शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

एक सदस्यीय प्रभागावर शिक्कामोर्तब : विधिमंडळात विधेयक मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 23:05 IST

महानगरपालिकेत बहुसदस्यीय प्रभागाऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासंबधीचे विधेयक शनिवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले.

ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाणांना हवा होता दोन सदस्यीय प्रभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेत बहुसदस्यीय प्रभागाऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासंबधीचे विधेयक शनिवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. परंतु या विधेयकावरील चर्चेदरम्यान सत्तापक्षातील सदस्यांमध्येच एकमत नसल्याची बाब प्रकर्षाने आढळून आली. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चार सदस्यीय प्रभागाला विरोध केला असला तरी त्यांनी किमान दोन सदस्यीय प्रभागांतर्गत महापालिकेत निवडणुका व्हाव्यात, असे मत व्यक्त केले. तसेच विधेयक आजच्या आज मंजूर करण्याऐवजी संयुक्त समितीकडे पाठविण्याच्या विरोधी पक्षाच्या मागणीचे समर्थनही केले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी मात्र हा मुद्दा खोडून काढत विधेयक आजच्या आज मंजूर करण्याचे समर्थन केले. दरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे बिल संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव परत घेतला आणि विधेयक मंजूर करण्यात आले.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकावर यांनी चर्चा सुरु करताना सांगितले की, महापालिकेत महिलांसह विविध आरक्षण कोटेशन निश्चित केले जाते. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे चांगले काम करणाऱ्या नगरसेवकाला पुन्हा: त्याच प्रभागातून निवडून येईल की नाही, अशी शंका असते. महाराष्ट्रातील कुठल्याही मनपाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध केलेला नाही. त्यामुळे ही पद्धत अपयशी ठरलेली नाही. सरकार राजकीय फायद्यासाठी बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर करीत आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ६ डिसेंबर २००१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचे समर्थन केले होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विलासराव देशमुख यांनी बहुसदस्यीय पद्धत लागू निश्चित केली होती. परंतु त्यांनी आपला निर्णय मागे घेत पुन्हा एक सदस्यीय पद्धती लागू केली होती. परंतु १४ मे २०१६ रोजी भाजप सरकारने पुन्हा बहुसदस्यीय पद्धत आणल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली खरी, परंतु चव्हाण यांनी एक सदस्यीय पद्धतीला विरोध केला. ते म्हणाले, एक सदस्यीय ऐवजी दोन सदस्यीय प्रभागाची व्यवस्था असायला हवी. आता सध्या औरंगाबादच्या निवडणुका आहेत.तेव्हा सरकारने राज्यातील सर्व २७ महापलिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा. घाईगर्दीने विधेयक मंजूर करण्यात येऊ नये, असे सांगितले. परंतु अजित पवार यांनी लगेच ही बाब खोडून काढली. ते म्हणाले बहुसदस्यीय प्रभागामुळे सदस्यांमध्ये भांडणे होत आहेत. विकास कामांवर परिणाम पडला आहे. त्यामुळे हे विधेयक तातडीने मंजूर करण्यात यावे, असे सांगितले. काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी सुद्धा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करीत विधेयकाचे समर्थन केले. चर्चेत भाजपतर्फे आशिष शेलार, देवयानी फरांदे, योगेश सागर, शिवसेनेचे प्रताप सरनाईक आदींनी भाग घेतला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीवरून फडणवीस यांनी विधेयक समितीला पाठवण्याचा प्रस्ताव परत घेतला. परंतु त्यांनी सांगितले की, हा निर्णय राजकीय उद्देशातून घेण्यात आला आहे. भविष्यात सरकार चर्चा करून निर्णय घेईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकbillबिल