शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अनियंत्रित ट्रकने १५ गाईंना चिरडले; पाठलाग करून ट्रकचालक अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 18:34 IST

१३ गाईंना गंभीर दुखापत : सावनेर-पांढुर्णा महामार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्ककेळवद : मध्य प्रदेशातील पांढुर्याहून नागपूरकडे वेगात जाणाऱ्या ट्रकने रोड ओलांडणाऱ्या गुरांच्या कळपातील १५ गाईना चिरडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शिवाय, ट्रकच्या धडकेमुळे १३ गाईना गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको केल्याने या मार्गावरील वाहतूक किमान दोन तास ठप्प होती. ही घटना केळवद (ता. सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-पांढुर्णा महामार्गावरील छत्रापूर फाटा परिसरात शुक्रवारी (दि. २७) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

घनश्याम शेंद्रे (५०, रा. छत्रापूर, ता. सावनेर) हा गुराखी असून, तो गावातील शेतकऱ्यांकडे असलेल्या गाई त म्हशी याच गावाच्या शिवारात रोज चारायला नेतो व सायंकाळी घरी परत आणतो. तो रोज गावातील किमान १५० गाई चारायला नेतो. नेहमीप्रमाणे तो गाईचा कळप घेऊन गावापासून दीड कि.मी.वर असलेल्या नागपूर-सावनेर-पांढुर्णा-भोपाळ मार्गालगत घेऊन गेला होता. काही जनावरे रोडलगत चारा खात होती. काही रोड ओलांडून पलीकडे जात होती.

दरम्यान, पांढुर्णाहून नागपूरकडे वेगात जाणाऱ्या आरजे-३९/जीए-३१८९ क्रमांकाच्या ट्रकने रोड ओलांडणाऱ्या गुरांना जोरात धडक दिली आणि ट्रक निघून गेला. या ट्रकच्या धडकेमुळे कळपातील १५ गाईचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर १३ गाई गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल म्हस्के, केळवदचे ठाणेदार अनिल राऊत व पोलिस कर्मचारी तसेच आंदोलनाची माहिती मिळताच आमदार डॉ. आशिष देशमुख, मनोहर कुंभारे, डॉ. राजीव पोतदार घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी गुरांच्या मालकांसह नागरिकांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिली. पंचनाम्यानंतर मृत गुरांची विल्हेवाट लावण्यात आली; तर जखमी गुरांना सावनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्याची व्यवस्थाही पोलिसांनी केली.

आंदोलनात मृत व जखमी जनावरांचे मालक बाबा बोबडे, नीळकंठ जोगी, दिवाकर शेंद्रे, श्रावण बोबडे, वासुदेव वाडी, देवमान कोल्हे, पुष्पक वाडी, होमराज उकीणकर, बंडू वाडी, ज्ञानेश्वर कोल्हे, हेमराज शेंद्रे, तेजराम शेंद्रे, धनुराज बोबडे, नरेंद्र बोबडे, नरेंद्र बोबडे, बोबडे यांच्या ढोके, राहुल बोबडे, वसंता बोबडे, मंदाबाई बोबडे, वंदना शेंद्रे, ममता रामटेके, छाया जोगी, तुळसा ढोके व नागरिक सहभागी झाले होते. या प्रकरणी केळवद पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिस उपनिरीक्षक अरुण राठोड तपास करीत आहेत.

पाठलाग करून पकडला ट्रकगुरांना धडक दिल्यानंतर चालकाने ट्रकचा वेग वाढवून पळ काढला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिस विभागाचे सुरेश निंबाळकर, गाडगे, ढोके यांनी त्यांच्या वाहनाने या ट्रकचा पाठलाग केला आणि पाटणसावंगी (ता. सावनेर) गावाजवळील टोलनाक्यावर हा ट्रक अडवला. शिवाय, ट्रकचालक काना मोतीराम (२९, रा. झिरो वॉटर पॉइंट, सिदनहरी, जिल्हा बारमेर, राजस्थान) याला ताब्यात घेत अटक करून ट्रक जप्त केला.

संतप्त नागरिकांचा 'रास्ता रोको'

  • माहिती मिळताच गुरांच्या मालकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. गुरांची अवस्था पाहून नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी लगेच 'रास्ता रोको' करायला सुरुवात केली.
  • मालकांना मृत व जखमी गुरांची नुकसानभरपाई मिळावी तसेच घटनास्थळी वारंवार अपघात होत असल्याने या ठिकाणी ओव्हरब्रिज बांधण्याची मागणी त्यांनी रेटून धरली होती.
  • या दोन्ही मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्याने आंदोलन थांबविण्यात आले. रास्ता रोकोमुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
टॅग्स :nagpurनागपूर