शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

नागपुरातील शेकडा एक टक्के रुग्ण सुपर बग्सच्या धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 21:45 IST

‘सुपर बग्स’ अर्थात रोग पसरविणाऱ्या जीवघेण्या संसर्गजन्य विषाणूची चर्चा सध्या देशभर होत आहे. नागपुरातील शेकडा १.१ टक्के रुग्ण सध्या या विषाणूंच्या संसर्गात असल्याची माहिती डॉ. समिर पालतेवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सुपर बग्स’ अर्थात रोग पसरविणाऱ्या जीवघेण्या संसर्गजन्य विषाणूची चर्चा सध्या देशभर होत आहे. नागपुरातील शेकडा १.१ टक्के रुग्ण सध्या या विषाणूंच्या संसर्गात असल्याची माहिती डॉ. समिर पालतेवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.डॉ. पालतेवार म्हणाले, मागील ३० वर्षात क्वचितच नवे जीव प्रतिरोधक अँटीबायोटिक वैद्यकीय जगतात आले आहे. नवीन औषधांची अजूनही प्रयोगशाळांमध्ये चाचणी सुरू आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला या दृष्टीने जागृत करण्याची गरज आहे. माणसाच्या शरीरामध्ये वाढणारे विषाणू आपली प्रतिकारक्षमता अनावश्यक डोजेसमुळे वाढवितात. प्रतिजैविकाचा दुरुपयोग थांबवून पृथ्वीला विनाशकारी संसर्गाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.पशुपालन आणि कुक्कुटपालनामध्ये सर्रास प्रतिजैवकाचा वापर केला जातो. फळांची वाढ लवकर होण्यासाठीही याचा वापर केला जातो. व्यक्तीच्या आहारात हे आल्यावर मानवी शरीरामध्ये सुपर बग्सचा धोका वाढतो. ८० टक्के सर्दी-पडशावरील उपायासाठी कोणत्याही प्रतिजैवकाची गरज पडत नाही. जुलाबात बरेचदा विषाणूंचे संक्रमण असते. अशा अनेक वेळी अँटीबायोटिक न घेताही दुरुस्त होता येते. त्यामुळे उठसूठ अशा औषधांचे सेवन टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.या जनजागृतीसाठी मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्यावतीने संक्रमण रोग नियंत्रणावर सातवी चिंतन बैठक २ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. यात १५० पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होत असून अनेक तज्ज्ञमंडळी मार्गदर्शन करणार आहेत. या पत्रकार परिषदेला संक्रमकरोग तज्ज्ञ सल्लागार डॉ. अश्विनी तायडे, डॉ. अनुराधा देशमुख, डॉ. अजय बोल्ले, डॉ. अतुल राजकोंडावार उपस्थित होते.काय आहे सुपर बग्सअन्य किटाणूंपेक्षा अनेक पटींनी प्रतिकारक्षमता वाढलेले विषाणू म्हणजे सुपर बग्स. मागील ३० वर्षांमध्ये प्रतिबंधात्मक औषधोपचार तसेच अँटोबायोटिक घेण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. साध्या आजारासाठी मोठे डोज घेण्याची मानसिकता वाढली आहे. कोणत्याही विषाणूंच्या तापामध्ये अँटीबायोटिक डोज दिले जातात. यामुळे विषाणूंची प्रतिकारक्षमता मागील ३० वर्षात वाढल्याचे आरोग्य विभागाच्या अध्ययनातून पुढे आले आहे. आजारांमध्ये अँटीबायोटिक दिल्यावर सर्वसाधारण विषाणू तर मरतात, मात्र हे सुपर बग्स रुग्णाचे शरीर जर्जर करतात.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरMediaमाध्यमे