शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

एमएसएमई औद्योगिक गुंतवणुकीत विदर्भाची बोळवण; अमरावती विभाग राज्यात तळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 10:55 IST

ग्रामीण भागात औद्योगिक गुंतवणुकीचा व शेतीशिवाय अन्य रोजगाराचा अभाव हे विदर्भातील गरिबीचे महत्त्वाचे कारण असल्याचे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे.

कमल शर्मा

नागपूर : वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणावरून महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने प्रादेशिक विकास मंडळांचे पुनरुज्जीवन करून विकासाला चालना देण्याची घोषणा केली. अशावेळी २०१५ ते २०२० या सहा वर्षांमध्ये मध्यम, लघु व सूक्ष्म म्हणजे एमएमएमई उद्योगांमध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या एकूण गुंतवणुकीपैकी अवघी प्रत्येकी ११ टक्के गुंतवणूक विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्यात पाच जिल्ह्यांचा अमरावती विभाग अवघ्या तीन टक्के गुंतवणुकीसह तळाच्या स्थानी आहे.

ग्रामीण भागात औद्योगिक गुंतवणुकीचा व शेतीशिवाय अन्य रोजगाराचा अभाव हे विदर्भातील गरिबीचे महत्त्वाचे कारण असल्याचे अनेक अभ्यासांमधून समोर आले आहे. एमएसएमई उद्याेगांचे क्षेत्र अशी गुंतवणूक व रोजगारनिर्मितीचा कणा मानले जाते. या पार्श्वभूमीवर, राज्यातील २०१५ पासूनच्या या क्षेत्रातील गुंतवणुकीचे चित्र आधीच मागास असलेल्या या भागावर प्रचंड अन्याय करणारे आहे. विदर्भाच्या अनुशेषाचा एक नवा प्रकार यातून तयार झाला आहे.

राज्य सरकार ऑक्टोबर २०१५ पासून मध्य, सूक्ष्म व लघु उद्योग (एमएसएमई) ला १२ क्रमांकांचा उद्योग आधार क्रमांक देते. त्यानुसार या उद्योगांची नोंद राष्ट्रीय स्तरावरही केली जाते. त्यामुळे या विशिष्ट क्षेत्रात झालेली नवी नोंदणी, गुंतवणूक, राेजगार याचे विश्लेषण करणे सोपे झाले आहे. त्यानुसार, २०१५ ते २०२० पर्यंत राज्यात १७ लाख ६७ हजार एमएसएमईची नोंदणी झाली. त्यात २ लाख ३ हजार ५४३ कोटी रुपयांची गुंतवणूक तर ९० लाख १ हजार लोकांना रोजगार मिळाला. विदर्भातील नागपूर व अमरावती विभागातील अकरा जिल्ह्यांमध्ये एकूण गुंतवणुकीपैकी अनुक्रमे ८ व ३ टक्के अशी एकूण ११ टक्के गुंतवणूक झाली. तर जवळपास एवढीच गुंतवणूक मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये आणि पाच जिल्ह्यांच्या नाशिक विभागात झाली. एमएसएमई उद्योगांमधील तब्बल ३० टक्के गुंतवणूक पुणे विभागात, त्या खालोखाल २० टक्के मुंबईवगळता कोकणात, १८ टक्के मुंबईत झाली.

गुंतवणूक व रोजगार निर्मितीचे हे उलटे चक्र २०२१ मध्येही तसेच सुरू राहिले. गुंतवणुकीचे आकडे अद्याप समाेर आले नाहीत. तथापि, राज्यातील अन्य महसूल विभागांच्या तुलनेत विदर्भाचे मागासलेपण नोंदणीतून स्पष्ट होते. अर्थातच, त्यामुळे राेजगाराच्या संधीही कमी तयार झाल्या.

उद्योग क्षेत्राचाही अनुशेष मोजा

विदर्भ वैधानिक विकास मंडळाची स्थापना १ मे १९९४ रोजी करण्यात आली. त्या टप्प्यावर भुजंगराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली इंडिकेटर्स व बॅकलॉग कमिटीने अनुशेष मोजला. पण ते मोजमाप सिंचन, रस्ते, शिक्षण, आरोग्य वगैरे ९ क्षेत्रांपुरते मर्यादित होते. उद्योग क्षेत्राचा त्यात समावेश नव्हता. त्याुळे विदर्भाच्या औद्योगिक मागासलेपणाची अधिकृत अशी आकडेवारी नाही. आता राज्य सरकारने विकास मंडळांचे पुनरुज्जीवन केले असल्याने क्षेत्रातील अनुशेष मोजायला हवा, अशी मागणी विदर्भवादी अभ्यासक नितीन रोंघे यांनी केली आहे.

२०१५ ते २०२० एमएसएमई गुंतवणूक

विभाग - आधार नोंदणी - रोजगार (लाखात) गुंतवणूक (कोटीमध्ये)

कोकण - ३,८६,२०९- २०.२४ - ४८,३१७

मुंबई - ३,६६,४४९ - २१.५५- ४२,६७४

नाशिक - १,५७,५१५ - ७.५३- २५,८४५

पुणे - ४,०४,०७८ - २३.५९ - ६९,८५६

औरंगाबाद - १,८१,३५५- ८.७९- २५,५०१

अमरावती - ६७,२०६ - २.५४ - ७,६१३

नागपूर - २,०४,५४७ - ६.७८- १८,७३७

२०२१ ते २०२२ पर्यंत आधार नोंदणी

विभाग - सूक्ष्म - लघु - मध्यम

कोकण - २,१७,११३- ८०२८- ८२७

मुंबई - १,७४,८१६ - १४,३१८- २,८६३

नाशिक - १,२५,८३०-३,६८६-३६८

पुणे - २,००,७८५, ५८८६, ५४५

औरंगाबाद - १,२८,३१५- २६००- ३३१

अमरावती - ५६,१२८-१३३३-११९

नागपूर - ८३,३४३- ३,१०३- ३८०

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Governmentसरकारbusinessव्यवसायVidarbhaविदर्भ