शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

ईडीच्या भीतीमुळे पळालेले एनडीएसोबत, वृंदा करात यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 11:21 IST

‘इंडिया’ सामान्यांचा आवाज बनेल

नागपूर : विरोधी पक्षातील लोकांना ईडी, सीबीआयची भीती दाखवून त्यांच्या पक्षापासून तोडण्यात आले व नंतर त्यांना भाजपने आपल्या सोबत घेतले. ईडीच्या भीतीमुळे पळालेले आज एनडीएसोबत असल्याचे चित्र देशाला पाहायला मिळत आहे, अशी टीका माकपा पोलिट ब्यूरोच्या सदस्य व माजी खासदार वृंदा करात यांनी केली.

आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या बैठकीसाठी वृंदा करात या मंगळवारी नागपुरात आल्या होत्या. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, भाजपला काहीही करून सत्ता हवी आहे. त्यांना तत्त्वांशी घेणेदेणे नाही. २४ विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेले ‘इंडिया’ ही आघाडी जनतेचा आवाज बुलंद करेल. महागाई व बेरोजगारीसारख्या प्रश्नांवर आवाज उठवेल. ही आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर काम करेल. आता विरोधी पक्षांवर मोठी जबाबदारी आली आहे. कोणत्याही परिस्थितीत एकजुटीने राहण्याची वेळ आली आहे. हे सर्व पक्ष देश व संविधान वाचविण्यासाठी एकत्र आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सचिव अरुण लाटकर उपस्थित होते.

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप येणार

- महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही सुरू आहे, ते योग्य नाही. राज्यात पुन्हा एक राजकीय भूकंप येईल, असा दावा करात यांनी केली. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच सत्तेत वाटा दिला. भाजपच्या मशीनमध्ये सर्व स्वच्छ होतात, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा