शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

एक सदस्यीय प्रभागावर शिक्कामोर्तब : विधिमंडळात विधेयक मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 23:05 IST

महानगरपालिकेत बहुसदस्यीय प्रभागाऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासंबधीचे विधेयक शनिवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले.

ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाणांना हवा होता दोन सदस्यीय प्रभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेत बहुसदस्यीय प्रभागाऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासंबधीचे विधेयक शनिवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. परंतु या विधेयकावरील चर्चेदरम्यान सत्तापक्षातील सदस्यांमध्येच एकमत नसल्याची बाब प्रकर्षाने आढळून आली. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चार सदस्यीय प्रभागाला विरोध केला असला तरी त्यांनी किमान दोन सदस्यीय प्रभागांतर्गत महापालिकेत निवडणुका व्हाव्यात, असे मत व्यक्त केले. तसेच विधेयक आजच्या आज मंजूर करण्याऐवजी संयुक्त समितीकडे पाठविण्याच्या विरोधी पक्षाच्या मागणीचे समर्थनही केले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी मात्र हा मुद्दा खोडून काढत विधेयक आजच्या आज मंजूर करण्याचे समर्थन केले. दरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे बिल संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव परत घेतला आणि विधेयक मंजूर करण्यात आले.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकावर यांनी चर्चा सुरु करताना सांगितले की, महापालिकेत महिलांसह विविध आरक्षण कोटेशन निश्चित केले जाते. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे चांगले काम करणाऱ्या नगरसेवकाला पुन्हा: त्याच प्रभागातून निवडून येईल की नाही, अशी शंका असते. महाराष्ट्रातील कुठल्याही मनपाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध केलेला नाही. त्यामुळे ही पद्धत अपयशी ठरलेली नाही. सरकार राजकीय फायद्यासाठी बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर करीत आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ६ डिसेंबर २००१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचे समर्थन केले होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विलासराव देशमुख यांनी बहुसदस्यीय पद्धत लागू निश्चित केली होती. परंतु त्यांनी आपला निर्णय मागे घेत पुन्हा एक सदस्यीय पद्धती लागू केली होती. परंतु १४ मे २०१६ रोजी भाजप सरकारने पुन्हा बहुसदस्यीय पद्धत आणल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली खरी, परंतु चव्हाण यांनी एक सदस्यीय पद्धतीला विरोध केला. ते म्हणाले, एक सदस्यीय ऐवजी दोन सदस्यीय प्रभागाची व्यवस्था असायला हवी. आता सध्या औरंगाबादच्या निवडणुका आहेत.तेव्हा सरकारने राज्यातील सर्व २७ महापलिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा. घाईगर्दीने विधेयक मंजूर करण्यात येऊ नये, असे सांगितले. परंतु अजित पवार यांनी लगेच ही बाब खोडून काढली. ते म्हणाले बहुसदस्यीय प्रभागामुळे सदस्यांमध्ये भांडणे होत आहेत. विकास कामांवर परिणाम पडला आहे. त्यामुळे हे विधेयक तातडीने मंजूर करण्यात यावे, असे सांगितले. काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी सुद्धा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करीत विधेयकाचे समर्थन केले. चर्चेत भाजपतर्फे आशिष शेलार, देवयानी फरांदे, योगेश सागर, शिवसेनेचे प्रताप सरनाईक आदींनी भाग घेतला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीवरून फडणवीस यांनी विधेयक समितीला पाठवण्याचा प्रस्ताव परत घेतला. परंतु त्यांनी सांगितले की, हा निर्णय राजकीय उद्देशातून घेण्यात आला आहे. भविष्यात सरकार चर्चा करून निर्णय घेईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकbillबिल