शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

...तर संपूर्ण नागपूर रेल्वे स्थानक खाक झालं असतं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:16 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री ३.२० वाजताच्या दरम्यान पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनला अचानक आग लागली. वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले, अन्यथा अख्खे नागपूर रेल्वेस्थानक जळून खाक होण्याची शक्यता होती.

ठळक मुद्देपेट्रोलने भरलेल्या वॅगनला आगमोठी दुर्घटना टळलीअग्नीशमन विभागाने मिळविले आगीवर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री ३.२० वाजताच्या दरम्यान पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनला अचानक आग लागली. वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले, अन्यथा अख्खे नागपूर रेल्वेस्थानक जळून खाक होण्याची शक्यता होती. सुरुवातीच्या रेल्वेस्थानकावर बेजबाबदारपणा झाल्यामुळे या वॅगनचे झाकण उघडे राहिल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतरच आगीचे खरे कारण कळू शकणार आहे.रेल्वे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीकानेरवरून ५० वॅगनची एक मालगाडी पेट्रोल घेऊन विजयवाडाकडे जात होती. ही गाडी शनिवारी रात्री ३.२० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ आणि २ मधील लुपलाईनवर आली. मालगाडीच्या इंजिनपासून दहाव्या क्रमांकाच्या वॅगनला (वॅगन क्रमांक-डब्ल्यूआर ४७०८१२१४०७०) ला अचानक आग लागली. वॅगनच्या वरील झाकणातून आगीचे लोळ निघताना दिसत होते. याबाबत उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाला माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी त्वरीत अग्निशमन विभागाला पाचारण केले. सिव्हील लाईन्स आणि गंजीपेठ येथील अग्शिशमन विभागाच्या गाड्या त्वरीत रेल्वेस्थानकावर पोहोचल्या. अग्निशमन विभागाच्या कर्मचाºयांनी फोमच्या (केमिकल) साह्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अखेर ४.४५ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. त्यानंतर ही मालगाडी अजनी यार्डात नेऊन उभी करण्यात आली. तेथे बारकाईने मालगाडीची तपासणी करण्यात आली. दुपारपर्यंत रेल्वेचे अधिकारी मालगाडीबाबत माहिती घेताना दिसले.२००९ मध्ये घडली होती घटनानागपूर रेल्वेस्थानकावर पेट्रोलने भरलेल्या मालगाडीला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ६ मार्च २००९ ला पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनला आग लागली होती. त्या वेळी आरपीएफचा जवान प्रमोद दैने, तुषार विघ्ने यांच्यासह जवानांनी कर्तव्यदक्षता दाखविली होती. ओएचई तारेतील विद्युत प्रवाह बंद करून उद्घोषणा प्रणालीच्या माध्यमातून प्लॅटफार्म क्रमांक १ आणि २ वरील प्रवाशांना दुसरीकडे हलविण्यात आले होते. रेल्वेगाड्यांचे आवागमनही अजनी आणि गोधणी रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आले होते. त्यावेळीही एक मोठी दुर्घटना टळली होती.निष्काळजीपणा झाल्याची शंकारेल्वे तज्ज्ञांच्या मते पेट्रोलच्या वॅगनमध्ये दोन झाकणे असतात. यात आतील आणि बाहेरील झाकणांचा समावेश आहे. प्राथमिकदृष्ट्या हे मानण्यात येत आहे की बिकानेरमध्ये पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनचे वरील झाकण योग्यरित्या बंद केले नव्हते. त्यामुळे प्रवासात झाकणाचे सील तुटले आणि ते उघडले. यामुळे ओएचई तार आणि वॅगनच्या दरम्यान संपर्क आला आणि शॉट सर्किटमुळे आग लागली असावी. परंतु चौकशीनंतरच आगीचे खरे कारण समजू शकणार आहे.दोन दिवसात येणार चौकशीचा अहवाल‘बिकानेरवरून विजयवाडाला जात असलेल्या मालगाडीच्या एका वॅगनला रात्री आग लागली होती. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे या घटनेची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. चौकशीचा अहवाल आगामी दोन दिवसात बिकानेर आणि विजयवाडाच्या रेल्वे प्रशासनाला देण्यात येईल त्यानंतर घटनेची चौकशी करण्यात येईल.’-कुश किशोर मिश्र, सिनिअर डीसीएम, मध्य रेल्वे नागपूर विभाग 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरfireआग