शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

एक फुलपाखरू १० झाडांना देते नवजीवन; सप्टेंबर ‘बटरफ्लाय मंथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 07:00 IST

एक फुलपाखरू त्याच्या आयुष्यात अनेक झाडांवर भ्रमण करीत असते. पण या छोट्याशा आयुष्यात कमीत कमी १० फुलझाडे किंवा फळझाडांचे पुन:रोपण ते परागीकरणातून करीत असते.

ठळक मुद्दे परागीकरणातून जैवविविधतेचे संतुलनअल्पायुष्यात शेकडो फुलझाडांचा करतात प्रसार 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गाने मुक्तछंदाने रंगांची उधळण करून सुंदर रूप प्रदान केलेले आणि या फुलांवरून त्या फुलांवर सैरभैर फिरणारे फुलपाखरू पाहणाऱ्यांना आकर्षित करतेच. रंगीबेरंगी फुलपाखराचे आकर्षक रूप नक्कीच मनाला भुरळ पाडते. पण मोहक दिसणे हीच त्यांची ओळख नाही. आपल्या अल्पायुषी जीवनात परागीकरणाचे बहुमूल्य काम फुलपाखरे करतात. एक फुलपाखरू त्याच्या आयुष्यात अनेक झाडांवर भ्रमण करीत असते. पण या छोट्याशा आयुष्यात कमीत कमी १० फुलझाडे किंवा फळझाडांचे पुन:रोपण ते परागीकरणातून करीत असते.

फुलपाखरू अभ्यासक आणि महाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. जैवविविधता आणि पर्यावरण संतुलनात ते महत्त्वाची भूमिका पार पाडताहेत. परागीकरण ही शास्त्रीय व्याख्या आहे. पक्षी, कीटक आणि फुलपाखरे यांच्याद्वारे ही क्रिया पार पडते. एका फुलांवरून दुसºया फुलांवर भ्रमण करताना हे निसर्गदूत अजाणतेपणे त्या वृक्षाचे बीजांश वाहून इतर ठिकाणी वाहून नेतात आणि त्यातून नवीन झाडाचा जन्म होतो. खरेतर जंगलातील लाखो झाडे कुणी वृक्षारोपण केल्याने झाली नाहीत तर याच परागीकरणाच्या क्रियेतून झाली आहेत. यामुळे या इवल्याशा जीवाचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.

आज जगभरात ज्ञात असलेल्या कीटकांची संख्या १ लाख ५० हजार इतकी असून त्यापैकी १७,८२४ इतकी फुलपाखरे जगात आहेत. अलीकडील आकडेवारीनुसार भारतात १,५०५ इतकी फुलपाखरे आहेत. हीच संख्या महाराष्ट्रात २७७ च्या घरात आहे. विदर्भात १८५ प्रजाती तर मेळघाटात एकूण १२७ प्रकारची फुलपाखरे आढळतात.

मेळघाट, ताडोबा, पेंच व इतर जंगल परिसरात आपण निरीक्षण केल्यास २० ते २५ फुलपाखरांच्या प्रजाती आपल्याला एकाच भेटीत नक्कीच पाहायला मिळतील. फुलपाखरे ही अन्नसाखळीत महत्त्वाची असल्यामुळे त्यांचे अस्तित्व हे स्वच्छ पर्यावरणाचे प्रतीक आहे. सातपुडा व सह्याद्री व त्यालगतचा परिसर फुलपाखरांच्या बाबतीत समृद्ध आहे. आपण अनेक दुर्मिळ तशीच इतरही फुलपाखरे तिथे मोठ्या संख्येने पाहू शकतो. तेथे फुलपाखरांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याने भारतात पहिल्यांदाच ‘निलवंत’ याला आपले राज्य फुलपाखरू जाहीर केले आहे.

फुलपाखरांचा मुख्य आधार हा वनस्पतीच असतात. त्याच वनस्पतीवर ते आपली गुजराण करतात व त्यांच्या उगवणाºया फुलातील मधुरस घेतात. हे त्यांचे मुख्य ऊर्जास्त्रोत आहेत. मात्र फुलातील परागीकरण करताना ते त्या झाडाचे बीजांश दुसरीकडे रोपण करण्याचे महत्त्वाचे काम करतात. हे जैवविविधता संतुळनाचे अनोखे उदाहरण आहे आणि यासाठीच कदाचित सुंदर, मोहक रूपाच्या फुलपाखरांची निर्मिती झाली आहे.सप्टेंबर ‘बटरफ्लाय मंथ’साधारणत: सप्टेंबर महिन्यात फुलपाखरांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होते आणि हाच काळ अनुकूल मानला जातो. म्हणून आपल्या देशात हा महिना ‘बटरफ्लाय मंथ’ म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात फुलपाखरांची गणना आणि संवर्धनाच्या जनजागृतीबाबत अनेक कार्यक्रम राबविले जातात. यात महाराष्ट्र अग्रेसर आहे, ही अभिमानाची बाब आहे.- यादव तरटे पाटील, सदस्य, महाराष्ट्र वन्यजीव सल्लागार मंडळ

टॅग्स :wildlifeवन्यजीव