शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

संत्री मंडीत पोहोचली, व्यापारी कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST

शिरीष खोबे नरखेड : यंदा विविध रोगांचा प्रादुर्भाव टाळत शेतातील संत्रा विक्रीसाठी तयार झाला आहे. सोयाबीन, मक्का, कापूस हातचा ...

शिरीष खोबे

नरखेड : यंदा विविध रोगांचा प्रादुर्भाव टाळत शेतातील संत्रा विक्रीसाठी तयार झाला आहे. सोयाबीन, मक्का, कापूस हातचा गेला पण संत्रा साथ देऊ शकतो, अशी आशा बाळगणाऱ्या संत्रा उत्पादकांची चिंता मात्र वाढली आहे. मंडीत संत्रा खरेदीकरिता खरेदीदार नसल्याचे चित्र सध्या नरखेड तालुक्यात आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने आंबिया बहराच्या बाग फुलल्या आहेत. मात्र बागेतील संत्रा व मंडीतील संत्रा विकत घेण्यासाठी कोरोनामुळे विविध राज्यांतील व्यापारी येत नसल्यामुळे संत्रा उत्पादकाची पंचाईत झाली आहे. येथील मंडीतून गत हंगामात ५० ते ६० ट्रक संत्रा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. बांगलादेशात नियमित १२ ट्रक संत्री येथील व्यापारी पाठवायचे. एका हंगामात संत्र्याची उतारी, छाटणी, भराई याकरिता परिसरात हजार ते बाराशे मजूर राबायचे. त्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन मंडीतील हंगामावर अवलंबून राहत असे. परंतु मंडीतील खरेदी-विक्रीचे व्यवहारच २० टक्क्यांवर आल्याने शेतकरी, स्थानिक व्यापारी, अडते, मजूर, छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. विविध राज्यातील स्थानिक बाजारपेठा बंद असल्यामुळे संत्र्याला उठाव नाही. त्यामुळे २२ ते २५ हजार रुपये टन विकला जाणारा संत्रा सध्या १० ते १२ हजार रुपये टन या दराने विकला जात आहे. केरळला पाठविलेला पाच ट्रक संत्रा तीन दिवसापासून रिकामा झाला नाही. ट्रक भरून पाठविताना सोबत भाडेसुध्दा द्यावे लागते अशीही ओरड स्थानिक व्यापाऱ्यांची आहे. यासोबतच संत्र्याची ढेरी लावल्यानंतर खेर संत्रा निघत होता. तो संत्रा स्थानिक हॉकर विकत घेऊन इटारसी, नागपूर, बडनेऱ्यापर्यंत रेल्वेत विकायचे. पण मोठ्या प्रमाणात रेल्वेगाड्या बंद असल्याने व कोरोनामुळे स्थानकावर हॉकर्सना प्रवेशबंदी घालण्यात आल्याने खेर संत्रासुद्धा फेकून द्यावा लागतो आहे.

----

देशातील बाजारपेठेत संत्र्याला मागणी नाही. त्यामुळे खरेदी मंदावली आहे. यापुढे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास मागणी वाढू शकते.

हाजी बब्बू मिया, वाराणसीचे ठोक व्यापारी.