शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नागपुरातील शेकडा एक टक्के रुग्ण सुपर बग्सच्या धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 21:45 IST

‘सुपर बग्स’ अर्थात रोग पसरविणाऱ्या जीवघेण्या संसर्गजन्य विषाणूची चर्चा सध्या देशभर होत आहे. नागपुरातील शेकडा १.१ टक्के रुग्ण सध्या या विषाणूंच्या संसर्गात असल्याची माहिती डॉ. समिर पालतेवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सुपर बग्स’ अर्थात रोग पसरविणाऱ्या जीवघेण्या संसर्गजन्य विषाणूची चर्चा सध्या देशभर होत आहे. नागपुरातील शेकडा १.१ टक्के रुग्ण सध्या या विषाणूंच्या संसर्गात असल्याची माहिती डॉ. समिर पालतेवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.डॉ. पालतेवार म्हणाले, मागील ३० वर्षात क्वचितच नवे जीव प्रतिरोधक अँटीबायोटिक वैद्यकीय जगतात आले आहे. नवीन औषधांची अजूनही प्रयोगशाळांमध्ये चाचणी सुरू आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला या दृष्टीने जागृत करण्याची गरज आहे. माणसाच्या शरीरामध्ये वाढणारे विषाणू आपली प्रतिकारक्षमता अनावश्यक डोजेसमुळे वाढवितात. प्रतिजैविकाचा दुरुपयोग थांबवून पृथ्वीला विनाशकारी संसर्गाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.पशुपालन आणि कुक्कुटपालनामध्ये सर्रास प्रतिजैवकाचा वापर केला जातो. फळांची वाढ लवकर होण्यासाठीही याचा वापर केला जातो. व्यक्तीच्या आहारात हे आल्यावर मानवी शरीरामध्ये सुपर बग्सचा धोका वाढतो. ८० टक्के सर्दी-पडशावरील उपायासाठी कोणत्याही प्रतिजैवकाची गरज पडत नाही. जुलाबात बरेचदा विषाणूंचे संक्रमण असते. अशा अनेक वेळी अँटीबायोटिक न घेताही दुरुस्त होता येते. त्यामुळे उठसूठ अशा औषधांचे सेवन टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.या जनजागृतीसाठी मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्यावतीने संक्रमण रोग नियंत्रणावर सातवी चिंतन बैठक २ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. यात १५० पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होत असून अनेक तज्ज्ञमंडळी मार्गदर्शन करणार आहेत. या पत्रकार परिषदेला संक्रमकरोग तज्ज्ञ सल्लागार डॉ. अश्विनी तायडे, डॉ. अनुराधा देशमुख, डॉ. अजय बोल्ले, डॉ. अतुल राजकोंडावार उपस्थित होते.काय आहे सुपर बग्सअन्य किटाणूंपेक्षा अनेक पटींनी प्रतिकारक्षमता वाढलेले विषाणू म्हणजे सुपर बग्स. मागील ३० वर्षांमध्ये प्रतिबंधात्मक औषधोपचार तसेच अँटोबायोटिक घेण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. साध्या आजारासाठी मोठे डोज घेण्याची मानसिकता वाढली आहे. कोणत्याही विषाणूंच्या तापामध्ये अँटीबायोटिक डोज दिले जातात. यामुळे विषाणूंची प्रतिकारक्षमता मागील ३० वर्षात वाढल्याचे आरोग्य विभागाच्या अध्ययनातून पुढे आले आहे. आजारांमध्ये अँटीबायोटिक दिल्यावर सर्वसाधारण विषाणू तर मरतात, मात्र हे सुपर बग्स रुग्णाचे शरीर जर्जर करतात.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरMediaमाध्यमे