शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

ऑपरेशन नन्हे फरिश्ते : गावाचा उंबरठा ओलांडणाऱ्या ६७ मुलांची सुखरूप घरवापसी

By नरेश डोंगरे | Updated: June 16, 2024 20:27 IST

पाच महिन्यांत आरपीएफची कामगिरी

नागपूर: रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या चार महिन्यांत ऑपरेशन नन्हे फरिश्तेअंतर्गत वेगवेगळ्या कारणांमुळे गावचा उंबरठा ओलांडणाऱ्या ६७ मुलांची घरवापसी केली. काैटुंबिक समस्या, घरगुती वाद, अल्पवयीन प्रेमप्रकरण, गरिबी, कुणी दाखविलेले आमिष आणि अशाच वेगवेगळ्या कारणांमुळे अल्पवयीन मुले घरून पळून जातात. कुठे तरी मोठ्या शहरात जायचे आणि फिल्मी स्टाइलने जगायचे, असे स्वप्न घेऊन ही मुले घराचा, गावाचा उंबरठा ओलांडतात. मात्र, ऐशआरामाचे जीवन कसे जगणार, कुठे राहणार, त्याची कसलीही तजवीज त्यांच्याकडे नसते आणि त्यांना बाहेर पडल्यानंतर कोणते संकट झेलावे लागणार, त्याचीदेखील कल्पना नसते.

घरच्यांच्या रोकटोकीपासून, कटकटीपासून दूर जायचे आणि मस्त मजा करायची, अशी त्यांची भाबडी कल्पना असते. त्यामुळे ते घर सोडून पळून जातात. लांबचा प्रवास म्हटला की रेल्वेगाडीने करायचा. पैसे असो नसो, तिकीट नाही काढली तरी गर्दीत माहिती पडणार नाही, असाही अनेकांचा गैरसमज असतो. त्यामुळे ते रेल्वे स्थानक गाठतात.

मात्र, अशा घरून पळून आलेल्या अल्पवयीन मुलांना हेरण्याचे खास प्रशिक्षण आरपीएफच्या जवानांना मिळालेले असते. हे प्रशिक्षित जवान आरपीएफकडून वर्षभर नन्हे फरिश्ते नामक ऑपरेशन राबवितात. घरून पळून जाणाऱ्या किंवा कुणी फूस लावून पळवून नेण्याच्या तयारीत असलेल्यांना ते रेल्वे स्थानक आणि परिसरात हेरतात. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस करतात आणि नंतर त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देतात.

गेल्या १ जानेवारी ते ३१ मे २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत अशा प्रकारे घरून पळून आलेल्या ठिकठिकाणच्या ६७ मुला-मुलींना आरपीएफने ताब्यात घेतले. त्यांची चाैकशी करून समुपदेशन केल्यानंतर त्यांच्या पालकांशी संपर्क साधून या मुलांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूर