शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

देशातील ३०० पैकी ४२ प्रदूषित शहरांनाच बजेटचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

नागपूर : देशासमोर हवामान बदलाचे मोठे संकट जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाकरिता २०२० मध्ये देशातील ३०० ...

नागपूर : देशासमोर हवामान बदलाचे मोठे संकट जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाकरिता २०२० मध्ये देशातील ३०० शहरांची निवड करण्यात आली आहे. या सर्वच शहरांमध्ये उपाययोजना होणे अपेक्षित असताना, अर्थसंकल्पात फक्त २,२१७ कोटी रुपयांची तरतूद करून देशातील ४२ शहरांमध्येच हे लागू केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे देशातील पर्यावरण, हवामान बदल आणि प्रदूषण कमी करण्याबाबत यंदाच्या अर्थसंकल्पाने पर्यावरणवाद्यांची निराशा केली आहे.

२०२० च्या अर्थसंकल्पामध्ये राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमासाठी ४,४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, तर २०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये वायू प्रदूषणाकरिता केवळ २,२१७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशातील ४२ शहरांमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याकरिता हा निधी वापरला जाणार आहे. ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स-२०१२ नुसार जगात हवामान बदलाचा मोठ्या प्रमाणात परिणाम जाणवत असणाऱ्या देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर आहे. यामध्ये वायू प्रदूषण महत्त्वाचे असून ते नियंत्रणामध्ये आणल्यास हवामान बदलाचा सामना करता येणार आहे. कोविडमुळे बजेटमधील तरतूद कमी केली असली तरी, भविष्यात देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पर्यावरण, वन, वन्यजीव संरक्षण महत्त्वाचे आहे, असा सूर अनेक पर्यावरणवाद्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.

ज्येष्ठ पर्यावरण व खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे म्हणाले, हे बजेट आरोग्य आणि आधारभूत क्षेत्रासाठी चांगले असले तरी, वायू प्रदूषण आणि घनकचरा व्यवस्थापन कमी करण्यासाठी झालेली तरतूद कमी आहे. हवामान बदल आणि त्यातून होणाऱ्या आर्थिक नुकसानीतून देशाचा जीडीपी पाच टक्के कमी होऊ शकतो. वन व वन्यजीव संरक्षण हा सुद्धा मुद्दा देशाचा जीडीपी वाढवू शकतो. त्यावर भर देऊन हवामान बदल आणि प्रदूषण कमी करण्यासाठी दुप्पट फंड द्यायला हवा होता, द्यावा, कारण वन, पर्यावरण मंत्रालयाला कमी निधी मिळतो.

राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य श्रीकांत गाडीकर म्हणाले, वातावरणात वेगाने बदल जाणवत असतानाही तरतूद कमी झाली आहे. केवळ राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाकरिता तरतूद मर्यादित न ठेवता सामाजिक अर्थव्यवस्थेचा विचार व्हायला हवा होता. हा सर्वसामान्यांच्या आरोग्याशी जुळलेला विषय आहे. बजेटमधील तरतुदी स्वागतार्ह असल्या तरी त्या व्यापक हव्या होत्या. जाता-जाता बजेटमध्ये या विषयाला स्पर्श केल्यासारखे दिसत आहे. उलट यावर अध्ययन करून भरीव तरतूद हवी होती.

विदर्भ पर्यावरण कृती समितीचे सुधीर पालीवाल यांनीही अपुऱ्या तरतुदीवर नाराजी दर्शविली आहे. पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे बजेटमध्ये फारसे लक्ष दिल्याचे दिसत नाही. विकासाची परिभाषा पर्यावरणातून होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास हानीच होणार आहे. वीज प्रकल्पांमध्ये पूर्वी आयात केलेला कोळसा वापरला जायचा. त्यातून राख कमी निघायची. परंतु आता सर्रास स्थानिक कोळसा वापरला जात असल्याने प्रदूषण वाढल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

...

स्वायत्त संस्थांच्या आर्थिक तरतुदीमध्ये कपात

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या पाच स्वायत्त संस्थांच्या आर्थिक तरतुदीमध्ये कपात झाली आहे. यात जीबी पंत हिमालयीन पर्यावरण आणि विकास संस्था, भारतीय वनीकरण संशोधन व शिक्षण परिषद, भारतीय वनव्यवस्थापन संस्था, इंडियन प्लायवूड उद्योग संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि भारतीय वन्यजीव संस्था या संस्थांचा यात समावेश होतो. २०२० च्या अर्थसंकल्पामध्ये या संस्थांना ३४० कोटी देण्यात आले होते. यंदा या पाचही संस्थांसाठी ३०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

...