोरदार चर्चा केली जाते. त्याद्वारे काय साध्य होणार, त्याचे फलित काय, हा प्रश्नच आहे. खरंच ‘मन की बात’ केल्याने मनं जुळतात काय, मनं जोडण्याऐवजी नदी जोडा, शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील, ही आशा आहे जामनेर (जि. जळगाव) येथील पहुर विकास आघाडीला. नदी जोड प्रकल्पासाठी या आघाडीतर्फे सातत्याने धरणे आंदोलन, उपोषण केले जात आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त पुन्हा एकदा ही समिती न्याय्य हक्कासाठी मैदानात उतरली आहे. या संघटनेचे आंदोलनाचे हे सहावे वर्ष आहे, हे विशेष!तापी ते वाघूर नदी जोड प्रकल्प राबविण्यात यावा, या मागणीसाठी सुकलाल बारी यांच्या नेतृत्वात गेल्या सहा वर्षांपासून आंदोलन करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा, बोदवड, सोयगाव ही चारही तालुके कमी पर्जन्यमान क्षेत्रात येतात. त्यामुळे या तालुक्यांमध्ये सतत दुष्काळसदृश स्थिती असते. या तालुक्यांमध्ये पाण्याची पातळी ७०० फुटांपर्यंत खालावलेली असून भविष्यात पाण्याची गंभीर समस्या उद्भवणार आहे.पिण्यासाठीच पाणी मिळणार नाही तिथे सिंचनासाठी तरी मिळणार काय, हा बिकट प्रश्न आहे. यामुळे यातून वाचण्यासाठी ‘नदी जोड’ प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. मुक्ताईनगरपासून आलेल्या तापी नदीतील पाणी कांग नदीत आणि वाघूर नदीत पाटाद्वारे टाकावे. त्यामुळे वाघूर नदीत पाणी येऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. विहिरी, तलावांमध्ये पाणी राहील. पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊन सिंचनासाठी त्याचा मोठा हातभार लागून शेतकरी संपन्न होईल. ही बाब पटवून देण्यासाठी धरणे आंदोलन, साखळी उपोषण, आमरण उपोषण असे आंदोलनाचे अस्त्र वापरून वाघूर विकास आघाडीने शासनाचे लक्ष वेधले. परंतु त्याचा काहीएक फायदा झालेला नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातील आणि त्यांच्याच मतदारसंघात चक्क पाणी मिळण्यासाठी अशाप्रकारचे आंदोलन करावे लागत आहे, हे विशेष! हिवाळी अधिवेशनानिमित्त पुन्हा एकदा वाघूर विकास आघाडीतर्फे धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यात सुकलाल बारी यांच्यासह भाऊराव गोंदनखेडे, रमेश पाटील, गजानन पाटील, अशोक जाधव, रामचंद्र पाटील, रवींद्र पांढरे, सुनील सोनार, भागवत पाटील, डॉ. मनोहर पाटील आदी सहभागी झाले आहेत.वैयक्तिक नव्हे जनहिताची मागणी!हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे - आंदोलन, उपोषण मंडपांनी पटवर्धन मैदान व्यापले आहे. धरणे आंदोलन करणाºया संघटना हा विशेषत: वैयक्तिक, स्वत:च्या मागण्यासाठी किंवा समाजाच्या, एका विशेष वर्गाच्या मागण्यांसाठी मैदानात उतरल्या आहेत. मात्र वाघूर विकास आघाडीतर्फे वैयक्तिक नव्हे तर जनहिताच्या मागणीसाठी साखळी उपोषण केले जात आहे. नदी जोड प्रकल्प राबविल्यास उपोषणकर्त्यांना त्याचा फायदा होणार असून त्यांच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील नागरिकांना हितकारक ठरेल, हे विशेष! याच मागणीसाठी गेल्या सहा वर्षांपासून प्रत्येक हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन, उपोषण करण्यात येत आहे. २०१२ मध्ये आमरण उपोषणाचा मार्गही सुकलाल बारी यांनी पत्करला. दरम्यान त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तीन दिवस रुग्णालयात तर एक दिवस पोलीस ठाण्यातही ठेवले. परंतु त्यानंतरही त्यांनी आंदोलनाचा मार्ग जनहितासाठी सोडला नाही. नदी जोड प्रकल्प राबवित नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला.

टॅग्स :riverनदीNagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशन