शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

८ वर्षात अतिवृष्टीच्या नुकसानीचे ४२२ कोटीपैकी फक्त ३२ कोटी मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST

नागपूर : राज्यात सत्ता काँग्रेसची असो की भाजपाची, एखादा अपवाद वगळता जिल्हा परिषदेने पाठविलेले प्रस्ताव मंत्रालयातील डस्टबिनमध्येच गेले ...

नागपूर : राज्यात सत्ता काँग्रेसची असो की भाजपाची, एखादा अपवाद वगळता जिल्हा परिषदेने पाठविलेले प्रस्ताव मंत्रालयातील डस्टबिनमध्येच गेले आहे. अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी गेल्या ८ वर्षापासून जि.प.ने ४२२ कोटीचे प्रस्ताव शासनाला पाठविले आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ ३२ कोटी रुपयेच निधी मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीचा बॅकलॉग वाढला आहे.

जिल्ह्यात दरवर्षी अतिवृष्टी होते. त्यात पुरामुळे अनेक रस्ते वाहून जातात. पुलांचे नुकसान होते. दरवर्षी ग्रामीण भागात ही परिस्थिती भेडसावते. नादुरुस्त रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी जिल्हा परिषदेकडून शासनाकडे निधीचा प्रस्ताव पाठविण्यात येतो. २०१३ मध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी हजारो किलोमीटरवरील रस्ते सोबतच अनेक पूल वाहून गेले होते. त्यावेळी जि.प.ने शासनाने तब्बल १५८ कोटीचा दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविला होता. तेव्हा राज्यात आघाडीचे सरकार होते. त्यावेळी पहिल्यांदाच केवळ ३२ कोटीचा निधी जि.प.ला या रस्ते, पूल दुरुस्तीच्या कामासाठी प्राप्त झाला होता. गेल्यावर्षी जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यात अडीचशे रस्त्यांचे ५७० किलोमीटरचे नुकसान झाले. १०६ पूल क्षतिग्रस्त झाले. पारशिवनी तालुक्यातील एक पूल वाहूनच गेला. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून बांधकाम विभागाने दुरुस्तीसाठी शासनाकडे जवळपास ७० कोटी ३८ लाखाचा प्रस्ताव पाठविला आहे.

- भाजप सत्तेत असताना एक रुपयाही मिळाला नाही

२०१३-१४ मध्ये राज्यात काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी पूरपरिस्थितीसाठी १५८ पैकी ३२ कोटीचा निधी जि.प.ला प्राप्त झाला होता. परंतु यानंतर जिल्ह्यात २०१५, २०१६, २०१९ या तीन वर्षामध्ये पूर परिस्थिती उद्भवली तेव्हा राज्यात व जि.प.मध्येही भाजपच सत्तेत होती. त्या कालावधीतही जि.प.कडून सरकारकडे रस्ते दुरुस्तीकरिता निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला, परंतु त्यांच्या काळात एक छदमाही जि.प.ला मिळाला नाही.