शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

नागपुरात ऑरेंज अलर्ट; वादळी पावसासह गारा पडण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 13:26 IST

Nagpur News हवामान केंद्राच्या नागपूर प्रादेशिक विभागाने पुढील चार दिवसात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. १९ मार्चला नागपूरसह वर्धा आणि गोंदीया या तीन जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देतासी ३० ते ४० किलोमीटर वेगाचे असेल वादळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवामान केंद्राच्या नागपूर प्रादेशिक विभागाने पुढील चार दिवसात ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. १९ मार्चला नागपूरसह वर्धा आणि गोंदीया या तीन जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. या वादळाचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.१७ ते २० मार्च हे चार दिवस विदर्भात पावसाचे राहणार आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, १७ मार्चला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशिम या आठ जिल्ह्यांत तुरळक पावसाचा इशारा दिला आहे. १८ व २० मार्चला सर्व जिल्ह्यात पाऊस पडणार असून १९ मार्चला विजेच्या गडगडाटासह वादळी पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. ३० ते ४० किलोमीटर प्रति ताशी वेगाचे हे वादळ नुकसान पोहोचवू शकते. यामुळे शेतक?्यांना आणि नागरिकांना हवामान खात्याने सावधगिरीचा इशारा दिला आहे.मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने शेतक?्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. भाजीपाला तसेच आंब्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ही सल कायम असतानाच पुन्हा नवे अस्मानी संकट घोंगावत आहे.सोमवारपासूनच वातावरणात बदल जाणवत आहे. दोन दिवसांपासून आकाश ढगाळलेले असून तापमानातही घट झाली आहे. नागपुरातील मंगळवारचे कमाल तापमान ३७.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अमरावती आणि वर्धा येथील तापमान अनुक्रमे ३७.४ व ३७.५ अंश सेल्सिअस होते. विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे ३९.२ अंश नोंदविले गेले तर सर्वात कमी तापमान गोंदीया येथे ३६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अकोला, बुलडाणा आणि गडचिरोली येथे ३८ अंश सेल्सिअस तर यवतमाळात ३८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे..

टॅग्स :Rainपाऊस