शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
“या अधिवेशनात...”; विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी
3
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
4
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
5
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
6
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
7
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
8
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
9
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
10
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
11
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
12
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
13
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
14
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
15
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
16
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
17
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
18
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
19
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
20
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ५० हजारांहून अधिक रोहिंग्या : गिरीश व्यास यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:32 IST

नागपुरात तर ५० हजारांहून अधिक रोहिंग्या राहतात. यातील काही तत्त्वांच्या माध्यमातून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ.गिरीश व्यास यांनी केला आहे.

ठळक मुद्देराज्यातील घुसखोरांवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : उपराजधानीसह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अवैधरीत्या बांगलादेशी तसेच रोहिंग्या राहत आहेत. त्यांची पोलिसांनादेखील सखोल माहिती आहे. नागपुरात तर ५० हजारांहून अधिक रोहिंग्या राहतात. यातील काही तत्त्वांच्या माध्यमातून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ.गिरीश व्यास यांनी केला आहे. सोमवारी नागपूर टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.देशात ‘सीएए’ कायदा लागू झाला असून तो देशातील अल्पसंख्यांकांविरोधात नाही. इतर देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकता देणारा हा कायदा आहे. परंतु ‘सीएए’ व ‘एनआरसी’च्या नावाखाली काही विशिष्ट तत्त्वांकडून राज्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘एनपीआर’ (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) तर काँग्रेसनेच आणला होता. परंतु आता मतांच्या राजकारणातून काँग्रेसकडूनच याला विरोध होत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर राहत आहेत. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी झाली पाहिजे व त्यांची यादी प्रकाशित झाली पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी तत्काळ निर्देश दिले पाहिजे. या घुसखोरांची पाठराखण करण्यासाठी काही तत्त्व मुस्लिम व बहुजन समाजात वैचारिक विष कालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना खोटी माहिती देऊन संभ्रमित करण्यात येत आहे. असे करणाऱ्या नेत्यांच्या सभांना परवानगी देऊ नये व खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणीदेखील गिरीश व्यास यांनी केली. पत्रपरिषदेला भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजयुमो शहराध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, भाजपचे प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी, राजेश शर्मा, अन्नू शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Girish Vyasगिरीश व्यासMediaमाध्यमेRohingyaरोहिंग्या