शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

नागपूर वगळता विभागात ४० टक्केच कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 11:51 IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. तेव्हा प्रत्येकास कर्ज मिळेल, असा दावा केला जात असताना राष्ट्रीयीकृत बँका मात्र माफीच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत उदासीन आहेत.

ठळक मुद्देआदेशाचे पालन नाही राष्ट्रीयीकृत बँकांची उदासीनता चव्हाट्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. तेव्हा प्रत्येकास कर्ज मिळेल, असा दावा केला जात असताना राष्ट्रीयीकृत बँका मात्र माफीच्या आदेशानंतरही शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत उदासीन आहेत. नागपूर विभागात नागपूर व वर्धा जिल्हा सोडला तर राष्ट्रीयीकृत बँकांची कर्ज वाटपाची टक्केवारी ४० टक्केही नाही. त्यामुळे कर्ज वाटपाचा नेमका फायदा कुणाला झाला, असा प्रश्न विचारला जात आहे.मागील वर्षी खरीप हंगामाच्या वेळी शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात २०१७ पूर्वीच्या पाच वर्षांतील थकबाकीदारांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर याची मर्यादा वाढवून २००१ पासूनचे थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. पहिल्या टप्प्यातच ७० लाखांच्यावर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून, यामुळे शासनावर ३४ हजार कोटींचा भार येण्याचा दावा शासनाकडून करण्यात आला होता. नागपूर विभागात पाच लाखावर शेतकऱ्यांना माफीचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात सप्टेंबरपर्यंत अडीच लाखाच्या जवळपास शेतकऱ्यांना फायदा झाला. शासनाने आॅगस्ट २०१७ पर्यंतचे कर्ज आणि व्याजाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ होण्यास विलंब झाला. त्यावरील व्याजाची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत आहे. व्याजाच्या रकमेपोटी शेतकरी बँकेच्या दरबारी कर्जदार आहे. शासनाने व्याजाची रक्कम सोडण्याचे आवाहन केले असून, तसे आदेशही दिले आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँका शासनाचे आदेश पाळण्यास तयार नाही. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाही. नागपूर विभागात राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्ज वाटपाचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. नागपूर जिल्हा वगळता इतर पाच जिल्ह्याचे सरासरी कर्ज वाटप ४० टक्क्याच्याच घरात आहे. बँकांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारी जावे लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी