शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरापासून १५वर रुग्ण मृत्यूच्या दाढेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:08 IST

नागपूर : दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. परंतु कोरोनामुळे मार्च २०२० पासून ...

नागपूर : दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. परंतु कोरोनामुळे मार्च २०२० पासून बंद पडलेले मूत्रपिंड प्रत्यारोपण अद्यापही सुरू झालेले नाही. परिणामी, १५ वर रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत मृत्यूच्या दाढेत जगत आहेत. धक्कादायक म्हणजे, आरोग्य विभागाकडून दिला जाणारा अवयव प्रत्यारोपणाचा अवधी डिसेंबर २०२०मध्येच संपला. स्मरणपत्र पाठवूनही मंजुरी मिळाली नाही. यामुळे रुग्णाचा जीव गेल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यावेळच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून पहिल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत ६० रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करून त्यांना जीवनदान देण्यात आले. यातील बहुसंख्य शस्त्रक्रिया या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात आल्या. यामुळे रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी रुग्णांची गर्दी वाढली आहे. मात्र, मार्च २०२०पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच शासनाने प्रत्यारोपण पुढे ढकलण्याच्या सूचना केल्या. नोव्हेंबरपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले. यामुळे डिसेंबर किंवा नव्या वर्षापासून पुन्हा मूत्रपिंड प्रत्यारोपण सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या या अवयव प्रत्यारोपणाला डिसेंबर २०२०मध्ये ५ वर्षे पूर्ण झाली. यामुळे पुन्हा आरोग्य विभागाकडून प्रत्यारोपणाच्या मंजुरीसाठी नेफ्रोलॉजी विभागाने वारंवार स्मरणपत्र दिले. परंतु आरोग्य विभागाकडून अद्यापही मंजुरी मिळाली नाही. परिणामी, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद पडल्या आहेत. या संदर्भातील एक पत्र नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे यांनी मेडिकलच्या अधिष्ठात्यांना दिले आहे.

-मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्राला विकासाची गरज

‘सुपर’चे मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र हे नेफ्रोलॉजी विभागामार्फत चालविले जाते. मूत्रपिंड प्रत्यारोपण रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या केंद्राच्या विकासाची गरज आहे. तज्ज्ञानुसार, पूर्णवेळ मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ, युरोलॉजी, नेफ्रोलॉजीसह, आरोग्य अधिकारी, परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. शिवाय, दोन विशेष कक्षासह आवश्यक अद्ययावत यंत्रसामग्री महत्त्वाची आहे.

-प्रत्यारोपणाला मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव

दर ५ वर्षांनी अवयव प्रत्यारोपणाला आरोग्य विभागाकडून मंजुरी घ्यावी लागते. त्या संदर्भातील प्रस्ताव आतापर्यंत पाचवेळा संबंधित विभागाकडे पाठविला आहे. याची माहिती अधिष्ठात्यांना देण्यात आली आहे.

-डॉ. चारुलता बावनकुळे

प्रमुख, नेफ्रोलॉजी विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल