शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

वर्षभरापासून १५वर रुग्ण मृत्यूच्या दाढेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:08 IST

नागपूर : दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. परंतु कोरोनामुळे मार्च २०२० पासून ...

नागपूर : दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. परंतु कोरोनामुळे मार्च २०२० पासून बंद पडलेले मूत्रपिंड प्रत्यारोपण अद्यापही सुरू झालेले नाही. परिणामी, १५ वर रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत मृत्यूच्या दाढेत जगत आहेत. धक्कादायक म्हणजे, आरोग्य विभागाकडून दिला जाणारा अवयव प्रत्यारोपणाचा अवधी डिसेंबर २०२०मध्येच संपला. स्मरणपत्र पाठवूनही मंजुरी मिळाली नाही. यामुळे रुग्णाचा जीव गेल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यावेळच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून पहिल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत ६० रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करून त्यांना जीवनदान देण्यात आले. यातील बहुसंख्य शस्त्रक्रिया या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात आल्या. यामुळे रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी रुग्णांची गर्दी वाढली आहे. मात्र, मार्च २०२०पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच शासनाने प्रत्यारोपण पुढे ढकलण्याच्या सूचना केल्या. नोव्हेंबरपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले. यामुळे डिसेंबर किंवा नव्या वर्षापासून पुन्हा मूत्रपिंड प्रत्यारोपण सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या या अवयव प्रत्यारोपणाला डिसेंबर २०२०मध्ये ५ वर्षे पूर्ण झाली. यामुळे पुन्हा आरोग्य विभागाकडून प्रत्यारोपणाच्या मंजुरीसाठी नेफ्रोलॉजी विभागाने वारंवार स्मरणपत्र दिले. परंतु आरोग्य विभागाकडून अद्यापही मंजुरी मिळाली नाही. परिणामी, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद पडल्या आहेत. या संदर्भातील एक पत्र नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे यांनी मेडिकलच्या अधिष्ठात्यांना दिले आहे.

-मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्राला विकासाची गरज

‘सुपर’चे मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र हे नेफ्रोलॉजी विभागामार्फत चालविले जाते. मूत्रपिंड प्रत्यारोपण रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या केंद्राच्या विकासाची गरज आहे. तज्ज्ञानुसार, पूर्णवेळ मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ, युरोलॉजी, नेफ्रोलॉजीसह, आरोग्य अधिकारी, परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. शिवाय, दोन विशेष कक्षासह आवश्यक अद्ययावत यंत्रसामग्री महत्त्वाची आहे.

-प्रत्यारोपणाला मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव

दर ५ वर्षांनी अवयव प्रत्यारोपणाला आरोग्य विभागाकडून मंजुरी घ्यावी लागते. त्या संदर्भातील प्रस्ताव आतापर्यंत पाचवेळा संबंधित विभागाकडे पाठविला आहे. याची माहिती अधिष्ठात्यांना देण्यात आली आहे.

-डॉ. चारुलता बावनकुळे

प्रमुख, नेफ्रोलॉजी विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल