शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

मालकी पट्ट्यासाठी सेवाग्राम ते दिल्ली सायकल मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 21:24 IST

अतिक्रमणधारकांना मालकी पट्टे देण्याच्या मागणीसाठी एकदा वर्धा ते नागपूर ८५ किलोमीटरची पदयात्रा व नंतर पावसाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा काढल्यानंतरही राज्य शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे राज्य शासनावर खोटेपणाचा आरोप करीत वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमणधारकांसाठी लढणाऱ्या युवा संघटनेने थेट पंतप्रधान मोदींना साकडे घालण्यासाठी बापुकुटी, सेवाग्राम ते दिल्ली सायकल मार्च काढला आहे. ‘देव (देवेंद्र) से महादेव (नरेंद्र मोदी) तक’ या शिर्षकाखाली सुरू झालेले हे सायकल आंदोलन मंगळवारी नागपूरला पोहचले.

ठळक मुद्देराज्य शासनावरून उडाला विश्वास : पंतप्रधान मोदींना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिक्रमणधारकांना मालकी पट्टे देण्याच्या मागणीसाठी एकदा वर्धा ते नागपूर ८५ किलोमीटरची पदयात्रा व नंतर पावसाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चा काढल्यानंतरही राज्य शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे राज्य शासनावर खोटेपणाचा आरोप करीत वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमणधारकांसाठी लढणाऱ्या युवा संघटनेने थेट पंतप्रधान मोदींना साकडे घालण्यासाठी बापुकुटी, सेवाग्राम ते दिल्ली सायकल मार्च काढला आहे. ‘देव (देवेंद्र) से महादेव (नरेंद्र मोदी) तक’ या शिर्षकाखाली सुरू झालेले हे सायकल आंदोलन मंगळवारी नागपूरला पोहचले.‘युवा, परिवर्तन की आवाज’ या संघटनेच्या माध्यमातून निहाल पांडे यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यातील अतिक्रमणधारक व जबरानजोतधारकांचा लढा लढविला जात आहे. २३ जुलै रोजी बापुकुटी, सेवाग्राम येथून यात्रेला सुरुवात करण्यात आली. मंगळवारी या आंदोलनकर्त्यांनी नागपूरला धडक दिली. या आंदोलनात संघटनेच्या ५६ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला असून मार्गात येणाºया ५६ जिल्ह्याच्या ठिकाणी मुक्काम करून दिल्लीला पोहचतील. हा १३०० किलोमीटरचा प्रवास करून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागण्यांचे निवेदन देणार आहेत. बुधवारी सकाळी ते दिल्लीकडे रवाना होतील.निहाल पांडे यांनी सांगितले, केंद्र व राज्य शासन गरिबांना घरे देण्याचा दावा करते. मात्र जे लोक ४०-५० वर्षापासून ज्या ठिकाणी राहतात त्यांना स्वमालकीचे पट्टे देण्यात येत नाही. त्यासाठी नियम, कायद्याची कारणे दिली जातात. २३ मार्च रोजी संघटनेच्यावतीने हजारो लोक ८५ किलोमीटरची पदयात्रा करून वर्ध्याहून नागपूरला आले होते. पण मुख्यमंत्र्यांनी पाठ दाखविली. पुन्हा ५ जुलै रोजी विधानसभेवर मोर्चा काढला, मात्र तेव्हाही त्यांनी भेट दिली नाही. यामुळे थेट पंतप्रधानांचा घेराव करू असा इशारा त्यांनी दिला. अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी मोफत घरपट्टे मिळावे,शेतकºयांचे सर्व प्रश्न निकाल लावून स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी,देशात होणारे महिला अत्याचाºयांवर कठोर कार्यवाही, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती आदी मागण्यांचे निवेदन त्यानंतर देणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.पालाश उमाटे,सौरभ माकोडे, समीर गिरी, पंकज गणोरे ,अक्षय बाळसराफ, सोनू दाते, स्वप्नील बावणे, आदित्य भेंडे ,विवेक राऊत ,मयूर नेहारे , निखिल नेहारे, सुमित सोनटक्के, संदीप मारवाडी, आतिष ठवकर, अक्षय ठवकर, सोनू गिले, आमीन शेख , सोमा पेंदोर , राजू मडावी, चंद्रभान मडावी , बंडू जुमडे , नितेश जुमडे, शंकर शिरनाथे आदींचा सहभाग आहे.

 

टॅग्स :Morchaमोर्चाnagpurनागपूर