शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

महिलांविरोधातील सामाजिक कुप्रथा उखडून फेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 22:38 IST

‘तिहेरी तलाक’ पद्धतीला अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये बंदी आहे किंवा त्यात बदल तरी करण्यात आले आहे. परंतु आपल्या देशात सामाजिक कुप्रथांविरोधात आवाज उठवला की लगेच धार्मिक व सामाजिक मुद्दे उपस्थित करून त्याला विरोध होतो. परंतु आता महिलांविरोधातील सामाजिक कुप्रथा उखडून फेकण्याची वेळ आली आहे व त्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मुस्लिम महिला आंदोलनकर्त्या शायरा बानो यांनी केले.

ठळक मुद्देशायरा बानो : ‘भारतीय स्त्री शक्ती’ अधिवेशनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘तिहेरी तलाक’ पद्धतीला अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये बंदी आहे किंवा त्यात बदल तरी करण्यात आले आहे. परंतु आपल्या देशात सामाजिक कुप्रथांविरोधात आवाज उठवला की लगेच धार्मिक व सामाजिक मुद्दे उपस्थित करून त्याला विरोध होतो. परंतु आता महिलांविरोधातील सामाजिक कुप्रथा उखडून फेकण्याची वेळ आली आहे व त्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मुस्लिम महिला आंदोलनकर्त्या शायरा बानो यांनी केले. भारतीय स्त्रीशक्तीतर्फे नागपुरात २७ जानेवारीपासून दोन दिवसीय त्रिदशकपूर्ती राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित या अधिवेशनाला राज्यसभा खासदार संपतिया उईके, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, महापौर नंदा जिचकार, अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष कांचन गडकरी, आरोग्यतज्ज्ञ डॉ.प्रभा चंद्रा, स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयश्री के.एस., सचिव कुमुदिनी भार्गव, अधिवेशन प्रमुख हर्षदा पुरेकर या प्रामुख्याने उपस्थित होत्या.‘तिहेरी तलाक’ हा महिलांचे शोषण करणाराच प्रकार होता. अशा अनेक कुप्रथा समाजात अस्तित्वात आहे. मुळात ‘तलाक’चा अधिकार पुरुषांनाच का, असा प्रश्न यावेळी बानो यांनी उपस्थित केला. महिलांच्या मौलिक अधिकारांचे संवर्धन व्हायला हवे. ‘तिहेरी तलाक’ पद्धती हद्दपार केल्याबाबत केंद्र सरकारचे मुस्लिम महिलांनी आभारच मानायला हवे, असे बानो म्हणाल्या. अनेक वर्षांपासून पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिलांचे दमन झाले. मात्र आता त्यांना आरक्षणामुळे नेतृत्वाची संधी मिळाली आहे. या संधींचा उपयोग करण्यासाठी आपण तयार आहोत का, याचे महिलांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. राजकीय क्षेत्रातील महिलांना तर आणखी तयारीची आवश्यकता आहे. अनेक महिला शिकतात. मात्र शिक्षणाचा त्या योग्य उपयोग करतीलच असे नाही. महिला पूर्णपणे स्वावलंबी झाल्या नसल्याचे चित्र आहे, असे प्रतिपादन नंदा जिचकार यांनी केले.यावेळी डॉ. प्रभा चंद्रा यांचा ‘वाटी’ राष्ट्रीय पुरस्कार व सन्मानपत्र देउन सत्कार करण्यात आला. स्त्री शक्तीच्यावतीने काढण्यात आलेल्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. अधिवेशनाला देशभरातून १२०० हून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत. कुमुदिनी भार्गव यांनी प्रास्ताविक केले. रागिणी चंद्रात्रे यांनी संचालन केले तर हर्षा पुरेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Womenमहिलाnagpurनागपूर