शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

महिलांविरोधातील सामाजिक कुप्रथा उखडून फेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 22:38 IST

‘तिहेरी तलाक’ पद्धतीला अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये बंदी आहे किंवा त्यात बदल तरी करण्यात आले आहे. परंतु आपल्या देशात सामाजिक कुप्रथांविरोधात आवाज उठवला की लगेच धार्मिक व सामाजिक मुद्दे उपस्थित करून त्याला विरोध होतो. परंतु आता महिलांविरोधातील सामाजिक कुप्रथा उखडून फेकण्याची वेळ आली आहे व त्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मुस्लिम महिला आंदोलनकर्त्या शायरा बानो यांनी केले.

ठळक मुद्देशायरा बानो : ‘भारतीय स्त्री शक्ती’ अधिवेशनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘तिहेरी तलाक’ पद्धतीला अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये बंदी आहे किंवा त्यात बदल तरी करण्यात आले आहे. परंतु आपल्या देशात सामाजिक कुप्रथांविरोधात आवाज उठवला की लगेच धार्मिक व सामाजिक मुद्दे उपस्थित करून त्याला विरोध होतो. परंतु आता महिलांविरोधातील सामाजिक कुप्रथा उखडून फेकण्याची वेळ आली आहे व त्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन मुस्लिम महिला आंदोलनकर्त्या शायरा बानो यांनी केले. भारतीय स्त्रीशक्तीतर्फे नागपुरात २७ जानेवारीपासून दोन दिवसीय त्रिदशकपूर्ती राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित या अधिवेशनाला राज्यसभा खासदार संपतिया उईके, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, महापौर नंदा जिचकार, अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष कांचन गडकरी, आरोग्यतज्ज्ञ डॉ.प्रभा चंद्रा, स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयश्री के.एस., सचिव कुमुदिनी भार्गव, अधिवेशन प्रमुख हर्षदा पुरेकर या प्रामुख्याने उपस्थित होत्या.‘तिहेरी तलाक’ हा महिलांचे शोषण करणाराच प्रकार होता. अशा अनेक कुप्रथा समाजात अस्तित्वात आहे. मुळात ‘तलाक’चा अधिकार पुरुषांनाच का, असा प्रश्न यावेळी बानो यांनी उपस्थित केला. महिलांच्या मौलिक अधिकारांचे संवर्धन व्हायला हवे. ‘तिहेरी तलाक’ पद्धती हद्दपार केल्याबाबत केंद्र सरकारचे मुस्लिम महिलांनी आभारच मानायला हवे, असे बानो म्हणाल्या. अनेक वर्षांपासून पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिलांचे दमन झाले. मात्र आता त्यांना आरक्षणामुळे नेतृत्वाची संधी मिळाली आहे. या संधींचा उपयोग करण्यासाठी आपण तयार आहोत का, याचे महिलांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. राजकीय क्षेत्रातील महिलांना तर आणखी तयारीची आवश्यकता आहे. अनेक महिला शिकतात. मात्र शिक्षणाचा त्या योग्य उपयोग करतीलच असे नाही. महिला पूर्णपणे स्वावलंबी झाल्या नसल्याचे चित्र आहे, असे प्रतिपादन नंदा जिचकार यांनी केले.यावेळी डॉ. प्रभा चंद्रा यांचा ‘वाटी’ राष्ट्रीय पुरस्कार व सन्मानपत्र देउन सत्कार करण्यात आला. स्त्री शक्तीच्यावतीने काढण्यात आलेल्या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. अधिवेशनाला देशभरातून १२०० हून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत. कुमुदिनी भार्गव यांनी प्रास्ताविक केले. रागिणी चंद्रात्रे यांनी संचालन केले तर हर्षा पुरेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Womenमहिलाnagpurनागपूर