शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

एमएसएमई औद्योगिक गुंतवणुकीत विदर्भाची बोळवण; अमरावती विभाग राज्यात तळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 10:55 IST

ग्रामीण भागात औद्योगिक गुंतवणुकीचा व शेतीशिवाय अन्य रोजगाराचा अभाव हे विदर्भातील गरिबीचे महत्त्वाचे कारण असल्याचे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे.

कमल शर्मा

नागपूर : वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावरून महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने प्रादेशिक विकास मंडळांचे पुनरुज्जीवन करून विकासाला चालना देण्याची घोषणा केली. अशावेळी २०१५ ते २०२० या सहा वर्षांमध्ये मध्यम, लघु व सूक्ष्म म्हणजे एमएमएमई उद्योगांमध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या एकूण गुंतवणुकीपैकी अवघी प्रत्येकी ११ टक्के गुंतवणूक विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्यात पाच जिल्ह्यांचा अमरावती विभाग अवघ्या तीन टक्के गुंतवणुकीसह तळाच्या स्थानी आहे.

ग्रामीण भागात औद्योगिक गुंतवणुकीचा व शेतीशिवाय अन्य रोजगाराचा अभाव हे विदर्भातील गरिबीचे महत्त्वाचे कारण असल्याचे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे. एमएसएमई उद्याेगांचे क्षेत्र अशी गुंतवणूक व रोजगारनिर्मितीचा कणा मानले जाते. या पार्श्वभूमीवर, राज्यातील २०१५ पासूनच्या या क्षेत्रातील गुंतवणुकीचे चित्र आधीच मागास असलेल्या या भागावर प्रचंड अन्याय करणारे आहे. विदर्भाच्या अनुशेषाचा एक नवा प्रकार यातून तयार झाला आहे.

राज्य सरकार ऑक्टोबर २०१५ पासून मध्य, सूक्ष्म व लघु उद्योग (एमएसएमई) ला १२ क्रमांकांचा उद्योग आधार क्रमांक देते. त्यानुसार या उद्योगांची नोंद राष्ट्रीय स्तरावरही केली जाते. त्यामुळे या विशिष्ट क्षेत्रात झालेली नवी नोंदणी, गुंतवणूक, राेजगार याचे विश्लेषण करणे सोपे झाले आहे. त्यानुसार, २०१५ ते २०२० पर्यंत राज्यात १७ लाख ६७ हजार एमएसएमईची नोंदणी झाली. त्यात २ लाख ३ हजार ५४३ कोटी रुपयांची गुंतवणूक तर ९० लाख १ हजार लोकांना रोजगार मिळाला. विदर्भातील नागपूर व अमरावती विभागातील अकरा जिल्ह्यांमध्ये एकूण गुंतवणुकीपैकी अनुक्रमे ८ व ३ टक्के अशी एकूण ११ टक्के गुंतवणूक झाली. तर जवळपास एवढीच गुंतवणूक मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये आणि पाच जिल्ह्यांच्या नाशिक विभागात झाली. एमएसएमई उद्योगांमधील तब्बल ३० टक्के गुंतवणूक पुणे विभागात, त्या खालोखाल २० टक्के मुंबईवगळता कोकणात, १८ टक्के मुंबईत झाली.

गुंतवणूक व रोजगार निर्मितीचे हे उलटे चक्र २०२१ मध्येही तसेच सुरू राहिले. गुंतवणुकीचे आकडे अद्याप समाेर आले नाहीत. तथापि, राज्यातील अन्य महसूल विभागांच्या तुलनेत विदर्भाचे मागासलेपण नोंदणीतून स्पष्ट होते. अर्थातच, त्यामुळे राेजगाराच्या संधीही कमी तयार झाल्या.

उद्योग क्षेत्राचाही अनुशेष मोजा

विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना १ मे १९९४ रोजी करण्यात आली. त्या टप्प्यावर भुजंगराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली इंडिकेटर्स व बॅकलॉग कमिटीने अनुशेष मोजला. पण ते मोजमाप सिंचन, रस्ते, शिक्षण, आरोग्य वगैरे ९ क्षेत्रांपुरते मर्यादित होते. उद्योग क्षेत्राचा त्यात समावेश नव्हता. त्याुळे विदर्भाच्या औद्योगिक मागासलेपणाची अधिकृत अशी आकडेवारी नाही. आता राज्य सरकारने विकास मंडळांचे पुनरुज्जीवन केले असल्याने क्षेत्रातील अनुशेष मोजायला हवा, अशी मागणी विदर्भवादी अभ्यासक नितीन रोंघे यांनी केली आहे.

२०१५ ते २०२० एमएसएमई गुंतवणूक

विभाग - आधार नोंदणी - रोजगार (लाखात) गुंतवणूक (कोटीमध्ये)

कोकण - ३,८६,२०९- २०.२४ - ४८,३१७

मुंबई - ३,६६,४४९ - २१.५५- ४२,६७४

नाशिक - १,५७,५१५ - ७.५३- २५,८४५

पुणे - ४,०४,०७८ - २३.५९ - ६९,८५६

औरंगाबाद - १,८१,३५५- ८.७९- २५,५०१

अमरावती - ६७,२०६ - २.५४ - ७,६१३

नागपूर - २,०४,५४७ - ६.७८- १८,७३७

२०२१ ते २०२२ पर्यंत आधार नोंदणी

विभाग - सूक्ष्म - लघु - मध्यम

कोकण - २,१७,११३- ८०२८- ८२७

मुंबई - १,७४,८१६ - १४,३१८- २,८६३

नाशिक - १,२५,८३०-३,६८६-३६८

पुणे - २,००,७८५, ५८८६, ५४५

औरंगाबाद - १,२८,३१५- २६००- ३३१

अमरावती - ५६,१२८-१३३३-११९

नागपूर - ८३,३४३- ३,१०३- ३८०

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Governmentसरकारbusinessव्यवसायVidarbhaविदर्भ