शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

ऑर्डनन्स फॅक्टरीला अंबाझरीतून २ दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:01 IST

पाण्याची टंचाई दिवसेंदिवस अधिक जाणवत आहे. वेणा जलाशय कोरडे पडले आहे. ज्या वेणा जलाशयातून आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा केला जात होता, त्या गावांना आता अन्य ठिकाणांहून पाणी देणे गरजचे आहे. मनपाच्या अंबाझरी तलावातून ऑर्डनन्स फॅक्टरी, वाडी, दवलामेटी या गावांना पाण्यासाठी आरक्षण मनपाने मंजूर केले आहे. अंबाझरीतून ऑर्डनन्स फॅक्टरीला २ दलघमी पाणी देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपाईनलाईनसाठी नऊ कोटींचा खर्च : पालकमंत्र्यांनी घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याची टंचाई दिवसेंदिवस अधिक जाणवत आहे. वेणा जलाशय कोरडे पडले आहे. ज्या वेणा जलाशयातून आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा केला जात होता, त्या गावांना आता अन्य ठिकाणांहून पाणी देणे गरजचे आहे. मनपाच्या अंबाझरी तलावातून ऑर्डनन्स फॅक्टरी, वाडी, दवलामेटी या गावांना पाण्यासाठी आरक्षण मनपाने मंजूर केले आहे. अंबाझरीतून ऑर्डनन्स फॅक्टरीला २ दलघमी पाणी देण्यात येणार आहे.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवरील बैठकी घेतल्या. या बैठकीला आ. समीर मेघे, जिल्हाधिकारी व माजी आ. आशिष जयस्वाल उपस्थित होते. ऑर्डनन्स फॅक्टरीला व जवळच्या गावांना पाणी देण्यासाठी लागणाऱ्या पाईपलाईनला नऊ कोटी रुपयांचा खर्च असून हा खर्च ऑर्डनन्स फॅक्टरी करणार आहे. यासाठी प्रस्ताव कलकत्ता येथे पाठविण्यात आला असून त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळावी म्हणून पालकमंत्री स्वत: संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी बोलले.नागपूरलगत असलेल्या नीलडोह डिगडोह या भागाला पाणी देण्यासाठी मनपाच्या त्रिमूर्तीनगर टाकीवरून पाण्याची पाईपलाईन टाकावी लागणार आहे. या भागालाही वेणा जलाशयातून पाणीपुरवठा होत होता. पण वेणातील पाणी संपल्यामुळे ही योजना बंद पडली. नीलडोह, डिगडोहसाठी तात्पुरती पाणीपुरवठा योजना तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.वानाडोंगरी शहरातील खाणींचे अवैध खड्डे बुजविण्याच्या समस्येवर चर्चा करण्यात आली. या खड्ड्यांमध्ये जवळच असलेल्या रिलायन्स वीज प्रकल्पाची राख टाकून ते बुजवावे अशी सूचना करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कमी किमतीतील घरांच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला.याशिवाय पालकमंत्री पांदण योजना, गोसेखुर्द प्रकलपामुळे पुनर्वसित गाव सालेभट्टी, सालेशहरी येथे प्रियवंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे बांधकाम आरटीई कायद्यानुसार करून देणे, शाळा खोल्या व आवारभिंत बांधण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.पॉवरग्रिड वरोरा ट्रान्समिशन लि.मार्फत टाकण्यात आलेल्या उच्च दाब विद्युत लाईन व टॉवर उभारणीसंदर्भात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याचे सर्व अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यासाठी आता शासनाकडे येण्याची गरज नाही, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. पैसे मिळाले नसल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी केली होती.

 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेORDNANCE FACTORY AMBAJHARIआयुध निर्माणी अंबाझरी