शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

ऑपरेशन नन्हे फरिश्ते: घरून पळून गेलेल्या १०६४ अल्पवयीन मुलांची आरपीएफकडून घरवापसी

By नरेश डोंगरे | Updated: April 8, 2024 15:17 IST

नागपूर विभागात १५४ मुले-मुली पुन्हा पोहोचली स्वत:च्या कुटुंबीयांमध्ये

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भविष्याचा विचार न करता लावून वेगवेगळ्या कारणांमुळे किंवा आमिषामुळे घरून पळून जाणाऱ्या १०५४ अल्पवयीन मुलामुलींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्याची प्रशंसनीय कामगिरी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) बजावली आहे.

पाहिजे तसे घरच्यांकडून मिळत नाही, घरातील मंडळी नेहमी टोकतात, नेहमी भांडणं होतात त्याला कंटाळून अनेक अल्पवयीन मुले घर सोडतात. काहींना महानगराची चमकदमक तर काहींना ग्लॅमरचे आकर्षण असल्याने घरून पळ काढतात. तर, काही जणांना फूस लावून आमिष दाखवून पळवून नेले जाते. अशी मुले रेल्वे स्थानकावर दिसताच त्यांना विश्वासात घेऊन आरपीएफकडून विचारपूस केली जाते. त्यांच्या समस्या जाणून घेतले जातात. त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांची चूक लक्षात आणून देत त्यांना त्यांच्या भूमीकेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची कल्पनाही दिली जाते. त्याचे अशा पद्दतीने मतपरिवर्तन करून त्या मुला-मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना बोलवून घेतले जाते आणि त्यांच्या स्वाधिन त्यांची मुले केली जातात. यासाठी आरपीएफकडून चाईल्ड लाईन या स्वयंसेवी संस्थेचीही मदत घेतली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला आरपीएफने 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' असे नाव दिले आहे.

हे ऑपरेशन राबविण्यासाठी आरपीएफच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण दिले जाते. मध्य रेल्वेच्या आरपीएफने एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षभराच्या कालावधीत ठिकठिकाणी ऑपरेशन नन्हे फरिश्ते राबवून १०६४ मुला-मुलींना त्यांच्या कुटुंबियांत पोहचविण्याची कामगिरी बजावली आहे.

विभागनिहाय कारवाईचा आलेख

'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात आरपीएफने सर्वाधिक ३१३ मुला-मुलींची सुटका केली. मुंबई विभागात आरपीएफने ३१२ मुला-मुलींची, पुणे विभागात २१०, नागपूर विभागात १५४ तर, सोलापूर विभागात ७५ मुला-मुलींची आरपीएफने सुखरूप घरवापसी केली.

टॅग्स :nagpurनागपूर