शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

आमच्या देशालाही ‘बाबासाहेब’ हवे होते

By admin | Updated: October 3, 2014 02:53 IST

बुद्धाचा धम्म आमच्या व्यवहारातच नव्हे तर आचारणात सुद्धा आहे. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष भारताला लाभले.

नागपूर : बुद्धाचा धम्म आमच्या व्यवहारातच नव्हे तर आचारणात सुद्धा आहे. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे महापुरुष भारताला लाभले. त्यामुळे भारताबद्दल आम्हाला विशेष आदर आहे. आम्हाला बाबासाहेबांसारखी व्यक्ती लाभली नाही, ही खंत आहे. कदाचित आम्हालासुद्धा बाबासाहेबांसारखी व्यक्ती मिळाली असती तर, असा प्रश्न थायलंडमधील एका ज्येष्ठ महिला पत्रकाराने उपस्थित केला. डॉ. रुंगथिप चोटनापलाई असे या पत्रकार महिलेचे नाव आहे. डॉ. रुंगथिप या थाई टीव्ही चॅनलच्या पत्रकार असून न्यूज अ‍ँकर सुद्धा आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांना विशेष आवड आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी संशोधन केले असून त्यांची डॉक्युमेंट्री सुद्धा तयार केली आहे. थायलंडमधील जनतेमध्ये त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवण्याचे कार्य करतात. दीक्षाभूमीवर आलेल्या ३८ प्रतिनिधींसोबत त्या सुद्धा आल्या आहेत. यावेळी डॉ. एस.के. गजभिये यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. थायलंड हे ९० टक्के बुद्धीस्ट राष्ट्र आहे. बुद्ध आमच्या देशात झाले नाही, तरीही आमच्या राष्ट्राने बुद्ध धम्म स्वीकारला. आज आमच्या आचारणात धम्म आहे. तथागत गौतम बुद्ध हे भारतात होऊन गेल्याने भारताबद्दलचा आदर हा नेहमीच राहिला आहे. परंतु भारत म्हणजे केवळ बुद्धगया आणि आजूबाजूचा परिसर इतकेच आजवर आम्हाला माहिती होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आम्ही जसजसे ऐकले. त्यांच्याबाबत अधिकाधिक माहिती मिळविली तेव्हा आम्हाला धक्काच बसला. जो धम्म या देशातून हद्दपार झाला होता, तो त्यांनी पुनर्जीवित केला. बुद्धगयेच्या बाहेरही बुद्ध धम्म आहे, याची आम्हाला कल्पनाही नव्हती. आज नागपुरात आल्यावर भारतात बुद्ध धम्माची पाळेमुळे किती खोलवर रुजली याचा प्रत्यय आला. यांचे संपूर्ण श्रेय बाबासाहेबांनाच जाते. त्यांचे त्रिवार धन्यवाद. डॉ. गजभिये यांनी अनुवाद केला. (प्रतिनिधी)