शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऑर्डनन्स फॅक्टरीला अंबाझरीतून २ दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:01 IST

पाण्याची टंचाई दिवसेंदिवस अधिक जाणवत आहे. वेणा जलाशय कोरडे पडले आहे. ज्या वेणा जलाशयातून आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा केला जात होता, त्या गावांना आता अन्य ठिकाणांहून पाणी देणे गरजचे आहे. मनपाच्या अंबाझरी तलावातून ऑर्डनन्स फॅक्टरी, वाडी, दवलामेटी या गावांना पाण्यासाठी आरक्षण मनपाने मंजूर केले आहे. अंबाझरीतून ऑर्डनन्स फॅक्टरीला २ दलघमी पाणी देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपाईनलाईनसाठी नऊ कोटींचा खर्च : पालकमंत्र्यांनी घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाण्याची टंचाई दिवसेंदिवस अधिक जाणवत आहे. वेणा जलाशय कोरडे पडले आहे. ज्या वेणा जलाशयातून आजूबाजूच्या गावांना पाणीपुरवठा केला जात होता, त्या गावांना आता अन्य ठिकाणांहून पाणी देणे गरजचे आहे. मनपाच्या अंबाझरी तलावातून ऑर्डनन्स फॅक्टरी, वाडी, दवलामेटी या गावांना पाण्यासाठी आरक्षण मनपाने मंजूर केले आहे. अंबाझरीतून ऑर्डनन्स फॅक्टरीला २ दलघमी पाणी देण्यात येणार आहे.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवरील बैठकी घेतल्या. या बैठकीला आ. समीर मेघे, जिल्हाधिकारी व माजी आ. आशिष जयस्वाल उपस्थित होते. ऑर्डनन्स फॅक्टरीला व जवळच्या गावांना पाणी देण्यासाठी लागणाऱ्या पाईपलाईनला नऊ कोटी रुपयांचा खर्च असून हा खर्च ऑर्डनन्स फॅक्टरी करणार आहे. यासाठी प्रस्ताव कलकत्ता येथे पाठविण्यात आला असून त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळावी म्हणून पालकमंत्री स्वत: संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्याशी बोलले.नागपूरलगत असलेल्या नीलडोह डिगडोह या भागाला पाणी देण्यासाठी मनपाच्या त्रिमूर्तीनगर टाकीवरून पाण्याची पाईपलाईन टाकावी लागणार आहे. या भागालाही वेणा जलाशयातून पाणीपुरवठा होत होता. पण वेणातील पाणी संपल्यामुळे ही योजना बंद पडली. नीलडोह, डिगडोहसाठी तात्पुरती पाणीपुरवठा योजना तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.वानाडोंगरी शहरातील खाणींचे अवैध खड्डे बुजविण्याच्या समस्येवर चर्चा करण्यात आली. या खड्ड्यांमध्ये जवळच असलेल्या रिलायन्स वीज प्रकल्पाची राख टाकून ते बुजवावे अशी सूचना करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कमी किमतीतील घरांच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला.याशिवाय पालकमंत्री पांदण योजना, गोसेखुर्द प्रकलपामुळे पुनर्वसित गाव सालेभट्टी, सालेशहरी येथे प्रियवंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे बांधकाम आरटीई कायद्यानुसार करून देणे, शाळा खोल्या व आवारभिंत बांधण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.पॉवरग्रिड वरोरा ट्रान्समिशन लि.मार्फत टाकण्यात आलेल्या उच्च दाब विद्युत लाईन व टॉवर उभारणीसंदर्भात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्याचे सर्व अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यासाठी आता शासनाकडे येण्याची गरज नाही, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. पैसे मिळाले नसल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी केली होती.

 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेORDNANCE FACTORY AMBAJHARIआयुध निर्माणी अंबाझरी