शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

नागपुरात कांद्याची फोडणी महाग! पावसामुळे पीक खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 21:05 IST

दिवाळीपूर्वी आणि दिवाळीत आलेल्या पावसामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात कांद्याचे पीक खराब झाल्याने तीन दिवसांत कांदा कळमना ठोक बाजारात प्रति किलो १० रुपयांनी महाग झाला आहे. परिणामी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत.

ठळक मुद्देआवक कमी, आणखी भाव खाणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीपूर्वी आणि दिवाळीत आलेल्या पावसामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात कांद्याचे पीक खराब झाल्याने तीन दिवसांत कांदा कळमना ठोक बाजारात प्रति किलो १० रुपयांनी महाग झाला आहे. परिणामी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे महिलांसाठी स्वयंपाकघरात कांद्याची फोडणी महाग झाली आहे.कनार्टक, आंध्रप्रदेशात पीक खराबकळमना आलू-कांदे बाजारात तीन दिवसांपूर्वी ८०० ते १००० रुपये मण (४० किलो) असलेले कांद्याचे भाव आवक कमी झाल्यामुळे अचानक १२०० ते १६०० रुपयांवर अर्थात ठोक बाजारातच कांदे दर्जानुसार प्रति किलो ३० ते ४० रुपयांवर पोहोचले आहेत. कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी सांगितले की, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात निघणाच्या तयारीत असलेला २५ टक्के कांदे पावसामुळे खराब झाले. तर दसऱ्याला बाजारात येणारा धुळे येथील कांदा आता विक्रीस येत आहे. नाशिक येथील दिवाळीत निघणाºया कांद्यासाठी पुन्हा १५ ते २० दिवस वाट पाहावी लागणार आहे. आवक कमी झाल्यामुळे भाव अचानक वाढले. काही दिवसांपूर्वी आठवड्यात २० ते २५ ट्रकची आवक आता १० ते १२ ट्रकपर्यंत कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे.आवक ५० टक्क्यांनी घसरलीशेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा आता २० टक्के शिल्लक आहे.तर सरकारने वेअरहाऊसमध्ये ठेवलेला कांदा मध्यंतरी भाववाढीनंतर बाजारात विक्रीसाठी आणला होता. त्यामुळे आता सरकारकडे कांदा शिल्लक नाही. त्यामुळे भाववाढीवर पर्याय म्हणून सरकारकडून कांदा बाजारात येणार नाही. आवकीची क्षमता ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. हीच स्थिती संपूर्ण देशात आहे. धुळे आणि नाशिकचा कांदा पूर्णक्षमतेने बाजारात येईपर्यंत ग्राहकांना महिनाभर जास्त भावातच कांदे खरेदी करावे लागतील, असे वसानी यांनी सांगितले.तर कांदा पोहोचला असता १०० रुपयांवर!निर्यातबंदी आणि अफगाणिस्तान व इजिप्तमधून कांद्याची आयात सुरू असल्यामुळे भाववाढीवर नियंत्रण आहे. निर्यात सुरू असती तर कांद्याचे भाव १०० रुपयांवर पोहोचले असते आणि सरकारची स्थिती बिकट झाली असती. अफगाणिस्तान आणि इजिप्तचा कांदा पंजाब आणि दिल्लीला येत आहे. त्यामुळे या राज्याची गरज पूर्ण होत आहे. या कांद्याची गुणवत्ता चांगली नाही, पण शॉर्टेजमुळे विक्री होत आहे.हुगळी, कर्नुल, बेळगाव येथून आवकसध्या लाल कांदे हुगळी आणि कर्नुल तर पांढरे कांदे बेळगाव येथून येत आहेत. विदर्भातून कांद्याची आवक संपली आहे. अन्य जिल्हे वा राज्यातून आवक कमी असतानाही विदर्भातील बुलडाणा येथून लाल आणि अमरावती व अकोला येथून येणाºया पांढºया कांद्यामुळे कळमना बाजाराची गरज पूर्ण होते. पण सध्या या भागात लागवड सुरू असून मार्चमध्ये पीक निघेल, असे वसानी यांनी स्पष्ट केले.बटाटे महागलेकळमना बाजारात मागील आठवड्यापर्यंत प्रति किलो ८ ते १० रुपयांवर असलेले बटाट्याचे भाव आता १२ ते १५ रुपयांवर पोहोचले आहे. किरकोळमध्ये भाव २५ ते ३० रुपयात विक्री होत आहे. भाववाढीसाठी पाऊस महत्त्वाचा घटक ठरला आहे. बेंगळुरू येथे पावसामुळे बटाट्याचे ५० टक्के पीक खराब झाले आहे. त्यामुळे जुन्या मालाची आवक वाढली, पण त्यासोबतच भावही वाढले आहेत. सध्या उत्तर प्रदेशातील आग्रा, तिरसागंज, कानपूर येथून आवक आहे. नियमित होणारी २५ ट्रकची आवक आता १५ ते २० ट्रकपर्यंत कमी झाली आहे. पुढे बटाट्याच्या भाववाढीची शक्यता नसल्याचे वसानी म्हणाले.लसूण, अद्रक महागलेगेल्यावर्षी पीक कमी झाल्यामुळे आणि यंदा पावसामुळे पीक खराब झाल्यामुळे लसणाची आवक कमी झाली आहे. परिणामी भाव वाढले आहेत. राजस्थानातील कोटा, मध्य प्रदेशातील रतलाम आणि उज्जैन येथून नियमित होणारी तीन ट्रकची आवक आता दोनपर्यंत कमी झाली आहे. कळमन्यात चांगल्या प्रतिचे लसूण १८० ते २०० रुपये किलो विकल्या जात आहे. त्यासोबतच किरकोळमध्ये भाव वाढले आहेत. नवीन लसूण बाजारात येण्यास आणखी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.अद्रकाचे भाव ठोकमध्ये ४० ते ५० रुपयांवर असून, किरकोळमध्ये दुप्पट भावात विक्री होत आहे. बाजारात जुना आणि नवीन माल विक्रीस आहे. कळमन्यात अद्रकची आवक केरळ राज्यातून होते. नवीन माल छिंदवाडा येथून येत आहे. सध्या तीन ते चार ट्रकची आवक आहे.