शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुक्त विद्यापीठाचे शिक्षणही महागले; शैक्षणिक शुल्कात ७५ टक्केपर्यंत वाढ

By आनंद डेकाटे | Updated: August 17, 2023 14:12 IST

घरोघरी ज्ञानगंगा कशी पोहोचणार?

नागपूर : समाजातील विविध घटकांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. ५०० विद्यार्थी असलेले मुक्त विद्यापीठात सध्या ६ लाखावर विद्यार्थी शिकताहेत. गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी आशेचे केंद्र आहे. परंतु या वर्षीपासून मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. ३५ ते ७५ टक्केपर्यंत ही वाढ करण्यात आल्याने मूक्त विद्यापीठाचे शिक्षणच महागले आहे. परिणामी घरोघरी ज्ञानगंगा पोहोणार कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात प्रचंड वाढ केलेली आहे. बी.ए.-१ व बी.कॉम.-१ चे शैक्षणिक शुल्क १७०२ रूपयावरून २९८८ रूपये करण्यात आले आहे. ही वाढ ७५ टक्के आहे. विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ५० टक्क्याहून जास्त विद्यार्थी हे बी.ए. व बी.कॉम. अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे याच अभ्यासक्रमांमध्ये मुक्त विद्यापीठाने नेमकी ७५ टक्के शैक्षणिक फी मध्ये वाढ केली आहे.

समाजातील गरीब विद्यार्थी, जे पारंपरिक विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही ते मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचे. परंतु आता पैशाअभावी ते प्रवेश घेऊ शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बी.एस.सी.च्या अभ्यासक्रमात ५५ टक्के, डी.सी.एम.च्या अभ्यासक्रमात ३५ टक्के, एम.ए. अभ्यासक्रमांत ३६ टक्के अशी जवळपास सर्वांचं अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्कात फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते.

- अशी आहे शैक्षणिक शुल्क वाढ

अभ्यासक्रम - जुने शुल्क - नवीन शुल्कबी.ए. -१ - १७०२ रूपये - २९८८ रूपयेबी.ए. -२ - २३०२ रूपये - ३६०८ रूपयेबी.ए.-३ - २५०२ रूपये - ४,०३८ रूपयेबीएससी-१ - ६२०२ रूपये - ९,६२८बीएससी-२ - ६२०२ रूपये -९,५१८बीएससी-३ - ६२०२ रूपये -९,८७८

- राज्यपालांना पत्र, शुल्क वाढ कमी करण्याची मागणी

यासंदर्भात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्वत परिषद व वित्त समितीचे माजी सदस्य प्रा.डॉ.संजय खडक्कार यांनी राज्यपालांना पत्र लिहून शुल्कवाढ कमी करण्याची विनंती केली आहे. मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंना विविध अभ्यासक्रमांमध्ये केलेली शैक्षणिक शुल्क वाढ कमी करण्याचे निर्देश द्यावे, जेणेकरून पैशाअभावी सामान्य विद्यार्थी,जे बिकट परिस्थितीची झुंजून, मोठ्या अथक प्रयासाने,उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, ते प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी विनंती या निवेदनाद्वारे राज्यपालांकडे केली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणYashwantrao Chavan Maharashtra Open Universityयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ