शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

गरिबी दूर करण्यासाठी वंचितांचा अभ्यास हवा

By admin | Updated: December 2, 2014 00:37 IST

स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही देशात ७० टक्के जनता ही मूलभूत समस्यांचा सामना करीत आहे. आज देशातील गरिबीची समस्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही समस्या

आशिष कोठारी : राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृती व्याख्यानमाला संपन्ननागपूर : स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरही देशात ७० टक्के जनता ही मूलभूत समस्यांचा सामना करीत आहे. आज देशातील गरिबीची समस्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी मूलभूत गरजांपासून किती लोक वंचित आहेत याचा अभ्यास करण्याची गरज आहे, असे मत पुणे येथील कल्पवृक्ष संस्थचे डॉ. आशिष कोठारी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने दीक्षांत सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मृृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘इकॉलॉजिकल स्वराज : अ‍ॅन आॅल्टरनेटिव्ह टू डिस्ट्रक्टिव्ह ग्लोबलायझेशन’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्रीमंत अब्जोधीश होत आहते तर गरीब आहे तिथेच आहे. ही दरी वाढण्यासाठी जागतिकीकरणाची सुंदर आणि देखणी वाटणारी संकल्पना काही प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते. कुठलीही धोरणे आखताना देशातील भांडवलदारांचा नव्हे तर सामान्य माणसाचा विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.प्रत्यक्षात जागतिकीकरण ही भांडवलशाहीच्या जागतिकीकरणाची प्रक्रिया आहे आणि जो घाट तयार होत आहे तो जागतिकीकृत भांडवलशाहीचा आहे हे ध्यानात घेणे आवश्यक आह,े असेही त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, डॉ. भारती उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. भारती यांनी केले. कार्यक्रमाला विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)