शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

८ वर्षात अतिवृष्टीच्या नुकसानीचे ४२२ कोटीपैकी फक्त ३२ कोटी मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST

नागपूर : राज्यात सत्ता काँग्रेसची असो की भाजपाची, एखादा अपवाद वगळता जिल्हा परिषदेने पाठविलेले प्रस्ताव मंत्रालयातील डस्टबिनमध्येच गेले ...

नागपूर : राज्यात सत्ता काँग्रेसची असो की भाजपाची, एखादा अपवाद वगळता जिल्हा परिषदेने पाठविलेले प्रस्ताव मंत्रालयातील डस्टबिनमध्येच गेले आहे. अतिवृष्टीमुळे रस्त्याच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी गेल्या ८ वर्षापासून जि.प.ने ४२२ कोटीचे प्रस्ताव शासनाला पाठविले आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ ३२ कोटी रुपयेच निधी मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीचा बॅकलॉग वाढला आहे.

जिल्ह्यात दरवर्षी अतिवृष्टी होते. त्यात पुरामुळे अनेक रस्ते वाहून जातात. पुलांचे नुकसान होते. दरवर्षी ग्रामीण भागात ही परिस्थिती भेडसावते. नादुरुस्त रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी जिल्हा परिषदेकडून शासनाकडे निधीचा प्रस्ताव पाठविण्यात येतो. २०१३ मध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी हजारो किलोमीटरवरील रस्ते सोबतच अनेक पूल वाहून गेले होते. त्यावेळी जि.प.ने शासनाने तब्बल १५८ कोटीचा दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविला होता. तेव्हा राज्यात आघाडीचे सरकार होते. त्यावेळी पहिल्यांदाच केवळ ३२ कोटीचा निधी जि.प.ला या रस्ते, पूल दुरुस्तीच्या कामासाठी प्राप्त झाला होता. गेल्यावर्षी जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यात अडीचशे रस्त्यांचे ५७० किलोमीटरचे नुकसान झाले. १०६ पूल क्षतिग्रस्त झाले. पारशिवनी तालुक्यातील एक पूल वाहूनच गेला. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून बांधकाम विभागाने दुरुस्तीसाठी शासनाकडे जवळपास ७० कोटी ३८ लाखाचा प्रस्ताव पाठविला आहे.

- भाजप सत्तेत असताना एक रुपयाही मिळाला नाही

२०१३-१४ मध्ये राज्यात काँग्रेसचे सरकार होते, त्यावेळी पूरपरिस्थितीसाठी १५८ पैकी ३२ कोटीचा निधी जि.प.ला प्राप्त झाला होता. परंतु यानंतर जिल्ह्यात २०१५, २०१६, २०१९ या तीन वर्षामध्ये पूर परिस्थिती उद्भवली तेव्हा राज्यात व जि.प.मध्येही भाजपच सत्तेत होती. त्या कालावधीतही जि.प.कडून सरकारकडे रस्ते दुरुस्तीकरिता निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला, परंतु त्यांच्या काळात एक छदमाही जि.प.ला मिळाला नाही.