शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

आता वर्षभरासाठी एकच काम : आरटीओचा ‘फॉर्म्युला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:14 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक किंवा सहायक मोटार वाहन निरीक्षकांना वर्षातून काही महिने कार्यालयातील कामकाज, सीमा तपासणी नाके व वायुवेग पथकाची जबाबदारी सांभाळावी लागायची. परंतु यात अधिकाऱ्याच्या कामकाजाचे परीक्षण करणे, जबाबदारी निश्चित करणे, कामाचे नियोजन करणे, कामकाजाचे वाटप करणे व कामातील नैपुण्य प्राप्त होत नसल्याची कारणे देत परिवहन विभागाने वर्षभरासाठी एकच काम, असा ‘फॉर्म्युला’ काढला आहे. परंतु संपूर्ण वर्ष एकच काम करावे लागणार असल्याने या निर्णयाला घेऊन निरीक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.

ठळक मुद्देपरिवहन विभागाचा निर्णय : मोटार वाहन निरीक्षकांमध्ये नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक किंवा सहायक मोटार वाहन निरीक्षकांना वर्षातून काही महिने कार्यालयातील कामकाज, सीमा तपासणी नाके व वायुवेग पथकाची जबाबदारी सांभाळावी लागायची. परंतु यात अधिकाऱ्याच्या कामकाजाचे परीक्षण करणे, जबाबदारी निश्चित करणे, कामाचे नियोजन करणे, कामकाजाचे वाटप करणे व कामातील नैपुण्य प्राप्त होत नसल्याची कारणे देत परिवहन विभागाने वर्षभरासाठी एकच काम, असा ‘फॉर्म्युला’ काढला आहे. परंतु संपूर्ण वर्ष एकच काम करावे लागणार असल्याने या निर्णयाला घेऊन निरीक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.राज्यभरातील सर्वच आरटीओ कार्यालयांमध्ये मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांना वर्षातील काही महिने किंवा दिवस ठरवून दिल्यानुसार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार चक्राकर पद्धतीने काम करावे लागायचे. जसे एका निरीक्षकाला महिन्याभरासाठी वाहन परवाना व नवीन वाहन नोंदणी करावी लागायची, दुसऱ्या महिन्याला योग्यता प्रमाणपत्र देण्याचे कामकाज सांभाळावे लागायचे, तिसऱ्या महिन्याला सीमा तपासणी नाके तर चौथ्या महिन्याला वायुवेग पथकाची जबाबदारी सांभाळावी लागायची. परंतु या कामकाजात बऱ्याच उणिवा असल्याचे परिवहन आयुक्तांचे म्हणणे आहे. त्यांच्यानुसार या कार्यपद्धतीमुळे कार्यालयातील एखाद्या कामकाजाबाबत अधिकाऱ्याचे कामकाजाचे परीक्षण करणे सुलभ होत नाही, अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करणे अवघड होते, दैनंदिन नेमणुकीबाबत अधिकाऱ्याच्या मनात अनिश्चितता येऊ शकते, कामाचे नियोजन करणे अशक्य होऊ शकते, कमी कालावधीच्या कामकाजामुळे एखादे कामकाज कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे याबाबत संबंधित संस्थांना माहिती मिळणे अडचणीचे जाते, कार्यालय प्रमुखास रोजच्या कामकाजाचे वाटप एक दिवस आधी करावे लागते, कार्यालयात संगणक प्रणालीचा वापर होत असल्याने व अनेकवेळा तांत्रिक अडचण येत असल्याने आणि याच दरम्यान दुसऱ्या कामकाजाची जबाबदारी आल्यास योग्य रीतीने त्याचे निराकरण होत नसल्याने वर्षभरासाठी एकच कामाचा निर्णय घेण्यात आला आहे. यात आता एका वर्षासाठी निरीक्षकाला मोटार वाहन परवाना व नवीन वाहन नोंदणीचे काम करावे लागणार आहे. दुसऱ्या वर्षाला वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्राचे कामकाज पहावे लागणार आहे, तिसऱ्या वर्षाला वायुवेग पथक व सीमा तपासणी नाक्याची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर