शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणानंतर पॉझिटिव्ह आलेल्यांचे प्रमाण फक्त ०.०२ ते ०.०४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 09:52 IST

Nagpur news; कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम सुरू केली. सुरुवातीला त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. परंतु, लसीकरणाबाबत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये प्रचंड गैरसमज पसरल्याने ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

ठळक मुद्देलस घ्या, गैरसमज टाळा जनजागृतीवर द्यावा भर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनावर मात करण्यासाठी सरकारने लसीकरणाची मोहीम सुरू केली. सुरुवातीला त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. परंतु, लसीकरणाबाबत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये प्रचंड गैरसमज पसरल्याने ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. मुळात देशात आतापर्यंत पार पडलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर या लस अतिशय प्रभावी ठरत असल्याचे दिसून येते. लसीकरणाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लसीकरणानंतर पॉझिटिव्ह आलेल्यांचे प्रमाण केवळ ०.०२ ते ०.०४ टक्के इतके अत्यल्प आहे. म्हणजेच कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण अतिशय प्रभावी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सध्याचे कोरोनाचे थैमान बघता आता लस हाच एकमेव पर्याय म्हणता येईल. तेव्हा लोकांनीही यासंदर्भातील गैरसमज दूर करावेत, प्रशासनाने यासंदर्भात जनजागृती करण्याची गरज आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी देशात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड अशा दोन लसी टोचल्या जात आहेत. या दोन्ही अतिशय यशस्वी ठरल्या आहेत. देशात कोव्हॅक्सिन ही लस आतापर्यंत १.१ कोटी लोकांनी टोचून घेतली आहे. यामध्ये ९३ लाख ५६ हजार ४३६ लोकांनी पहिला डोस घेतला. या पहिल्या डोसनंतर कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या लोकांची संख्या ४२०८ म्हणजे केवळ ०.०४ टक्के इतकी आहे. तसेच १७ लाख २७ हजार १७८ लोकांनी दुसरा डोज घेतला. यापैकी केवळ ६९५ म्हणजेच ०.०.४ टक्के लोक पॉझिटिव्ह आले. तसेच कोविशिल्ड ही लस आतापर्यंत ११.६ कोटी लोकांनी टोचून घेतली आहे. यात १० कोटी ३ लाख २ हजार ७४५ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यापैकी १७,१४५ म्हणजेच ०.०२ टक्के इतके जण पॉझिटिव्ह आलेत. तसेच १ कोटी ५७ लाख ३२ हजार ७५४ जणांनी दुसरा डोस घेतला असून, यापैकी ५०१४ म्हणजेच ०.०३ टक्के इतके जण पॉझिटिव्ह आले. एकूणच ही आकडेवारी पाहिली तर दोन्ही लसी या कोरोनाच्या रोखथामासाठी अतिशय प्रभावी ठरत असल्याचे दिसून येते.

ग्रामीण भाागात लसीकरणाची गती मंदावली

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले होते. परंतु, लसीकरणानंतर मृत्यू होत असल्याची भीती ग्रामीण भागात वाढली आहे. परिणामी, लसीकरणाच्या सुरुवातीला प्रत्येक केंद्रावर दोनशे ते अडीचशे लोकांच्या रांगा लागायच्या. मात्र भीतीमुळे ही गती मंदावली आहे. आता १५ ते २० लोकही लस घेण्यासाठी येत नाही, असे चित्र आहे. याचा परिणामही दिसून येत आहे. दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहे. ग्रामीण भागातून अधिकृतपणे येणारा मृत्यूचा आकडा वाढत आहे. घरातच होणाऱ्या मृत्यूंची संख्याही मोठी आहे. गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यावर पाहिजे त्या प्रमाणात भर देण्यात आला नाही. त्याचा विपरित परिणाम आता दिसून येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले.

 लस घेतल्यानंतर येतोय ताप

लस घेतल्यानंतर ताप येतो, हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पाच ते सहा दिवस लोटल्यानंतर ते कोरोना टेस्ट करतात आणि त्यात ते पॉझिटिव्ह निघतात. तोपर्यंत कोरोनाचे इन्फेक्शन वाढून जाते. पुढे उपचारात होत असलेल्या अडचणींमुळे रुग्णाचा मृत्यू होत असल्याचे बोलले जात आहे. अशा अनेक घटना दररोज ग्रामीण भागात घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस