शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

एक फुलपाखरू १० झाडांना देते नवजीवन; सप्टेंबर ‘बटरफ्लाय मंथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 07:00 IST

एक फुलपाखरू त्याच्या आयुष्यात अनेक झाडांवर भ्रमण करीत असते. पण या छोट्याशा आयुष्यात कमीत कमी १० फुलझाडे किंवा फळझाडांचे पुन:रोपण ते परागीकरणातून करीत असते.

ठळक मुद्दे परागीकरणातून जैवविविधतेचे संतुलनअल्पायुष्यात शेकडो फुलझाडांचा करतात प्रसार 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गाने मुक्तछंदाने रंगांची उधळण करून सुंदर रूप प्रदान केलेले आणि या फुलांवरून त्या फुलांवर सैरभैर फिरणारे फुलपाखरू पाहणाऱ्यांना आकर्षित करतेच. रंगीबेरंगी फुलपाखराचे आकर्षक रूप नक्कीच मनाला भुरळ पाडते. पण मोहक दिसणे हीच त्यांची ओळख नाही. आपल्या अल्पायुषी जीवनात परागीकरणाचे बहुमूल्य काम फुलपाखरे करतात. एक फुलपाखरू त्याच्या आयुष्यात अनेक झाडांवर भ्रमण करीत असते. पण या छोट्याशा आयुष्यात कमीत कमी १० फुलझाडे किंवा फळझाडांचे पुन:रोपण ते परागीकरणातून करीत असते.

फुलपाखरू अभ्यासक आणि महाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. जैवविविधता आणि पर्यावरण संतुलनात ते महत्त्वाची भूमिका पार पाडताहेत. परागीकरण ही शास्त्रीय व्याख्या आहे. पक्षी, कीटक आणि फुलपाखरे यांच्याद्वारे ही क्रिया पार पडते. एका फुलांवरून दुसºया फुलांवर भ्रमण करताना हे निसर्गदूत अजाणतेपणे त्या वृक्षाचे बीजांश वाहून इतर ठिकाणी वाहून नेतात आणि त्यातून नवीन झाडाचा जन्म होतो. खरेतर जंगलातील लाखो झाडे कुणी वृक्षारोपण केल्याने झाली नाहीत तर याच परागीकरणाच्या क्रियेतून झाली आहेत. यामुळे या इवल्याशा जीवाचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.

आज जगभरात ज्ञात असलेल्या कीटकांची संख्या १ लाख ५० हजार इतकी असून त्यापैकी १७,८२४ इतकी फुलपाखरे जगात आहेत. अलीकडील आकडेवारीनुसार भारतात १,५०५ इतकी फुलपाखरे आहेत. हीच संख्या महाराष्ट्रात २७७ च्या घरात आहे. विदर्भात १८५ प्रजाती तर मेळघाटात एकूण १२७ प्रकारची फुलपाखरे आढळतात.

मेळघाट, ताडोबा, पेंच व इतर जंगल परिसरात आपण निरीक्षण केल्यास २० ते २५ फुलपाखरांच्या प्रजाती आपल्याला एकाच भेटीत नक्कीच पाहायला मिळतील. फुलपाखरे ही अन्नसाखळीत महत्त्वाची असल्यामुळे त्यांचे अस्तित्व हे स्वच्छ पर्यावरणाचे प्रतीक आहे. सातपुडा व सह्याद्री व त्यालगतचा परिसर फुलपाखरांच्या बाबतीत समृद्ध आहे. आपण अनेक दुर्मिळ तशीच इतरही फुलपाखरे तिथे मोठ्या संख्येने पाहू शकतो. तेथे फुलपाखरांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याने भारतात पहिल्यांदाच ‘निलवंत’ याला आपले राज्य फुलपाखरू जाहीर केले आहे.

फुलपाखरांचा मुख्य आधार हा वनस्पतीच असतात. त्याच वनस्पतीवर ते आपली गुजराण करतात व त्यांच्या उगवणाºया फुलातील मधुरस घेतात. हे त्यांचे मुख्य ऊर्जास्त्रोत आहेत. मात्र फुलातील परागीकरण करताना ते त्या झाडाचे बीजांश दुसरीकडे रोपण करण्याचे महत्त्वाचे काम करतात. हे जैवविविधता संतुळनाचे अनोखे उदाहरण आहे आणि यासाठीच कदाचित सुंदर, मोहक रूपाच्या फुलपाखरांची निर्मिती झाली आहे.सप्टेंबर ‘बटरफ्लाय मंथ’साधारणत: सप्टेंबर महिन्यात फुलपाखरांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होते आणि हाच काळ अनुकूल मानला जातो. म्हणून आपल्या देशात हा महिना ‘बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात फुलपाखरांची गणना आणि संवर्धनाच्या जनजागृतीबाबत अनेक कार्यक्रम राबविले जातात. यात महाराष्ट्र अग्रेसर आहे, ही अभिमानाची बाब आहे.- यादव तरटे पाटील, सदस्य, महाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळ

टॅग्स :wildlifeवन्यजीव