शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"आमचा मंत्र, देवापासून देश आणि रामापासून राष्ट्र, संघ भारताचा अक्षय वटवृक्ष..."; नागपुरातून आणखी काय बोलले PM मोदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 14:36 IST

संघाच्या योगदानाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, "संघाची अनेक वर्षांची तपश्चर्या आज भारतासाठी एक नवा अध्याय लिहीत आहे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. येथे पंतप्रधान मोदी यांनी आरएसएस मुख्यालय आणि दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी, त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. मोदी म्हणाले, 'आपण आपल्या देशाचा इतिहास पाहिला, तर शेकडो वर्षांची गुलामी, अनेक आक्रमणांचा सामना केला, भारताचे अस्तित्व संपवण्यासाठी विविध प्रकारचे क्रूर प्रयत्न झाले, मात्र भारताच्या चेतनेला कधीही धक्का पोहोचला नाही. तिची ज्योत सातत्याने तेवत राहिली. कारण अत्यंत कठीण काळातही, सामाजिक आंदोलने होत राहिले." या वेळी, संघाच्या योगदानाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, "संघाची अनेक वर्षांची तपश्चर्या आज भारतासाठी एक नवा अध्याय लिहीत आहे. 

पंतप्रधान म्हणाले, १०० वर्षांपूर्वी लावले गेलेले संघाचे रोपटे आता वटवृक्ष (वडाचे झाड) बनले आहे. हा सामान्य वटवृक्ष नाही, तर भारताचा अक्षय वटवृक्ष बनला आहे. जो भारतीय संस्कृती आणि राष्ट्रीय चेतनेला ऊर्जावान बनवत आहे. संघासाठी सेवा हीच साधना आहे. आमचा मंत्र, 'देवापासून देश आणि रामापासून राष्ट्र' आहे. 'सेवा' ही भावना स्वयंसेवकांना थकू देत नाही. राष्ट्र यज्ञाच्या या पवित्र अनुष्ठानात मला आज येथे येण्याचे सौभाग्य मिळाले आहे. 

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "स्वयंसेवक आपला आणि दुसऱ्याचा, असा भेदभाव न करता सदैव मदतीसाठी सरसावतात. गुरुजींनी संघाची तुलना प्रकाशाशी केली होती. कोणत्याही आपत्तीच्या वेळी स्वयंसेवक सर्वप्रथम पोहोचतात. गुरुजींची शिकवण आपल्यासाठी जीवनमंत्र आहे."

याच बरोबर, "१०० वर्षांत संघ एक महान वटवृक्ष बनला आहे. स्वयंसेवक निःस्वार्थपणे लोकांना मदत करतात. महाकुंभमेळ्यादरम्यान, स्वयंसेवकांनी महाकुंभात येणाऱ्या भाविकांची खूप सेवा केली आणि त्यांना विविध प्रकारची मदतही केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीnagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ