शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांच्यादेखील गुणांची कदर झाली पाहिजे : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:44 IST

आपल्या समाजात अनेक गुणी माणसे आहेत. त्यांच्या गुणांची कदर झाली पाहिजे. लोकांच्या नकारात्मक बाजूपेक्षा गुणांची चर्चा जास्त झाली तर समाज सशक्त होतो. गुणांची पारख करणारे व कौतुक करणारे लोकदेखील वाढायला हवेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधकांच्यादेखील गुणांची कदर झाली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. भोसले प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या राजरत्न पुरस्कारांचे गुरुवारी वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्दे‘राजरत्न पुरस्कार-२०१९’चे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या समाजात अनेक गुणी माणसे आहेत. त्यांच्या गुणांची कदर झाली पाहिजे. लोकांच्या नकारात्मक बाजूपेक्षा गुणांची चर्चा जास्त झाली तर समाज सशक्त होतो. गुणांची पारख करणारे व कौतुक करणारे लोकदेखील वाढायला हवेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधकांच्यादेखील गुणांची कदर झाली पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. भोसले प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या राजरत्न पुरस्कारांचे गुरुवारी वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.महाल येथील सिनियर भोसला पॅलेस येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्याला अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ मठाचे श्रीनाथ पीठाधीश्वर आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज, भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजे रघुजी महाराज भोंसले, राजरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. राजे मुधोजी भोसले, कार्यक्रमाचे संयोजक लक्ष्मीकांत देशपांडे, ठाकूर किशोरसिंह बैस प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील नऊ जणांचा सन्मान करण्यात आला. आपल्या समाजात दुसऱ्यांना मार्ग दाखविणारे अनेक जण दिसून येतात. मात्र अनेक जण स्वत: त्या मार्गावर चालत नाहीत. केवळ मार्ग दाखविणे याने काम होणार नाही. मार्ग दाखविण्यापेक्षा त्या मार्गावर चालणारे झाले पाहिजे, दुसऱ्यांच्या आदर्श मार्गावर चालण्याची लोकांची इच्छा असते. मात्र हिंमत होत नाही. त्यांच्यात आत्मविश्वास जागविला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी केले. देशातील इतर राजघराणे आपापसातील भांडणात व्यस्त राहिले. मात्र भोसले घराण्याने अंतर्गत कलह टाळला. राजांमध्ये अहंकार असायचा. मात्र भोसले त्यापासून दूर राहिले. अहंकाराला नियंत्रणात आणण्यासाठी परिश्रम करावे लागतात, असेदेखील ते म्हणाले.पुरस्कार हे चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींना समोर जाण्याची प्रेरणा देतात. कर्तृत्वाची पूजा ही कर्तृत्ववान व्यक्तीच करु शकतात, असे सांगत आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी भोसले घराण्याच्या महत्तेवर प्रकाश टाकला. राजे मुधोजी भोसले यांनी प्रास्ताविकातून पुरस्कारांबाबत माहिती दिली. एम.ए.कादर व सारंग ढोक यांनी संचालन केले तर ठाकूर किशोरसिंह बैस यांनी आभार मानले. अर्जुन कृष्णन्न नायर याने गणेशवंदना नृत्य सादर केले.शहीद सैनिकांना श्रद्धांजलीपुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना कार्यक्रमादरम्यान श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्व मान्यवर तसेच उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली अर्पण केली.यांचा झाला गौरव

  • स्वानंद पुंड (इतिहास, साहित्य)
  • विष्णू मनोहर (वैशिष्ट्यपूर्ण कार्य)
  • स्मिता काटवे-मामारर्डे (क्रीडा)
  • संतोष साळुंके (सांस्कृतिक)
  • जयंत हरकरे (पत्रकारिता छायाचित्रकार)
  • अविनाश पाठक (पत्रकारिता)
  • अर्जुन कृष्णन्न नायर (वैशिष्ट्यपूर्ण कार्य-१८ वर्षांखालील)
  • सार्थक धुर्वे (क्रीडा-१८ वर्षांखालील)

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर