शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

गरिबी दूर करण्यासाठी वंचितांचा अभ्यास हवा

By admin | Updated: December 2, 2014 00:37 IST

स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही देशात ७० टक्के जनता ही मूलभूत समस्यांचा सामना करीत आहे. आज देशातील गरिबीची समस्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही समस्या

आशिष कोठारी : राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृती व्याख्यानमाला संपन्ननागपूर : स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही देशात ७० टक्के जनता ही मूलभूत समस्यांचा सामना करीत आहे. आज देशातील गरिबीची समस्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मूलभूत गरजांपासून किती लोक वंचित आहेत याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत पुणे येथील कल्पवृक्ष संस्थचे डॉ. आशिष कोठारी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने दीक्षांत सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘इकॉलॉजिकल स्वराज : अ‍ॅन आॅल्टरनेटिव्ह टू डिस्ट्रक्टिव्ह ग्लोबलायझेशन’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्रीमंत अब्जोधीश होत आहते तर गरीब आहे तिथेच आहे. ही दरी वाढण्यासाठी जागतिकीकरणाची सुंदर आणि देखणी वाटणारी संकल्पना काही प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. कुठलीही धोरणे आखताना देशातील भांडवलदारांचा नव्हे तर सामान्य माणसाचा विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.प्रत्यक्षात जागतिकीकरण ही भांडवलशाहीच्या जागतिकीकरणाची प्रक्रिया आहे आणि जो घाट तयार होत आहे तो जागतिकीकृत भांडवलशाहीचा आहे हे ध्यानात घेणे आवश्यक आह,े असेही त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, डॉ. भारती उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. भारती यांनी केले. कार्यक्रमाला विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)