शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
2
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
3
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
4
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
5
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
6
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
7
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
8
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
9
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
10
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
11
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
12
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
13
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
14
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
15
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
16
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
17
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
18
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
19
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
20
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!

ईडीच्या भीतीमुळे पळालेले एनडीएसोबत, वृंदा करात यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 11:21 IST

‘इंडिया’ सामान्यांचा आवाज बनेल

नागपूर : विरोधी पक्षातील लोकांना ईडी, सीबीआयची भीती दाखवून त्यांच्या पक्षापासून तोडण्यात आले व नंतर त्यांना भाजपने आपल्या सोबत घेतले. ईडीच्या भीतीमुळे पळालेले आज एनडीएसोबत असल्याचे चित्र देशाला पाहायला मिळत आहे, अशी टीका माकपा पोलिट ब्यूरोच्या सदस्य व माजी खासदार वृंदा करात यांनी केली.

आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्या बैठकीसाठी वृंदा करात या मंगळवारी नागपुरात आल्या होत्या. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, भाजपला काहीही करून सत्ता हवी आहे. त्यांना तत्त्वांशी घेणेदेणे नाही. २४ विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेले ‘इंडिया’ ही आघाडी जनतेचा आवाज बुलंद करेल. महागाई व बेरोजगारीसारख्या प्रश्नांवर आवाज उठवेल. ही आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर काम करेल. आता विरोधी पक्षांवर मोठी जबाबदारी आली आहे. कोणत्याही परिस्थितीत एकजुटीने राहण्याची वेळ आली आहे. हे सर्व पक्ष देश व संविधान वाचविण्यासाठी एकत्र आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा सचिव अरुण लाटकर उपस्थित होते.

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप येणार

- महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही सुरू आहे, ते योग्य नाही. राज्यात पुन्हा एक राजकीय भूकंप येईल, असा दावा करात यांनी केली. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच सत्तेत वाटा दिला. भाजपच्या मशीनमध्ये सर्व स्वच्छ होतात, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपा