शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

आदेश २५ टक्क्यांचे, बदल्या ५० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:12 IST

सुदाम राखडे लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : राज्य शासनाने २५ टक्के तलाठ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले असताना, कामठी तालुक्यात ...

सुदाम राखडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : राज्य शासनाने २५ टक्के तलाठ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले असताना, कामठी तालुक्यात मात्र ५० टक्के तलाठ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. या प्रक्रियेत शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आल्याचा आराेपही काही तलाठ्यांनी केला आहे. माेठ्या गावांमधील तलाठ्यांची पदे रिक्त असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली.

कामठी तालुक्यातील एकूण ७८ गावे २४ पटवारी हलक्यात विभागण्यात आली आहेत. तालुक्याला एकूण २४ तलाठ्यांची आवश्यकता असताना २२ तलाठी कार्यरत असून, दाेन पदे काही वर्षांपासून रिक्त आहेत. राज्य शासनाने महसूल विभागातील २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले हाेते. त्याअनुषंगाने कामठी तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात तालुक्यातील २५ तलाठ्यांच्या बदल्या हाेणे अपेक्षित असताना त्या ५० टक्के करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

बदली करण्यात आलेल्या तलाठ्यांना १ ऑगस्टपासून कार्यमुक्त करण्यात आले आहे. या बदली प्रक्रियेत शासकीय नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचा आराेप जाणकार व्यक्तींसह काही तलाठ्यांनी खासगीत केला असून, तलाठ्यांअभावी कामे खाेळंबली असल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. तालुक्यातील तीन गावांमधील तलाठी कार्यालयात तलाठ्यांची नियुक्ती करण्यात न असल्याने १५ दिवसांपासून कामे खाेळंबली आहेत, अशी माहिती या गावांमधील शेतकऱ्यांनी दिली. तलाठ्यांनी वेळीच नियुक्त न केल्यास आंदाेलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

...

१२ गावात नियुक्ती, तीन गावांचे काय?

बदली प्रक्रियेतील घाेळ चव्हाट्यावर येताच, जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देण्यात आला. त्यांच्या आदेशान्वये कामठी तालुक्यातील १२ तलाठी कार्यालयात तलाठ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येरखेडा, आजनी व साेनेगाव (राजा) ही तालुक्यातील माेठी गावे आहेत. या गावांमध्ये अद्यापही तलाठ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. ती कधी केली जाणार, असा प्रश्नही या गावांमधील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.