शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अन्यथा गोवारी बांधव अन्नत्याग व देहत्याग करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 01:41 IST

११४ गोवारी बांधवांच्या शहीद स्मृतीला २४ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र ज्यासाठी या बांधवांचे बळी गेले तो न्याय समाजबांधवांना अद्याप मिळाला नाही. नुकताच १४ आॅगस्ट २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारी समाज हा आदिवासीच असल्याचा निर्वाळा दिला. मात्र राज्य शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करून न्याय द्यावा, अन्यथा गोवारी बांधव अन्नत्याग व देहत्याग करतील, असा इशारा आदिवासी गोवारी समन्वय समितीने दिला आहे.

ठळक मुद्देसमन्वय समितीचा इशारा : न्यायालयीन निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : ११४ गोवारी बांधवांच्या शहीद स्मृतीला २४ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र ज्यासाठी या बांधवांचे बळी गेले तो न्यायसमाजबांधवांना अद्याप मिळाला नाही. नुकताच १४ आॅगस्ट २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारी समाज हा आदिवासीच असल्याचा निर्वाळा दिला. मात्र राज्य शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. शासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करून न्याय द्यावा, अन्यथा गोवारी बांधव अन्नत्याग व देहत्याग करतील, असा इशारा आदिवासी गोवारी समन्वय समितीने दिला आहे.समितीचे समन्वयक शालिक नेवारे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत याबाबत आपली भूमिका मांडली. येत्या २३ नोव्हेंबर रोजी ११४ गोवारी शहीद बांधवांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गोवारी शहीद स्मारक, झीरो माईल परिसरात श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे. यावर्षी राज्यभरातून एक लाखापेक्षा अधिक गोवारी बांधव शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गोळा होतील, असा विश्वास नेवारे यांनी व्यक्त केला. १९९४ ला हक्काच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चात ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. त्यानंतरही राज्यात युतीचे सरकार आले. मात्र कोणत्याही सरकारने समाजाला न्याय दिला नाही, अशी टीका नेवारे यांनी केली. नुकताच उच्च न्यायालयाने गोवारी आदिवासी असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाला आता तीन महिने लोटूनही शासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही. शासनाने १५ डिसेंबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी करून न्याय दिला नाही तर त्यापुढे अन्नत्याग आंदोलन सुरू करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. पत्रपरिषदेत मारोतराव वाघाडे, देविदास बासकवरे, मंगेश नेवारे, झिबल वाघाडे, रुपेश रारूत, निरुपाल राऊत आदी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर