शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

अवयवदान हीच खरी मानवसेवा  : रवी वानखेडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:18 IST

ब्रेन डेड झाल्यानंतर (मेंदू मृत) संबंधित व्यक्तीचे अवयवदान केल्यास इतरांना जीवनदान मिळू शकते. त्यासाठी ब्रेन डेड व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेण्याची गरज असून अवयवदान हीच खरी मानवसेवा आहे, असे प्रतिपादन डॉ. रवी वानखेडे यांनी केले.

ठळक मुद्देजनमंचतर्फे अवयवदान काळाची गरज यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ब्रेन डेड झाल्यानंतर (मेंदू मृत) संबंधित व्यक्तीचे अवयवदान केल्यास इतरांना जीवनदान मिळू शकते. त्यासाठी ब्रेन डेड व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुढाकार घेण्याची गरज असून अवयवदान हीच खरी मानवसेवा आहे, असे प्रतिपादन डॉ. रवी वानखेडे यांनी केले.जनमंचतर्फे अवयवदान काळाची गरज या विषयावर डॉ. रवी वानखेडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन शंकरनगरच्या बाबुराव धनवटे सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी बालरोगतज्ज्ञ डॉ. विभावरी दाणी होत्या. व्यासपीठावर जनमंचचे अध्यक्ष शरद पाटील, उपाध्यक्ष डॉ. अमिताभ पावडे उपस्थित होते. डॉ. वानखेडे म्हणाले, अवयवदान कायदेशीर आहे. १९९४ मध्ये याबाबतचा कायदा झाला. अवयवदानात ४० ते ५० प्रकारचे अवयव दान करता येऊ शकतात. बोनमॅरो, किडनी, लिव्हर हे अवयव जिवंत व्यक्ती देऊ शकतात, तर मृत्यूनंतर सहा तासाच्या आत नेत्रदान, स्कीन दान करता येते. एका व्यक्तीच्या दोन डोळ्यांमुळे आठ जणांना दृष्टी मिळु शकते. मेंदू मृत झाल्याचे चार डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतर नातेवाईकांना समजावून त्यांना अवयवदानासाठी प्रेरित करण्यात येते. मेंदू मृत झाल्यानंतर व्हेंटीलेटरमुळे दोन-तीन तासापासून तर दोन ते तीन दिवसापर्यंत अवयव जिवंत राहतात. देशात अवयवदानाची खूप गरज आहे. भारतात दरवर्षी दोन लाख किडनी लागतात. परंतु प्रत्यक्षात १० हजार प्रत्यारोपण होतात. विकसित देशात मेंदू मृत झालेल्या ९० टक्के नागरिकांचे अवयवदान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीयांनी नेत्रदान केल्यास लोकसंख्येमुळे आपण जगाला कॉर्निया पुरवू शकत असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, कोणत्याही धर्मात अवयवदानाला विरोध नाही. अवयवदानासाठी नागपुरात नोटो संघटना असून, या संघटनेचे काम कसे चालते, ते त्यांनी सांगितले. डॉ. विभावरी दाणी यांनी मृत्यूनंतर त्वचा दान केल्यास व्यक्तीचा मृतदेह विद्रूप होत नसून, ही त्वचा पाच वर्षापर्यंत स्कीन बँकेत साठविता येत असल्याचे सांगून, अवयवदानाची चळवळ फोफावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जनमंचचे अध्यक्ष डॉ. शरद पाटील यांनी ग्रीन कॉरिडॉरमुळे मृत्यूनंतर अवयवांना व्हीआयपी वागणूक मिळते ही समाधानाची बाब असून, अवयवदानाबाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जनमंचचे उपाध्यक्ष अमिताभ पावडे यांनी प्रशिक्षण दिल्यासअवयवदानाबाबत जनजागृतीसाठी जनमंचचे सर्व कार्यकर्ते तयार राहू, असे आश्वासन दिले. संचालन सुहास खांडेकर यांनी केले. व्याख्यानाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Organ donationअवयव दानnagpurनागपूर