शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

ऑपरेशन नन्हे फरिश्ते : गावाचा उंबरठा ओलांडणाऱ्या ६७ मुलांची सुखरूप घरवापसी

By नरेश डोंगरे | Updated: June 16, 2024 20:27 IST

पाच महिन्यांत आरपीएफची कामगिरी

नागपूर: रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या चार महिन्यांत ऑपरेशन नन्हे फरिश्तेअंतर्गत वेगवेगळ्या कारणांमुळे गावचा उंबरठा ओलांडणाऱ्या ६७ मुलांची घरवापसी केली. काैटुंबिक समस्या, घरगुती वाद, अल्पवयीन प्रेमप्रकरण, गरिबी, कुणी दाखविलेले आमिष आणि अशाच वेगवेगळ्या कारणांमुळे अल्पवयीन मुले घरून पळून जातात. कुठे तरी मोठ्या शहरात जायचे आणि फिल्मी स्टाइलने जगायचे, असे स्वप्न घेऊन ही मुले घराचा, गावाचा उंबरठा ओलांडतात. मात्र, ऐशआरामाचे जीवन कसे जगणार, कुठे राहणार, त्याची कसलीही तजवीज त्यांच्याकडे नसते आणि त्यांना बाहेर पडल्यानंतर कोणते संकट झेलावे लागणार, त्याचीदेखील कल्पना नसते.

घरच्यांच्या रोकटोकीपासून, कटकटीपासून दूर जायचे आणि मस्त मजा करायची, अशी त्यांची भाबडी कल्पना असते. त्यामुळे ते घर सोडून पळून जातात. लांबचा प्रवास म्हटला की रेल्वेगाडीने करायचा. पैसे असो नसो, तिकीट नाही काढली तरी गर्दीत माहिती पडणार नाही, असाही अनेकांचा गैरसमज असतो. त्यामुळे ते रेल्वे स्थानक गाठतात.

मात्र, अशा घरून पळून आलेल्या अल्पवयीन मुलांना हेरण्याचे खास प्रशिक्षण आरपीएफच्या जवानांना मिळालेले असते. हे प्रशिक्षित जवान आरपीएफकडून वर्षभर नन्हे फरिश्ते नामक ऑपरेशन राबवितात. घरून पळून जाणाऱ्या किंवा कुणी फूस लावून पळवून नेण्याच्या तयारीत असलेल्यांना ते रेल्वे स्थानक आणि परिसरात हेरतात. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस करतात आणि नंतर त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देतात.

गेल्या १ जानेवारी ते ३१ मे २०२४ या पाच महिन्यांच्या कालावधीत अशा प्रकारे घरून पळून आलेल्या ठिकठिकाणच्या ६७ मुला-मुलींना आरपीएफने ताब्यात घेतले. त्यांची चाैकशी करून समुपदेशन केल्यानंतर त्यांच्या पालकांशी संपर्क साधून या मुलांना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूर