शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

विरोधकांच्यादेखील गुणांची कदर झाली पाहिजे : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:44 IST

आपल्या समाजात अनेक गुणी माणसे आहेत. त्यांच्या गुणांची कदर झाली पाहिजे. लोकांच्या नकारात्मक बाजूपेक्षा गुणांची चर्चा जास्त झाली तर समाज सशक्त होतो. गुणांची पारख करणारे व कौतुक करणारे लोकदेखील वाढायला हवेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधकांच्यादेखील गुणांची कदर झाली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. भोसले प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या राजरत्न पुरस्कारांचे गुरुवारी वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्दे‘राजरत्न पुरस्कार-२०१९’चे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या समाजात अनेक गुणी माणसे आहेत. त्यांच्या गुणांची कदर झाली पाहिजे. लोकांच्या नकारात्मक बाजूपेक्षा गुणांची चर्चा जास्त झाली तर समाज सशक्त होतो. गुणांची पारख करणारे व कौतुक करणारे लोकदेखील वाढायला हवेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधकांच्यादेखील गुणांची कदर झाली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. भोसले प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या राजरत्न पुरस्कारांचे गुरुवारी वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.महाल येथील सिनियर भोसला पॅलेस येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्याला अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ मठाचे श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज, भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजे रघुजी महाराज भोंसले, राजरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. राजे मुधोजी भोसले, कार्यक्रमाचे संयोजक लक्ष्मीकांत देशपांडे, ठाकूर किशोरसिंह बैस प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील नऊ जणांचा सन्मान करण्यात आला. आपल्या समाजात दुसऱ्यांना मार्ग दाखविणारे अनेक जण दिसून येतात. मात्र अनेक जण स्वत: त्या मार्गावर चालत नाहीत. केवळ मार्ग दाखविणे याने काम होणार नाही. मार्ग दाखविण्यापेक्षा त्या मार्गावर चालणारे झाले पाहिजे, दुसऱ्यांच्या आदर्श मार्गावर चालण्याची लोकांची इच्छा असते. मात्र हिंमत होत नाही. त्यांच्यात आत्मविश्वास जागविला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी केले. देशातील इतर राजघराणे आपापसातील भांडणात व्यस्त राहिले. मात्र भोसले घराण्याने अंतर्गत कलह टाळला. राजांमध्ये अहंकार असायचा. मात्र भोसले त्यापासून दूर राहिले. अहंकाराला नियंत्रणात आणण्यासाठी परिश्रम करावे लागतात, असेदेखील ते म्हणाले.पुरस्कार हे चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना समोर जाण्याची प्रेरणा देतात. कर्तृत्वाची पूजा ही कर्तृत्ववान व्यक्तीच करु शकतात, असे सांगत आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी भोसले घराण्याच्या महत्तेवर प्रकाश टाकला. राजे मुधोजी भोसले यांनी प्रास्ताविकातून पुरस्कारांबाबत माहिती दिली. एम.ए.कादर व सारंग ढोक यांनी संचालन केले तर ठाकूर किशोरसिंह बैस यांनी आभार मानले. अर्जुन कृष्णन्न नायर याने गणेशवंदना नृत्य सादर केले.शहीद सैनिकांना श्रद्धांजलीपुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना कार्यक्रमादरम्यान श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व मान्यवर तसेच उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली अर्पण केली.यांचा झाला गौरव

  • स्वानंद पुंड (इतिहास, साहित्य)
  • विष्णू मनोहर (वैशिष्ट्यपूर्ण कार्य)
  • स्मिता काटवे-मामारर्डे (क्रीडा)
  • संतोष साळुंके (सांस्कृतिक)
  • जयंत हरकरे (पत्रकारिता छायाचित्रकार)
  • अविनाश पाठक (पत्रकारिता)
  • अर्जुन कृष्णन्न नायर (वैशिष्ट्यपूर्ण कार्य-१८ वर्षांखालील)
  • सार्थक धुर्वे (क्रीडा-१८ वर्षांखालील)

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर