शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेससह इतर विरोधी पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. कृषी कायद्यात झालेले संशोधन शेतकऱ्यांच्या हिताचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काँग्रेससह इतर विरोधी पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. कृषी कायद्यात झालेले संशोधन शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. महाराष्ट्रात अगोदरच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी शासनाने या कायद्यातील अनेक तरतुदी लागू केल्या होत्या. मात्र आता राजकारणासाठी त्याच तरतुदींचा विरोध होत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी लावला. सोमवारी नागपूर पत्रकार क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना भडकविले जात आहे. केंद्र सरकार त्यांच्याशी चर्चा करीत आहे, मात्र प्रत्येक टप्प्यात शेतकरी नवीन मागणी ठेवत आहेत. केंद्र या कायद्याला रद्द करणार नाही. काँग्रेसने आपल्या निवडणूक घोषणापत्रात जी आश्वासने दिली होती, त्यांची भाजप सरकारने कायद्यात संशोधन करून पूर्तता केली आहे. परंतु आता केवळ राजकारण व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बिघडविण्यासाठी विरोध करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण करून पुढील लोकसभा निवडणूक जिंकण्याची स्वप्न पाहिल्या जात आहेत. मात्र हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना ७ ते ८ टक्के रक्कम दलालांना द्यावी लागत आहे. नवीन कायद्यामुळे हे बंद होईल. ज्यांची दुकानदारी या कायद्याने बंद होणार आहे ते लोक आंदोलन करीत आहेत, असे बावनकुळे म्हणाले. पत्रपरिषदेला राजीव पोतदार, रमेश मानकर, संध्या गोतमारे, धर्मपाल मेश्राम व चंदन गोस्वामी उपस्थित होते.

महावितरणला सरकारने १० हजार कोटी द्यावे

राज्य शासन एकीकडे मंत्र्यांच्या बंगल्यांवर ९० कोटी रुपये खर्च करीत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या नावावर इतर विभागांना पैसे देण्यास नकार देत आहे. वीज कंपन्यांना सशक्त करण्यासाठी राज्य शासनाने महावितरणला १० हजार कोटी रुपये दिले पाहिजे. ३०० युनिटपर्यंतचे बिल मोफत करण्याची मागणीदेखील त्यांनी केली.