शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

आदेश २५ टक्क्यांचे, बदल्या ५० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:12 IST

सुदाम राखडे लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : राज्य शासनाने २५ टक्के तलाठ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले असताना, कामठी तालुक्यात ...

सुदाम राखडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : राज्य शासनाने २५ टक्के तलाठ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले असताना, कामठी तालुक्यात मात्र ५० टक्के तलाठ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या प्रक्रियेत शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आल्याचा आराेपही काही तलाठ्यांनी केला आहे. माेठ्या गावांमधील तलाठ्यांची पदे रिक्त असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.

कामठी तालुक्यातील एकूण ७८ गावे २४ पटवारी हलक्यात विभागण्यात आली आहेत. तालुक्याला एकूण २४ तलाठ्यांची आवश्यकता असताना २२ तलाठी कार्यरत असून, दाेन पदे काही वर्षांपासून रिक्त आहेत. राज्य शासनाने महसूल विभागातील २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले हाेते. त्याअनुषंगाने कामठी तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात तालुक्यातील २५ तलाठ्यांच्या बदल्या हाेणे अपेक्षित असताना त्या ५० टक्के करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

बदली करण्यात आलेल्या तलाठ्यांना १ ऑगस्टपासून कार्यमुक्त करण्यात आले आहे. या बदली प्रक्रियेत शासकीय नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचा आराेप जाणकार व्यक्तींसह काही तलाठ्यांनी खासगीत केला असून, तलाठ्यांअभावी कामे खाेळंबली असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्यातील तीन गावांमधील तलाठी कार्यालयात तलाठ्यांची नियुक्ती करण्यात न असल्याने १५ दिवसांपासून कामे खाेळंबली आहेत, अशी माहिती या गावांमधील शेतकऱ्यांनी दिली. तलाठ्यांनी वेळीच नियुक्त न केल्यास आंदाेलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

...

१२ गावात नियुक्ती, तीन गावांचे काय?

बदली प्रक्रियेतील घाेळ चव्हाट्यावर येताच, जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देण्यात आला. त्यांच्या आदेशान्वये कामठी तालुक्यातील १२ तलाठी कार्यालयात तलाठ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येरखेडा, आजनी व साेनेगाव (राजा) ही तालुक्यातील माेठी गावे आहेत. या गावांमध्ये अद्यापही तलाठ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. ती कधी केली जाणार, असा प्रश्नही या गावांमधील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.