शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

अवयवदान हीच खरी मानवसेवा  : रवी वानखेडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:18 IST

ब्रेन डेड झाल्यानंतर (मेंदू मृत) संबंधित व्यक्तीचे अवयवदान केल्यास इतरांना जीवनदान मिळू शकते. त्यासाठी ब्रेन डेड व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेण्याची गरज असून अवयवदान हीच खरी मानवसेवा आहे, असे प्रतिपादन डॉ. रवी वानखेडे यांनी केले.

ठळक मुद्देजनमंचतर्फे अवयवदान काळाची गरज यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ब्रेन डेड झाल्यानंतर (मेंदू मृत) संबंधित व्यक्तीचे अवयवदान केल्यास इतरांना जीवनदान मिळू शकते. त्यासाठी ब्रेन डेड व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेण्याची गरज असून अवयवदान हीच खरी मानवसेवा आहे, असे प्रतिपादन डॉ. रवी वानखेडे यांनी केले.जनमंचतर्फे अवयवदान काळाची गरज या विषयावर डॉ. रवी वानखेडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन शंकरनगरच्या बाबुराव धनवटे सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी बालरोगतज्ज्ञ डॉ. विभावरी दाणी होत्या. व्यासपीठावर जनमंचचे अध्यक्ष शरद पाटील, उपाध्यक्ष डॉ. अमिताभ पावडे उपस्थित होते. डॉ. वानखेडे म्हणाले, अवयवदान कायदेशीर आहे. १९९४ मध्ये याबाबतचा कायदा झाला. अवयवदानात ४० ते ५० प्रकारचे अवयव दान करता येऊ शकतात. बोनमॅरो, किडनी, लिव्हर हे अवयव जिवंत व्यक्ती देऊ शकतात, तर मृत्यूनंतर सहा तासाच्या आत नेत्रदान, स्कीन दान करता येते. एका व्यक्तीच्या दोन डोळ्यांमुळे आठ जणांना दृष्टी मिळु शकते. मेंदू मृत झाल्याचे चार डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतर नातेवाईकांना समजावून त्यांना अवयवदानासाठी प्रेरित करण्यात येते. मेंदू मृत झाल्यानंतर व्हेंटीलेटरमुळे दोन-तीन तासापासून तर दोन ते तीन दिवसापर्यंत अवयव जिवंत राहतात. देशात अवयवदानाची खूप गरज आहे. भारतात दरवर्षी दोन लाख किडनी लागतात. परंतु प्रत्यक्षात १० हजार प्रत्यारोपण होतात. विकसित देशात मेंदू मृत झालेल्या ९० टक्के नागरिकांचे अवयवदान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीयांनी नेत्रदान केल्यास लोकसंख्येमुळे आपण जगाला कॉर्निया पुरवू शकत असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, कोणत्याही धर्मात अवयवदानाला विरोध नाही. अवयवदानासाठी नागपुरात नोटो संघटना असून, या संघटनेचे काम कसे चालते, ते त्यांनी सांगितले. डॉ. विभावरी दाणी यांनी मृत्यूनंतर त्वचा दान केल्यास व्यक्तीचा मृतदेह विद्रूप होत नसून, ही त्वचा पाच वर्षापर्यंत स्कीन बँकेत साठविता येत असल्याचे सांगून, अवयवदानाची चळवळ फोफावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जनमंचचे अध्यक्ष डॉ. शरद पाटील यांनी ग्रीन कॉरिडॉरमुळे मृत्यूनंतर अवयवांना व्हीआयपी वागणूक मिळते ही समाधानाची बाब असून, अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जनमंचचे उपाध्यक्ष अमिताभ पावडे यांनी प्रशिक्षण दिल्यासअवयवदानाबाबत जनजागृतीसाठी जनमंचचे सर्व कार्यकर्ते तयार राहू, असे आश्वासन दिले. संचालन सुहास खांडेकर यांनी केले. व्याख्यानाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर