शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

शेतकरी आत्महत्येची केवळ ५३ टक्केच प्रकरणे मदतीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 20:42 IST

अमरावती विभागात २०१३ सालापासून पावणेसहा हजाराहून अधिक आत्महत्या झाल्या. मात्र यातील ५४ टक्के शेतकऱ्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली व प्रत्यक्षात ५३ टक्केच कुटुंबीयांनाच प्रत्यक्ष मदत मिळू शकली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देअमरावती विभागातील वास्तव : इतरांच्या कुटुंबीयांचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावती विभागात २०१३ सालापासून पावणेसहा हजाराहून अधिक आत्महत्या झाल्या. मात्र यातील ५४ टक्के शेतकऱ्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली व प्रत्यक्षात ५३ टक्केच कुटुंबीयांनाच प्रत्यक्ष मदत मिळू शकली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकाराअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यांसंदर्भात विचारणा केली होती. २०१३ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत अमरावती विभागात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत अमरावती विभागात ५ हजार ९४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी मदतीसाठी प्राप्त झाले. यातील ३ हजार २२८ म्हणजेच ५४.३२ टक्के प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. यातील १८२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असून आतापर्यंत ३ हजार २०७ कुटुंबीयांनाच (५३.९७ टक्के) प्रत्यक्ष मदत मिळू शकली आहे. अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांचा समावेश होतो.यवतमाळमध्ये सर्वाधिक अपात्र प्रकरणेयवतमाळ जिल्ह्यात सहा वर्षांच्या कालावधीत १ हजार ६५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ८१४ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली. त्यातही ३५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असून ८११ (४८.९४ टक्के) प्रकरणांतच प्रत्यक्ष मदत झाली. येथे तब्बल ५१.०६ टक्के प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली. अमरावती जिल्ह्यात सर्वात कमी ४१.२१ टक्के प्रकरणे अपात्र ठरली.

 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता