शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

आदेश २५ टक्क्यांचे, बदल्या ५० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:12 IST

सुदाम राखडे लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : राज्य शासनाने २५ टक्के तलाठ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले असताना, कामठी तालुक्यात ...

सुदाम राखडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : राज्य शासनाने २५ टक्के तलाठ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले असताना, कामठी तालुक्यात मात्र ५० टक्के तलाठ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या प्रक्रियेत शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आल्याचा आराेपही काही तलाठ्यांनी केला आहे. माेठ्या गावांमधील तलाठ्यांची पदे रिक्त असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.

कामठी तालुक्यातील एकूण ७८ गावे २४ पटवारी हलक्यात विभागण्यात आली आहेत. तालुक्याला एकूण २४ तलाठ्यांची आवश्यकता असताना २२ तलाठी कार्यरत असून, दाेन पदे काही वर्षांपासून रिक्त आहेत. राज्य शासनाने महसूल विभागातील २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले हाेते. त्याअनुषंगाने कामठी तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात तालुक्यातील २५ तलाठ्यांच्या बदल्या हाेणे अपेक्षित असताना त्या ५० टक्के करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

बदली करण्यात आलेल्या तलाठ्यांना १ ऑगस्टपासून कार्यमुक्त करण्यात आले आहे. या बदली प्रक्रियेत शासकीय नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचा आराेप जाणकार व्यक्तींसह काही तलाठ्यांनी खासगीत केला असून, तलाठ्यांअभावी कामे खाेळंबली असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्यातील तीन गावांमधील तलाठी कार्यालयात तलाठ्यांची नियुक्ती करण्यात न असल्याने १५ दिवसांपासून कामे खाेळंबली आहेत, अशी माहिती या गावांमधील शेतकऱ्यांनी दिली. तलाठ्यांनी वेळीच नियुक्त न केल्यास आंदाेलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

...

१२ गावात नियुक्ती, तीन गावांचे काय?

बदली प्रक्रियेतील घाेळ चव्हाट्यावर येताच, जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देण्यात आला. त्यांच्या आदेशान्वये कामठी तालुक्यातील १२ तलाठी कार्यालयात तलाठ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येरखेडा, आजनी व साेनेगाव (राजा) ही तालुक्यातील माेठी गावे आहेत. या गावांमध्ये अद्यापही तलाठ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. ती कधी केली जाणार, असा प्रश्नही या गावांमधील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.