शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मालकी पट्ट्यासाठी सेवाग्राम ते दिल्ली सायकल मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 21:24 IST

अतिक्रमणधारकांना मालकी पट्टे देण्याच्या मागणीसाठी एकदा वर्धा ते नागपूर ८५ किलोमीटरची पदयात्रा व नंतर पावसाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा काढल्यानंतरही राज्य शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे राज्य शासनावर खोटेपणाचा आरोप करीत वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमणधारकांसाठी लढणाऱ्या युवा संघटनेने थेट पंतप्रधान मोदींना साकडे घालण्यासाठी बापुकुटी, सेवाग्राम ते दिल्ली सायकल मार्च काढला आहे. ‘देव (देवेंद्र) से महादेव (नरेंद्र मोदी) तक’ या शिर्षकाखाली सुरू झालेले हे सायकल आंदोलन मंगळवारी नागपूरला पोहचले.

ठळक मुद्देराज्य शासनावरून उडाला विश्वास : पंतप्रधान मोदींना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिक्रमणधारकांना मालकी पट्टे देण्याच्या मागणीसाठी एकदा वर्धा ते नागपूर ८५ किलोमीटरची पदयात्रा व नंतर पावसाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा काढल्यानंतरही राज्य शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे राज्य शासनावर खोटेपणाचा आरोप करीत वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमणधारकांसाठी लढणाऱ्या युवा संघटनेने थेट पंतप्रधान मोदींना साकडे घालण्यासाठी बापुकुटी, सेवाग्राम ते दिल्ली सायकल मार्च काढला आहे. ‘देव (देवेंद्र) से महादेव (नरेंद्र मोदी) तक’ या शिर्षकाखाली सुरू झालेले हे सायकल आंदोलन मंगळवारी नागपूरला पोहचले.‘युवा, परिवर्तन की आवाज’ या संघटनेच्या माध्यमातून निहाल पांडे यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमणधारक व जबरानजोतधारकांचा लढा लढविला जात आहे. २३ जुलै रोजी बापुकुटी, सेवाग्राम येथून यात्रेला सुरुवात करण्यात आली. मंगळवारी या आंदोलनकर्त्यांनी नागपूरला धडक दिली. या आंदोलनात संघटनेच्या ५६ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला असून मार्गात येणाºया ५६ जिल्ह्याच्या ठिकाणी मुक्काम करून दिल्लीला पोहचतील. हा १३०० किलोमीटरचा प्रवास करून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागण्यांचे निवेदन देणार आहेत. बुधवारी सकाळी ते दिल्लीकडे रवाना होतील.निहाल पांडे यांनी सांगितले, केंद्र व राज्य शासन गरिबांना घरे देण्याचा दावा करते. मात्र जे लोक ४०-५० वर्षापासून ज्या ठिकाणी राहतात त्यांना स्वमालकीचे पट्टे देण्यात येत नाही. त्यासाठी नियम, कायद्याची कारणे दिली जातात. २३ मार्च रोजी संघटनेच्यावतीने हजारो लोक ८५ किलोमीटरची पदयात्रा करून वर्ध्याहून नागपूरला आले होते. पण मुख्यमंत्र्यांनी पाठ दाखविली. पुन्हा ५ जुलै रोजी विधानसभेवर मोर्चा काढला, मात्र तेव्हाही त्यांनी भेट दिली नाही. यामुळे थेट पंतप्रधानांचा घेराव करू असा इशारा त्यांनी दिला. अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी मोफत घरपट्टे मिळावे,शेतकºयांचे सर्व प्रश्न निकाल लावून स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी,देशात होणारे महिला अत्याचाºयांवर कठोर कार्यवाही, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आदी मागण्यांचे निवेदन त्यानंतर देणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.पालाश उमाटे,सौरभ माकोडे, समीर गिरी, पंकज गणोरे ,अक्षय बाळसराफ, सोनू दाते, स्वप्नील बावणे, आदित्य भेंडे ,विवेक राऊत ,मयूर नेहारे , निखिल नेहारे, सुमित सोनटक्के, संदीप मारवाडी, आतिष ठवकर, अक्षय ठवकर, सोनू गिले, आमीन शेख , सोमा पेंदोर , राजू मडावी, चंद्रभान मडावी , बंडू जुमडे , नितेश जुमडे, शंकर शिरनाथे आदींचा सहभाग आहे.

 

टॅग्स :Morchaमोर्चाnagpurनागपूर