शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

नागपुरात ५० हजारांहून अधिक रोहिंग्या : गिरीश व्यास यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:32 IST

नागपुरात तर ५० हजारांहून अधिक रोहिंग्या राहतात. यातील काही तत्त्वांच्या माध्यमातून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ.गिरीश व्यास यांनी केला आहे.

ठळक मुद्देराज्यातील घुसखोरांवर कारवाई करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : उपराजधानीसह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अवैधरीत्या बांगलादेशी तसेच रोहिंग्या राहत आहेत. त्यांची पोलिसांनादेखील सखोल माहिती आहे. नागपुरात तर ५० हजारांहून अधिक रोहिंग्या राहतात. यातील काही तत्त्वांच्या माध्यमातून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ.गिरीश व्यास यांनी केला आहे. सोमवारी नागपूर टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.देशात ‘सीएए’ कायदा लागू झाला असून तो देशातील अल्पसंख्यांकांविरोधात नाही. इतर देशातील अल्पसंख्यांकांना नागरिकता देणारा हा कायदा आहे. परंतु ‘सीएए’ व ‘एनआरसी’च्या नावाखाली काही विशिष्ट तत्त्वांकडून राज्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘एनपीआर’ (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) तर काँग्रेसनेच आणला होता. परंतु आता मतांच्या राजकारणातून काँग्रेसकडूनच याला विरोध होत आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर राहत आहेत. या सर्वांची पोलिसांकडून चौकशी झाली पाहिजे व त्यांची यादी प्रकाशित झाली पाहिजे. यासंदर्भात मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी तत्काळ निर्देश दिले पाहिजे. या घुसखोरांची पाठराखण करण्यासाठी काही तत्त्व मुस्लिम व बहुजन समाजात वैचारिक विष कालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना खोटी माहिती देऊन संभ्रमित करण्यात येत आहे. असे करणाऱ्या नेत्यांच्या सभांना परवानगी देऊ नये व खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणीदेखील गिरीश व्यास यांनी केली. पत्रपरिषदेला भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजयुमो शहराध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, भाजपचे प्रचार प्रमुख चंदन गोस्वामी, राजेश शर्मा, अन्नू शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Girish Vyasगिरीश व्यासMediaमाध्यमेRohingyaरोहिंग्या