शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून ऑनलाईन शाळा, पण पुस्तकाविना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

नागपूर : सोमवारी २८ जूनपासून शाळा उघडणार असल्या तरी कोरोना संक्रमणामुळे वर्ग ऑनलाईनच भरणार आहेत. पुस्तकाशिवाय अभ्यान नाही, हे ...

नागपूर : सोमवारी २८ जूनपासून शाळा उघडणार असल्या तरी कोरोना संक्रमणामुळे वर्ग ऑनलाईनच भरणार आहेत. पुस्तकाशिवाय अभ्यान नाही, हे खरे असले तरी यंदा बालभारतीकडून पुस्तकांचा पुरवठा वेळवर झाला नाही. त्यामुळे महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळा पुस्तकाविनाच भरणार, असे दिसत आहे.

ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या जवळपास १,५३० तर नागपूर शहरात महापालिकेच्या १५६ वर शाळा आहेत. शहर व ग्रामीण भागात इतर अनुदानित एक हजारावर शाळा आहे. येथील सर्व इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या १ लाख ४९ हजारावर विद्यार्थ्यांकरिता जि.प.च्या शिक्षण विभागाकडून जवळपास ८ लाख २ हजाराहून अधिक पुस्तकांची मागणी बालभारतीकडे अनेक दिवसांपूर्वीच केली आहे. दरवर्षी बालभारतीकडून साधारणत: मे महिन्यात पुस्तकांची छपाई होऊन केंद्र शाळांवर पोहोचविली जाते. परंतु सोमवारपासून शहर व ग्रामीण भागातील सर्व माध्यमांच्या शाळा ऑनलाईन सुरु होत असल्या तरी पुस्तके उपलब्ध नाहीत. गतवर्षी कोरोनाचा प्रकोप असतानाही शाळांना दहा दिवसांपूर्वीच पुस्तके उपलब्ध होऊन सत्र सुरु होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हातात पडली होती.

...

शिक्षकांना दैनंदिन अहवाल सादर करणे अनिवार्य

विद्यार्थ्यांविना उद्या सोमवारपासून यंदाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असून ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार आहे. पहिली ते नववी शिक्षक ५० टक्के उपस्थिती, तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य आहे. शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचे सांगण्यात येते. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविले की ऑफलाईन याचा अहवाल त्यांना दररोज ग्रामीण भागात केंद्र प्रमुखांकडे सादर करावा लागणार आहे.

...

पाठ्यपुस्तकाच्या पुनर्वापर योजनेला प्रतिसाद नाही

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ८ डिसेंबर, २०२० रोजी पाठ्यपुस्तकाच्या पुनर्वापराबाबत शासन निर्णय निर्गमित केला होता. त्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला होता. पुस्तकांच्या पुनर्वापरामुळे कागदांची बचत होत असल्याने पालकांनी पुस्तके परत करावी, असे आवाहनवजा विनंती शिक्षण विभागाने केली होती. परंतु नागपूर जिल्ह्यातील पालकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामीण भागात गतवर्षी वितरित केलेल्या एकूण पुस्तकांपैकी केवळ १५ ते १८ टक्के पुस्तके परत आल्याची माहिती आहे.

...

कोट

युडायसप्रमाणे बालभारतीकडे पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली. अद्यापपर्यंत पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. पुस्तके उपलब्ध होताच विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येईल.

- चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)