शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

व्हीएनआयटी समितीच्या अहवालावर आक्षेप

By admin | Updated: January 8, 2015 01:20 IST

मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना सुचविणाऱ्या व्हीएनआयटी (विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) समितीच्या अहवालावर आक्षेप घेण्यात आला आहे.

हायकोर्ट : मेहंदीबाग रेल्वेगेट वाहतूक कोंडीचे प्रकरणनागपूर : मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना सुचविणाऱ्या व्हीएनआयटी (विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था) समितीच्या अहवालावर आक्षेप घेण्यात आला आहे. खैरीपुरा-बिनाकी-मंगळवारी-प्रेमनगर निवासी कृती समितीचे अध्यक्ष सचिन बिसेन यांची यासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. शासनाने मेहंदीबाग रेल्वेगेटवरील वाहतूक कोंडीचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी व्हीएनआयटी अधिष्ठात्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. समितीने अहवाल देऊन वाहतूक सुरळीत होण्यासाठी मेहंदीबाग येथे सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे अंडरब्रिजला समांतर दुसरा रेल्वे अंडरब्रिज बांधण्याची सूचना केली आहे. याचिकाकर्त्यांनी याचा विरोध केला आहे. सध्याच्या रेल्वे अंडरब्रिजमध्ये पाऊस आल्यानंतर पाणी साचते. यानंतर येथून तासंतास अवागमन करता येत नाही. अशा परिस्थितीत दुसरा रेल्वे अंडरब्रिज किती उपयोगी ठरेल, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उपस्थित केला. तसेच, समितीने समस्येचा अभ्यास करताना इंडियन रोड काँग्रेस व इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट आॅफ सिव्हिल इंजिनिअरिंग यांच्या मार्गदर्शकतत्वांचा विचार केला नसल्याचे सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड़ अनिल किलोर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)अहवालाचा पुनर्विचार कराइंडियन रोड काँग्रेस व इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट आॅफ सिव्हिल इंजिनिअरिंग यांची मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन अहवालाचा पुनर्विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेतल्यानंतर अहवालात बदल करायचा की, जुनाच अहवाल कायम ठेवायचा याचा निर्णय घेऊन तीन आठवड्यांत माहिती सादर करावी, असेही न्यायालयाने सांगितले आहे.