शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

आमचा जाहीरनामा; एकात्मिक बालविकास प्रकल्प सक्षम करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 15:37 IST

देशात एकात्मिक बाल विकास योजनेचे ७६०६७ प्रकल्प कार्यान्वित आहे. त्या अंतर्गत १३ लाख ४२ हजार १४५ अंगणवाड्यात २४ लाख ५६ हजार सेविका व मदतनिस काम करीत आहे. ही योजना बळकट करणे गरजेचे आहे असे मत अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मधुकर भरणे यांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशात एकात्मिक बाल विकास योजनेचे ७६०६७ प्रकल्प कार्यान्वित आहे. त्या अंतर्गत १३ लाख ४२ हजार १४५ अंगणवाड्यात २४ लाख ५६ हजार सेविका व मदतनिस काम करीत आहे. ही योजना बळकट करणे गरजेचे आहे असे मत अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मधुकर भरणे यांनी व्यक्त केले आहे.देशात इंदिरा गांधी यांचे सरकार असताना एकात्मिक बाल विकास योजना अमलात आली. ही योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र्य रेषेखाली असलेले कुटुंब, कुपोषित मुले, गरोदर माता, स्तनदा माता, गोरगरीब शेतमजूर, आर्थिक कमकुवत घटकासाठी होती. सुरुवातीला योजनेसाठी बजेटमध्ये भरपूर तरतूद होत होती. आदिवासी भागात, शहरी झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या कुटुंंबाना त्याचे आकर्षण होते. सधन वर्गातील लोकही योजनेंतर्गत चालणाऱ्या अंगणवाड्यात मुले पाठवित होते. परंतु गेल्या काही वर्षात एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची दुर्दशा होत आहे. सरकारच्या बजेटमधून अपेक्षित तरतूद होत नाही. मुलांना पोषण आहार मिळणे बंद झाले आहे. सेविका व मदतनीसांना ४-४ महिने मानधन मिळत नाही. योजनांवर वेगवेगळ्या अटी लावण्यात येत आहे. पटसंखेच्या आधारावर समायोजन, वयाची अट, मेडिकल फिटनेस, ३ अपत्य असल्यास बडतर्फ, भरती, पदोन्नतीवर बंदी, अंगणवाडी सुधारणेकडे दुर्लक्ष झाले आहे. अंगणवाडीत काम करणाºया ४० टक्के महिला विधवा, घटस्फोटित, निराश्रित आहेत. सरकारच्या धोरणांमुळे अंगणवाड्या बंद पडत आहे. अंगणवाडीत शिक्षणाकरिता साहित्य, सकस पोषण आहार, सेविका व मदतनिसांना १८००० रुपये मानधन मिळणे गरजेचे आहे.

टॅग्स :Socialसामाजिक